शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

"आता शेवटच्या हल्ल्याची वेळ"; २०२६ पर्यंत नलक्षलवाद संपवण्याची अमित शाहांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 20:17 IST

आता नक्षलवादावर अंतिम हल्ल्याची वेळ आली असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.

Amit Shah on Naxalism : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षली चळवळीबाबत मोठं विधान केलं आहे. नक्षलवादामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवरुन बोलताना अमित शाह यांना मोठी घोषणा केली. छत्तीसगडमधील दहशतवादग्रस्त भागात सुरक्षा आणि विकास कामांबाबत बैठक घेतल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. २०२६ मध्ये देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात येईल, अशी घोषणा यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी केली. आता नक्षलवादावर अंतिम हल्ल्याची वेळ आली असल्याचेही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी रायपूरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी नक्षलवादी हल्ल्यांमध्ये घट झाल्याचे सांगितले. लोकांचा विकासावर विश्वास आहे. बिहार, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि बऱ्याच अंशी महाराष्ट्र नक्षलवाद्यांच्या समस्येपासून मुक्त झाला आहे. नक्षलवादी हल्ल्यांमध्ये ५४ टक्के घट झाली आहे. नक्षलवाद हे लोकशाही व्यवस्थेसाठी सर्वात मोठे आव्हान  आहे. त्यामुळे आम्ही मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद संपवू, असे अमित शाह यांनी म्हटलं.

"नक्षलग्रस्त भागात केंद्र सरकार आणि छत्तीसगड सरकारच्या योजनांची १०० टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे. अशा भागात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये प्रगती झाली पाहिजे आणि अशा प्रकल्पांदरम्यान येणाऱ्या आव्हानांवर मात केली पाहिजे. नक्षलवादाला तोंड देण्यासाठी निर्दयी राजकारणासोबतच अंतिम हल्ल्याची वेळ आली आहे. नक्षलवाद्यांविरोधात निर्णायक हल्ल्यासाठी मजबूत रणनीती आवश्यक आहे," असे अमित शाह म्हणाले.

"पहिल्या १० वर्षात नक्षलवादी कारवायांमध्ये ६६१७ सुरक्षा कर्मचारी आणि नागरिक मारले गेले होता. आता हे प्रमाण ७० टक्क्यांनी कमी झाले आहे. माझा विश्वास आहे की आमचा लढा अंतिम टप्प्यात पोहोचला असून मार्च २०२६ पर्यंत आम्ही देशाला नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त करू शकू. काही ठिकाणी, 3 राज्ये आणि दोन राज्यांचे एक संयुक्त कार्यदल तयार केले गेले आहे. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी फ्रेमवर्क मजबूत केले गेले आहे आणि भारत सरकारच्या यंत्रणा समन्वयासाठी काम करत आहेत. सर्व राज्यांमध्ये आम्ही काम करत आहोत आणि आम्हाला संयुक्त टास्क फोर्सचे खूप चांगले परिणाम मिळाले आहेत," असेही अमित शाह म्हणाले.

"२०२२ हे असे वर्ष आले जेव्हा चार दशकांत प्रथमच मृत्यूची संख्या १०० च्या खाली गेली. २०१४ ते २०२४ या कालावधीत नक्षली घटनांची सर्वात कमी नोंद झाली आहे. टॉप-१४ नक्षलवादी नेत्यांना स्थानबद्द करण्यात आले आहे. याशिवाय डाव्या अतिरेकाऐवजी आम्ही लोकांमध्ये विकासावर विश्वास निर्माण केला आहे. २०१९ ते २०२४ पर्यंत अनेक राज्ये नक्षलग्रस्त क्षेत्राच्या प्रभावामधून मुक्त झाली आहेत. महाराष्ट्रातील एक जिल्हा वगळता ही सर्व राज्ये नक्षलमुक्त झाली आहेत," असंही अमित शाह यांनी म्हटलं.

टॅग्स :Amit Shahअमित शाहnaxaliteनक्षलवादीMaharashtraमहाराष्ट्रChhattisgarhछत्तीसगड