शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

हिमालयात येऊ शकतात आणखी बिकट संकटे; शास्त्रज्ञांचा इशारा; अनेक राज्यांना धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 10:12 IST

हिमनद्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे हिमालयात अशी आणखी संकटे येऊ शकतात, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तापमान वाढ, वितळणाऱ्या हिमनद्या, अतिवृष्टी आणि अनियंत्रित बांधकामांसह वाढते प्रदूषण या हवामान बदलांमुळे सिक्कीममध्ये आपत्ती आली. हिमनद्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे हिमालयात अशी आणखी संकटे येऊ शकतात, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. 

हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये हवामान बदलामुळे अनेक हिमनद्या झपाट्याने वितळत आहेत. भूकंप आणि कार्बन उत्सर्जन त्यास हातभार लावत आहेत, असे पर्यावरणतज्ज्ञ अंजल प्रकाश म्हणाले.

तापमानवाढीचा धोका 

पर्यावरण अभियंता मोहम्मद फारुक आझम यांच्या मते, हवामान बदलाचा दोन प्रकारे परिणाम होत आहे. सर्वप्रथम, जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळल्याने सरोवरे तयार होतात. जी अनेकदा धरणांद्वारे नियंत्रित केली जातात. सततच्या जागतिक तापमानवाढीमुळे सरोवरांचा आकार आणि संख्या दोन्ही वाढत आहे. २०१३ च्या केदारनाथ आपत्तीमध्येही अशीच परिस्थिती होती. जिथे चोराबरी तलाव ओव्हरफ्लो झाला होता.