शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

हिंदू महासभेनं बांधलं नथुराम गोडसेचं मंदिर, आरती करुन वाटला प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 14:57 IST

हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधीचा मारेकरी नथुराम गोडसेचं मंदिर बांधून प्रतिमेची स्थापना केली आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यालयात नथुराम गोडसेचं मंदिर बांधलं आहे.

ठळक मुद्देहिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधीचा मारेकरी नथुराम गोडसेचं मंदिर बांधून प्रतिमेची स्थापना केलीमध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यालयात नथुराम गोडसेचं मंदिर बांधलंयामुळे मोठा वाद निर्माण झाला असून काँग्रेसने निषेध व्यक्त केला आहे

भोपाळ - हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधीचा मारेकरी नथुराम गोडसेचं मंदिर बांधून प्रतिमेची स्थापना केली आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यालयात नथुराम गोडसेचं मंदिर बांधलं आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून काँग्रेसने निषेध व्यक्त केला आहे. यावर हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी सांगितलं आहे की, 'नथुराम गोडसेचं मंदिर बांधण्यासाठी आम्ही 9 नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासनाकडे जमीन मागितली होती. प्रशासनाने नकार दिल्यानंतर ग्वाल्हेरमधील आमच्या कार्यालयातच आम्ही मंदिर उभं केलं आहे'.

'आम्हाला या प्रकरणाची माहिती मिळाली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक याकडे लक्ष देत असून कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच योग्य ती कारवाई केली जाईल', अशी माहिती पोलीस महानिरीक्षक मकरंद देऊस्कर यांनी दिली आहे. 

 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजय सिंह यांनी निषेध व्यक्त करत हा महात्मा गांधींचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. 'याआधी मुरैना येथे महात्मा गांधींचा फोटो जाळण्यात आला होता आणि आता महासभेने बापूंच्या मारेक-याचं मंदिर ग्वाल्हेरमध्ये उभं करत, आरती करुन प्रसादाचं वाटप केलंय. अशा लोकांविरोधात देशद्रोहाची कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे', असं अजय सिंह बोलले आहेत. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याप्रकरणी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. 'बापूंच्या मारेक-याचं एक मंदिर ग्वाल्हेरमध्ये शिवराज सिंग चौहान यांच्या नाकाखाली टिच्चून तयार करण्यात आलं. दुसरीकडे शिवराज सिंग चौहान गांधीजींच्या नावावर उपवास करण्याचं नाटक करतात. हे अत्यंत लाजिरवणां आणि निंदनीय कृत्य आहे'. दुसरीकडे भाजपा प्रवक्ता बोलले आहेत की, 'महात्मा गांधींवर काँग्रेसने आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न करु नये. जर कोणी कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कऱण्यात येईल'. 

टॅग्स :Nathuram Godseनथुराम गोडसेMahatma Gandhiमहात्मा गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस