शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ९० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग, कॉलेजने ठोठावला दंड, परिसरात उडाली खळबळ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 11:00 IST

कॉलेज प्रशासनाच्या या कारवाईमुळे पांवटा साहिब येथील हिंदू संघटना संतप्त झाल्या आणि त्यांनी कॉलेजच्या गेटवरच गोंधळ घातला.

नाहन : हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील पांवटा साहिब येथे असलेल्या हिमाचल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये मोठा गोंधळ झाला. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या ९० फार्मसी विद्यार्थ्यांना कॉलेज प्रशासनाने शिक्षा आणि दंड ठोठावला. या घटनेमुळे कॉलेज परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, २२ जानेवारीला कॉलेज व्यवस्थापनाने जवळपास ९० विद्यार्थ्यांना कॉलेजबाहेर राहिल्याबद्दल २५०० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच, दंड न भरल्यास कॉलेज सोडण्याची धमकीही दिली. कॉलेज प्रशासनाच्या या कारवाईमुळे पांवटा साहिब येथील हिंदू संघटना संतप्त झाल्या आणि त्यांनी कॉलेजच्या गेटवरच गोंधळ घातला.

विशेष म्हणजे, २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशमध्ये उत्सव साजरा करण्यात आला. तसेच, यानिमित्ताने राज्यात सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, पांवटा साहिबमध्ये हिमाचल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थित असलेल्या जवळपास ९० विद्यार्थ्यांवर कारवाई केली. सुट्टी जाहीर करूनही परवानगी न घेता गैरहजर राहिल्याने कॉलेजने विद्यार्थ्यांना शिक्षा दिल्याचे म्हटले जात आहे. २३ जानेवारीला सर्व विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभे करण्यात आले. तसेच, २५०० रुपयांचा दंड भरण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणला आणि दंड न भरल्यास कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली, असा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.

दुसरीकडे, कॉलेज प्रशासनाच्या या कारवाईमुळे स्थानिक हिंदू संघटना संतप्त झाल्या आहेत. विविध हिंदू संघटनांच्या लोकांनी कॉलेजच्या गेटवर निदर्शने करत कॉलेज प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात मुलांना हजेरी लावण्यासाठी कॉलेजने तालिबानी आदेश देऊन धार्मिक भावना दुखावल्याचा हिंदू संघटनांचा आरोप आहे. हिंदू संघटनांचे लोक कॉलेजच्या एचओडीला बडतर्फ करण्याची आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत आहेत.

दरम्यान, प्रकरण चिघळत असल्याचे पाहून स्थानिक प्रशासनाने हस्तक्षेप केला. डीएसपी व तहसीलदार यांनी घटनास्थळी पोहोचून संतप्त लोकांशी तसेच कॉलेज प्रशासनाशी चर्चा केली. सध्या हे प्रकरण शांत झाले असून चौकशी सुरु आहे. तसेच, कॉलेजच्या एचओडीला ५ फेब्रुवारीपर्यंत रजेवर पाठवून या प्रकरणाची चौकशी करण्याचे मान्य करण्यात आले आहे. तहसीलदार ऋषभ शर्मा यांनी प्रकरण शांत झाले असून तपास केला जात असल्याचे सांगितले. तर कॉलेजचे उपाध्यक्ष फार्मा डॉ. अभिनय पुरी यांनी सांगितले की, कॉलेजने आपल्या स्तरावर एक समिती स्थापन केली आहे, ज्यामध्ये दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल आणि त्यानंतर या प्रकरणात कारवाई केली जाईल. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याHimachal Pradeshहिमाचल प्रदेशStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय