शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ९० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग, कॉलेजने ठोठावला दंड, परिसरात उडाली खळबळ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 11:00 IST

कॉलेज प्रशासनाच्या या कारवाईमुळे पांवटा साहिब येथील हिंदू संघटना संतप्त झाल्या आणि त्यांनी कॉलेजच्या गेटवरच गोंधळ घातला.

नाहन : हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील पांवटा साहिब येथे असलेल्या हिमाचल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये मोठा गोंधळ झाला. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या ९० फार्मसी विद्यार्थ्यांना कॉलेज प्रशासनाने शिक्षा आणि दंड ठोठावला. या घटनेमुळे कॉलेज परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, २२ जानेवारीला कॉलेज व्यवस्थापनाने जवळपास ९० विद्यार्थ्यांना कॉलेजबाहेर राहिल्याबद्दल २५०० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच, दंड न भरल्यास कॉलेज सोडण्याची धमकीही दिली. कॉलेज प्रशासनाच्या या कारवाईमुळे पांवटा साहिब येथील हिंदू संघटना संतप्त झाल्या आणि त्यांनी कॉलेजच्या गेटवरच गोंधळ घातला.

विशेष म्हणजे, २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशमध्ये उत्सव साजरा करण्यात आला. तसेच, यानिमित्ताने राज्यात सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, पांवटा साहिबमध्ये हिमाचल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थित असलेल्या जवळपास ९० विद्यार्थ्यांवर कारवाई केली. सुट्टी जाहीर करूनही परवानगी न घेता गैरहजर राहिल्याने कॉलेजने विद्यार्थ्यांना शिक्षा दिल्याचे म्हटले जात आहे. २३ जानेवारीला सर्व विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभे करण्यात आले. तसेच, २५०० रुपयांचा दंड भरण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणला आणि दंड न भरल्यास कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली, असा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.

दुसरीकडे, कॉलेज प्रशासनाच्या या कारवाईमुळे स्थानिक हिंदू संघटना संतप्त झाल्या आहेत. विविध हिंदू संघटनांच्या लोकांनी कॉलेजच्या गेटवर निदर्शने करत कॉलेज प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात मुलांना हजेरी लावण्यासाठी कॉलेजने तालिबानी आदेश देऊन धार्मिक भावना दुखावल्याचा हिंदू संघटनांचा आरोप आहे. हिंदू संघटनांचे लोक कॉलेजच्या एचओडीला बडतर्फ करण्याची आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत आहेत.

दरम्यान, प्रकरण चिघळत असल्याचे पाहून स्थानिक प्रशासनाने हस्तक्षेप केला. डीएसपी व तहसीलदार यांनी घटनास्थळी पोहोचून संतप्त लोकांशी तसेच कॉलेज प्रशासनाशी चर्चा केली. सध्या हे प्रकरण शांत झाले असून चौकशी सुरु आहे. तसेच, कॉलेजच्या एचओडीला ५ फेब्रुवारीपर्यंत रजेवर पाठवून या प्रकरणाची चौकशी करण्याचे मान्य करण्यात आले आहे. तहसीलदार ऋषभ शर्मा यांनी प्रकरण शांत झाले असून तपास केला जात असल्याचे सांगितले. तर कॉलेजचे उपाध्यक्ष फार्मा डॉ. अभिनय पुरी यांनी सांगितले की, कॉलेजने आपल्या स्तरावर एक समिती स्थापन केली आहे, ज्यामध्ये दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल आणि त्यानंतर या प्रकरणात कारवाई केली जाईल. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याHimachal Pradeshहिमाचल प्रदेशStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय