शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

'या' राज्यात रहस्यमयी आजाराचा कहर! आठवड्याभरात 50 जणांचा मृत्यू; एका बेडवर 3 रुग्णांवर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 14:57 IST

High fever viral : रुग्णालयात एका बेडवर एकाचवेळी दोन ते तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रहस्यमयी आजारामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 45,083 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 460 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान आता एका रहस्यमयी आजाराचा कहर पाहायला मिळत आहे. आठवड्याभरात 26 लहान मुलांसह 50 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात एका बेडवर एकाचवेळी दोन ते तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रहस्यमयी आजारामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये रहस्यमयी आजार पसला आहे. यामध्ये लोकांना खूप ताप येऊन त्यांचा मृत्यू होत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका आठवड्यात आग्रा, फिरोजाबाद, मथुरा, मॅनपुरी, एटा आणि कासगंज जिल्ह्यामध्ये 50 लोकांचा ताप, डिहायड्रेशन आणि प्लेट्सलेट अचानक कमी झाल्याने मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये 26 लहान मुलांचा समावेश आहे. या रहस्यमयी आजारातून बरं होण्यासाठी लोकांना 12 दिवसांहून अधिक काळ लागत आहे. सरकारी रुग्णालयात बेडची कमतरता भासत आहे. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रहस्यमयी आजार चिंतेचा विषय आहे. फिरोजाबाद मेडिकल कॉलेजमधील रुग्णालयात एका बेडवर दोन किंवा तीन रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. डॉ. हंसराज सिंह यांनी हा रहस्यमयी आजार असलेल्या 100 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती दिली आहे. आग्रा जिल्हा रुग्णालयातील डॉ. एके अग्रवाल यांनी दररोज 200 रुग्ण आढळून येत असल्याचं म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या तीन आठवड्यापासून ही संख्या सातत्याने वाढत आहे. लहान मुलांना याचा सर्वाधिक धोका असल्याचं म्हटलं जात आहे. 

फिरोजाबादमध्ये सर्वात जास्त म्हणजे 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी कोणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती फिरोजाबाद सीएमओ डॉ. नीता कुलश्रेष्ठ यांनी दिली आहे. यामागचं नेमकं कारण शोधण्यात येत आहे. ग्रामीण भागात परिस्थिती अत्यंत गंभीर असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग्रातील तिवाहा गावातील प्रत्येक घरामध्ये रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 20 जणांना उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलIndiaभारतdoctorडॉक्टर