शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

हिजबुलनं केला कुख्यात दहशतवादी कयूम नजरचा घात, लष्करानं घातलं असं  कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 09:08 IST

जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय असलेला कुख्यात आणि खतरनाक दहशतवादी कयूम नजरचा गेल्या आठवड्यात भारतीय लष्कराने खात्मा केला. विशेष म्हणजे, भारतीय जवानांना कयूमबाबतची संपूर्ण माहिती हिजबुल दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांनी दिली होती.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय असलेला कुख्यात आणि खतरनाक दहशतवादी कयूम नजरचा गेल्या आठवड्यात भारतीय लष्कराने खात्मा केला. विशेष म्हणजे, भारतीय जवानांना कयूमबाबतची संपूर्ण माहिती हिजबुल दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांनी दिली होती. हिजबुलच्या दहशतवाद्यांनीच जम्मू काश्मीर पोलिसांना सांगितले होते की, कयूम नजर पाकव्याप्त काश्मीरमधून काश्मीरमध्ये येणाच्या तयारी आहेत. एवढंच  नाही तर नजरबाबत माहिती देणा-या दहशतवाद्यांनी असेही सांगितले की, नजर हा डोंगराळ भागातून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि अशा पद्धतीनं हिजबुलनं कयूम नजरचा घात केला. 

भारतीय लष्करानं मिळालेल्या या माहितीच्या आधारे नियंत्रण रेषेवर घुसखोरीदरम्यान या खतरनाक दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. दरम्यान, दहशतवाद्यांनी कयूम नजरच्या पतरण्याबाबतच्या कोणतीही माहिती दिली नव्हती तसेच तारीखही स्पष्ट केली नव्हती. मात्र, तो उत्तर काश्मीरच्या दिशेनं भारताच्या सीमेत दाखल होणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या आधारे समोर आली होती. यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी त्यांना मिळालेली माहिती भारतीय लष्करापर्यंत पोहोचवली आणि यानंतर या परिसरात मोठा पहारा ठेवण्यात आला. नजरबाबत माहिती मिळाल्यानंतर सतर्क असलेल्या जवानांनी उरी सेक्टरमधून भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करणा-या नजरचा खात्मा केला, अशी माहिती समोर आली आहे. 

लष्कराने असा केला दहशतवादी कयूम नजरचा खात्मा 

जम्मू-काश्मीरमध्ये 27 सप्टेंबरला भारतीय लष्कराने खतरनाक दहशतवादी कयूम नजरचा खात्मा केला. लष्कर-ए-इस्लामचा प्रमुख अब्दुल कय्युम नजरला सुरक्षा रक्षकांनी कंठस्नान घातले. उरी सेक्टरमध्ये सुरक्षा जवानांबरोबर झालेल्या चकमकीत तो मारला गेला. सुरक्षा पथकांना मिळालेलं हे मोठं यश आहे. 50 पेक्षा जास्त हत्या प्रकरणात त्याचा सहभाग होता. गेल्या 17 वर्षांपासून अब्दुल नजर काश्मीर खो-यात सक्रीय होता.  उरीमधल्या लाचीपोरामधून घुसखोरीचा प्रयत्न करत असताना सुरक्षा पथकांनी त्याला कंठस्नान घातले.  नियंत्रण रेषेजवळ लाचीपोरा येथे जवानांनी त्याचा घुसखोरीचा कट उधळून लावला. त्यावेळी झालेल्या चकमकीत तो मारला गेला, अशी माहिती बारामुल्लाचे एसएसपी इम्तियाज हुसैन यांनी दिली. काश्मीरमधील टॉपच्या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यामुळे त्याच्याकडे लष्कर-ए-इस्लाम पुर्नजीवित करण्याची जबाबदारी दिली होती. 

हिजबुल मुजाहिद्दीनमधून फुटून बाहेर पडलेल्या लष्कर-ए-इस्लामचे तो नेतृत्व करत होता. 43 वर्षीय अब्दुल नजर सोपोरचा राहणार होता. तो पाकिस्तानातही जाऊन आला होता. गावच्या सरपंचासह अनेक हत्या प्रकरणात त्याचा सहभाग होता. वयाच्या 16 व्या वर्षापासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होता. काश्मीरमधल्या अनेक मोबाइल टॉवरवरील हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्यामुळेच त्याला मोबाइल टॉवर हे टोपण नाव देण्यात आले होते. 

 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्ला