शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'या' राज्यात रहस्यमयी आजाराचा कहर! आठवड्याभरात 50 जणांचा मृत्यू; एका बेडवर 3 रुग्णांवर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 14:57 IST

High fever viral : रुग्णालयात एका बेडवर एकाचवेळी दोन ते तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रहस्यमयी आजारामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 45,083 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 460 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान आता एका रहस्यमयी आजाराचा कहर पाहायला मिळत आहे. आठवड्याभरात 26 लहान मुलांसह 50 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात एका बेडवर एकाचवेळी दोन ते तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रहस्यमयी आजारामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये रहस्यमयी आजार पसला आहे. यामध्ये लोकांना खूप ताप येऊन त्यांचा मृत्यू होत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका आठवड्यात आग्रा, फिरोजाबाद, मथुरा, मॅनपुरी, एटा आणि कासगंज जिल्ह्यामध्ये 50 लोकांचा ताप, डिहायड्रेशन आणि प्लेट्सलेट अचानक कमी झाल्याने मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये 26 लहान मुलांचा समावेश आहे. या रहस्यमयी आजारातून बरं होण्यासाठी लोकांना 12 दिवसांहून अधिक काळ लागत आहे. सरकारी रुग्णालयात बेडची कमतरता भासत आहे. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रहस्यमयी आजार चिंतेचा विषय आहे. फिरोजाबाद मेडिकल कॉलेजमधील रुग्णालयात एका बेडवर दोन किंवा तीन रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. डॉ. हंसराज सिंह यांनी हा रहस्यमयी आजार असलेल्या 100 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती दिली आहे. आग्रा जिल्हा रुग्णालयातील डॉ. एके अग्रवाल यांनी दररोज 200 रुग्ण आढळून येत असल्याचं म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या तीन आठवड्यापासून ही संख्या सातत्याने वाढत आहे. लहान मुलांना याचा सर्वाधिक धोका असल्याचं म्हटलं जात आहे. 

फिरोजाबादमध्ये सर्वात जास्त म्हणजे 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी कोणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती फिरोजाबाद सीएमओ डॉ. नीता कुलश्रेष्ठ यांनी दिली आहे. यामागचं नेमकं कारण शोधण्यात येत आहे. ग्रामीण भागात परिस्थिती अत्यंत गंभीर असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग्रातील तिवाहा गावातील प्रत्येक घरामध्ये रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 20 जणांना उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलIndiaभारतdoctorडॉक्टर