शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

"आता शेवटच्या हल्ल्याची वेळ"; २०२६ पर्यंत नलक्षलवाद संपवण्याची अमित शाहांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 20:17 IST

आता नक्षलवादावर अंतिम हल्ल्याची वेळ आली असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.

Amit Shah on Naxalism : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षली चळवळीबाबत मोठं विधान केलं आहे. नक्षलवादामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवरुन बोलताना अमित शाह यांना मोठी घोषणा केली. छत्तीसगडमधील दहशतवादग्रस्त भागात सुरक्षा आणि विकास कामांबाबत बैठक घेतल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. २०२६ मध्ये देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात येईल, अशी घोषणा यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी केली. आता नक्षलवादावर अंतिम हल्ल्याची वेळ आली असल्याचेही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी रायपूरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी नक्षलवादी हल्ल्यांमध्ये घट झाल्याचे सांगितले. लोकांचा विकासावर विश्वास आहे. बिहार, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि बऱ्याच अंशी महाराष्ट्र नक्षलवाद्यांच्या समस्येपासून मुक्त झाला आहे. नक्षलवादी हल्ल्यांमध्ये ५४ टक्के घट झाली आहे. नक्षलवाद हे लोकशाही व्यवस्थेसाठी सर्वात मोठे आव्हान  आहे. त्यामुळे आम्ही मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद संपवू, असे अमित शाह यांनी म्हटलं.

"नक्षलग्रस्त भागात केंद्र सरकार आणि छत्तीसगड सरकारच्या योजनांची १०० टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे. अशा भागात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये प्रगती झाली पाहिजे आणि अशा प्रकल्पांदरम्यान येणाऱ्या आव्हानांवर मात केली पाहिजे. नक्षलवादाला तोंड देण्यासाठी निर्दयी राजकारणासोबतच अंतिम हल्ल्याची वेळ आली आहे. नक्षलवाद्यांविरोधात निर्णायक हल्ल्यासाठी मजबूत रणनीती आवश्यक आहे," असे अमित शाह म्हणाले.

"पहिल्या १० वर्षात नक्षलवादी कारवायांमध्ये ६६१७ सुरक्षा कर्मचारी आणि नागरिक मारले गेले होता. आता हे प्रमाण ७० टक्क्यांनी कमी झाले आहे. माझा विश्वास आहे की आमचा लढा अंतिम टप्प्यात पोहोचला असून मार्च २०२६ पर्यंत आम्ही देशाला नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त करू शकू. काही ठिकाणी, 3 राज्ये आणि दोन राज्यांचे एक संयुक्त कार्यदल तयार केले गेले आहे. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी फ्रेमवर्क मजबूत केले गेले आहे आणि भारत सरकारच्या यंत्रणा समन्वयासाठी काम करत आहेत. सर्व राज्यांमध्ये आम्ही काम करत आहोत आणि आम्हाला संयुक्त टास्क फोर्सचे खूप चांगले परिणाम मिळाले आहेत," असेही अमित शाह म्हणाले.

"२०२२ हे असे वर्ष आले जेव्हा चार दशकांत प्रथमच मृत्यूची संख्या १०० च्या खाली गेली. २०१४ ते २०२४ या कालावधीत नक्षली घटनांची सर्वात कमी नोंद झाली आहे. टॉप-१४ नक्षलवादी नेत्यांना स्थानबद्द करण्यात आले आहे. याशिवाय डाव्या अतिरेकाऐवजी आम्ही लोकांमध्ये विकासावर विश्वास निर्माण केला आहे. २०१९ ते २०२४ पर्यंत अनेक राज्ये नक्षलग्रस्त क्षेत्राच्या प्रभावामधून मुक्त झाली आहेत. महाराष्ट्रातील एक जिल्हा वगळता ही सर्व राज्ये नक्षलमुक्त झाली आहेत," असंही अमित शाह यांनी म्हटलं.

टॅग्स :Amit Shahअमित शाहnaxaliteनक्षलवादीMaharashtraमहाराष्ट्रChhattisgarhछत्तीसगड