शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"मोठ्या शहरात छेडछाड होणं सामान्य आहे"; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 12:44 IST

कर्नाटकमध्ये महिलेच्या छेडछाडीच्या घटनेवर गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी वादग्रस्त विधान केले.

Karnatak Crime: एखाद्या गंभीर स्वरुपाच्या घटनेवर वादग्रस्त वक्तव्ये केल्याशिवाय काही नेत्यांना राहवत नाही. देशातल्या कोणत्याही भागातील नेते संवेदना सोडून वादग्रस्त वक्तव्ये करताना मागे पुढे पाहत नाहीत. अशातच कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी एका महिलेच्या छेडछाडीवर अंसेवदनशील असं विधान केले आहे. कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी सोमवारी एक वादग्रस्त टिप्पणी केली. रस्त्यावर महिलांच्या विनयभंगाच्या घटना बंगळुरूसारख्या मोठ्या शहरात घडणं सामान्य असल्याचे विधान गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी केले. यावर विनयभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगून त्यांनी पोलिसांना गस्त वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. 

गेल्या आठवड्यात, सुद्दागुंटेपल्या येथील भारती लेआउट येथील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते ज्यामध्ये रस्त्यावर एक व्यक्ती  एका महिलेला हात लावत पळून जात होता. ३ एप्रिल रोजी पहाटे ही घटना घडली. एक व्यक्ती छोट्या गल्लीतून चालणाऱ्या दोन महिलांकडे आला आणि त्याने एका महिलेला भिंतीवर ढकलले. त्यानंतर दुसऱ्या महिलेला त्याव्यक्तीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि तिथून काढला.

हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येऊ लागली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त झाल्यानंतर बंगळुरू पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे. 

अशातच गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी या घटनेवर धक्कादायक असं विधान केले आहे. "मोठ्या शहरात अशा घटना सतत घडत असतात. अशा घटना घडणे सामान्य आहे. जी काही कायदेशीर कारवाई करावी लागेल, ती कायद्यानुसारच केली जाईल. मी माझ्या आयुक्तांना गस्त वाढवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत," असे गृहमंत्री जी परमेश्वरा म्हणाले.

छेडछाडीच्या घटनांवर गृहमंत्र्यांनी दाखवले होते पाश्चात्य कपड्यांकडे बोट 

दरम्यान, काही वर्षांपूर्वी बंगळुरूमध्ये नववर्षाच्या उत्सवादरम्यान मुलींच्या छेडछाडीच्या घटनांबाबत कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी धक्कादायक विधान केले होते. नाताळ आणि नवीन वर्षाच्या उत्सवात अशा घटना घडतात असे परमेश्वरा म्हणाले होते.

"पाश्चिमात्य पद्धतीच्या अशा कार्यक्रमांना तरुणाई मोठ्या प्रमाणात जमते. ते केवळ मानसिकतेत पाश्चात्य शैलीची कॉपी करत नाहीत तर ते कपडे देखील घालतात. अशा कार्यक्रमांचे आयोजन आणि नियंत्रण कसे केले जाते हे पाहण्याची गरज आहे. आम्ही १०,००० पोलिस तैनात करू शकत नाही. मात्र, विनयभंगाच्या घटना ही चांगली बाब नसून पुन्हा अशा घटना घडू नयेत, हे बघू," असं स्पष्टीकरण गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी दिले होते.

टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस