शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड अन् हिमाचलमध्ये जोरदार पाऊस; कुठे काय परिस्थिती, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 10:02 IST

Rain Updates: जम्मू विभागातील कठुआ जिल्ह्यातील बिल्लावरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली: देशाच्या अनेक भागात कालही पावसाने कहर केला. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. जम्मू-काश्मीर विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये नाल्यांना उधाण आले आहे. रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेकडो गावांचा जिल्हा मुख्यालयापासून संपर्क तुटला आहे. दुसरीकडे, हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे डझनभर रस्ते बंद झाले असून शेकडो लोक अडकले आहेत.

जम्मू विभागातील कठुआ जिल्ह्यातील बिल्लावरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील ओल्या नाल्यात अचानक पाणी आल्याने पुलाचा अप्रोच रोड वाहून गेला. जनसंपर्क विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. रस्ता वाहून गेल्याने बिल्लावरचा अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. तिकडे पठाणकोटला राष्ट्रीय महामार्ग ४४ने जोडणाऱ्या सन्याल पुलाला दरड कोसळली आहे. अपघाताची शक्यता असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलावरून वाहने ये-जा करू शकत नसल्यामुळे या भागाचा पंजाबशी संपर्क तुटला आहे.

काश्मीर विभागात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. नदी-नालेही धोक्याच्या चिन्हावर वाहत आहेत. कुपवाडा येथील ढगफुटीमुळे लोलाब भागातील खुमरियाल पुलाचे नुकसान झाले. त्यामुळे परिसरातील काही भागांचा संपर्क तुटला आहे. धुक्यामुळे गुरुवारी कटरा येथे वैष्णोदेवीसाठी हेलिकॉप्टर सेवा धावू शकली नाही.

हरियाणातील नद्यांची पाणी पातळी होतेय कमी

डोंगरावर पाऊस थांबल्याने नद्यांची पाणीपातळी थांबू लागली आहे. जीटी बेल्टमधील यमुना, टांगरी आणि मार्कंडा नद्या शांत झाल्या आहेत. फतेहाबाद आणि सिरसा जिल्ह्यात घग्गर नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. असे असतानाही अनेक भागात परिस्थिती सामान्य नसल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचवेळी सिरसा जिल्ह्यातील घग्गर नदीची पाणीपातळी ५८ हजारांवरून २६ हजार क्युसेकवर घसरली आहे.

रायगड दुर्घटनेनंतर ७ हजार लोकांना छावण्यांमध्ये पाठवले-

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर, दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे १०३ गावांतील सुमारे ७००० लोकांना रायगडमधील ५१ छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. १९ जुलै रोजी झालेल्या इर्शाळवाडी दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ५७ अजूनही बेपत्ता आहेत. हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

आजही मुसळधार पावसाचा इशारा-

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाले तुंबले आहेत. बियास, सतलुत आणि रावी नद्याही आपले उग्र रूप दाखवत आहेत. शुक्रवारी राज्यातील नऊ जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने ऑरेंज जारी केला आहे. दरम्यान, भूस्खलनामुळे किन्नौर आणि स्पिती खोऱ्याचा शिमल्यापासून संपर्क तुटला आहे. दुसरीकडे, पालीगड येथे मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने अडथळा ठरलेला उत्तरकाशीतील यमुनोत्री महामार्ग आता खुला झाला आहे. गुरुवारी उत्तराखंडमधील बहुतांश भागात हवामान स्वच्छ होते. गुम्माजवळील मंडी-पठाणकोट एनएच बुधवारी रात्री तीन तास बंद राहिल्याने सकाळपर्यंत सर्व वाहने तेथे अडकून पडली होती. 

टॅग्स :Rainपाऊसdelhiदिल्लीMaharashtraमहाराष्ट्रHaryanaहरयाणा