हॅलो पान एक....छत्रपतींचा पुतळा हलवण्यासाठी १२५० कोटींचा खर्च!
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:19+5:302014-12-12T23:49:19+5:30
हॅलो पान एक....

हॅलो पान एक....छत्रपतींचा पुतळा हलवण्यासाठी १२५० कोटींचा खर्च!
ह लो पान एक.......................................................................शिवाजी महाराजांचा पुतळा हलवण्यासाठी १२५० कोटींचा खर्च!सहार विमानतळावर होता पुतळामुंबई: अंधेरी (पूर्व) सहार येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टी-२ टर्मिनलच्या उभारणीसाठी येथे २००४ साली उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हलवण्यासाठी १२५० कोटी रु पये खर्च आल्याची माहिती कॅगच्या मार्च २०१३ च्या अहवालात नमूद केली आहे. संसदेत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीत १८ जुलै २०१४ साली हा अहवाल सादर करण्यात आला.या प्रकरणी मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप वॉच डॉग फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक निकोलस अल्मेडा यांनी केला आहे. या आर्थिक घोटाळ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.शिवाजी महाराजांचे औलोकिक महत्त्व आहे. त्यांचा २०१४ मध्ये बसवलेला पुतळा या विमानतळाच्या उभारणीसाठी खरे तर हजारो मुंबईकरांच्या उपस्थितीत आणि सहार ग्रामस्थांच्या उपस्थितीत वाजतगाजत हलवण्यात यायला हवा होता. मात्र मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यरात्री तीन वाजता गुपचूप हलवला, असा आरोप अल्मेडा यांनी केला.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या हलवण्याच्या कामाला उशीर झाल्यामुळे नव्या टी-२ टर्मिनलच्या उभारणीच्या कामाला तब्बल १७ महिन्यांनी उशीराने सुरुवात झाल्याची माहिती या अहवालात नमूद केली आहे. सध्या हा पुतळा या नव्या विमानतळापासून २ किमी अंतरावरील सहार रोड, मरोळ पाईपलाईन येथील इम्पोर्ट वेयर हाऊस जवळ बसवण्यात आला आहे. मे-२००६ साली हा पुतळा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे सुपूर्द केला असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)