शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"आता शेवटच्या हल्ल्याची वेळ"; २०२६ पर्यंत नलक्षलवाद संपवण्याची अमित शाहांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 20:17 IST

आता नक्षलवादावर अंतिम हल्ल्याची वेळ आली असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.

Amit Shah on Naxalism : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षली चळवळीबाबत मोठं विधान केलं आहे. नक्षलवादामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवरुन बोलताना अमित शाह यांना मोठी घोषणा केली. छत्तीसगडमधील दहशतवादग्रस्त भागात सुरक्षा आणि विकास कामांबाबत बैठक घेतल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. २०२६ मध्ये देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात येईल, अशी घोषणा यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी केली. आता नक्षलवादावर अंतिम हल्ल्याची वेळ आली असल्याचेही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी रायपूरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी नक्षलवादी हल्ल्यांमध्ये घट झाल्याचे सांगितले. लोकांचा विकासावर विश्वास आहे. बिहार, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि बऱ्याच अंशी महाराष्ट्र नक्षलवाद्यांच्या समस्येपासून मुक्त झाला आहे. नक्षलवादी हल्ल्यांमध्ये ५४ टक्के घट झाली आहे. नक्षलवाद हे लोकशाही व्यवस्थेसाठी सर्वात मोठे आव्हान  आहे. त्यामुळे आम्ही मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद संपवू, असे अमित शाह यांनी म्हटलं.

"नक्षलग्रस्त भागात केंद्र सरकार आणि छत्तीसगड सरकारच्या योजनांची १०० टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे. अशा भागात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये प्रगती झाली पाहिजे आणि अशा प्रकल्पांदरम्यान येणाऱ्या आव्हानांवर मात केली पाहिजे. नक्षलवादाला तोंड देण्यासाठी निर्दयी राजकारणासोबतच अंतिम हल्ल्याची वेळ आली आहे. नक्षलवाद्यांविरोधात निर्णायक हल्ल्यासाठी मजबूत रणनीती आवश्यक आहे," असे अमित शाह म्हणाले.

"पहिल्या १० वर्षात नक्षलवादी कारवायांमध्ये ६६१७ सुरक्षा कर्मचारी आणि नागरिक मारले गेले होता. आता हे प्रमाण ७० टक्क्यांनी कमी झाले आहे. माझा विश्वास आहे की आमचा लढा अंतिम टप्प्यात पोहोचला असून मार्च २०२६ पर्यंत आम्ही देशाला नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त करू शकू. काही ठिकाणी, 3 राज्ये आणि दोन राज्यांचे एक संयुक्त कार्यदल तयार केले गेले आहे. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी फ्रेमवर्क मजबूत केले गेले आहे आणि भारत सरकारच्या यंत्रणा समन्वयासाठी काम करत आहेत. सर्व राज्यांमध्ये आम्ही काम करत आहोत आणि आम्हाला संयुक्त टास्क फोर्सचे खूप चांगले परिणाम मिळाले आहेत," असेही अमित शाह म्हणाले.

"२०२२ हे असे वर्ष आले जेव्हा चार दशकांत प्रथमच मृत्यूची संख्या १०० च्या खाली गेली. २०१४ ते २०२४ या कालावधीत नक्षली घटनांची सर्वात कमी नोंद झाली आहे. टॉप-१४ नक्षलवादी नेत्यांना स्थानबद्द करण्यात आले आहे. याशिवाय डाव्या अतिरेकाऐवजी आम्ही लोकांमध्ये विकासावर विश्वास निर्माण केला आहे. २०१९ ते २०२४ पर्यंत अनेक राज्ये नक्षलग्रस्त क्षेत्राच्या प्रभावामधून मुक्त झाली आहेत. महाराष्ट्रातील एक जिल्हा वगळता ही सर्व राज्ये नक्षलमुक्त झाली आहेत," असंही अमित शाह यांनी म्हटलं.

टॅग्स :Amit Shahअमित शाहnaxaliteनक्षलवादीMaharashtraमहाराष्ट्रChhattisgarhछत्तीसगड