शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड अन् हिमाचलमध्ये जोरदार पाऊस; कुठे काय परिस्थिती, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 10:02 IST

Rain Updates: जम्मू विभागातील कठुआ जिल्ह्यातील बिल्लावरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली: देशाच्या अनेक भागात कालही पावसाने कहर केला. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. जम्मू-काश्मीर विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये नाल्यांना उधाण आले आहे. रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेकडो गावांचा जिल्हा मुख्यालयापासून संपर्क तुटला आहे. दुसरीकडे, हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे डझनभर रस्ते बंद झाले असून शेकडो लोक अडकले आहेत.

जम्मू विभागातील कठुआ जिल्ह्यातील बिल्लावरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील ओल्या नाल्यात अचानक पाणी आल्याने पुलाचा अप्रोच रोड वाहून गेला. जनसंपर्क विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. रस्ता वाहून गेल्याने बिल्लावरचा अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. तिकडे पठाणकोटला राष्ट्रीय महामार्ग ४४ने जोडणाऱ्या सन्याल पुलाला दरड कोसळली आहे. अपघाताची शक्यता असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलावरून वाहने ये-जा करू शकत नसल्यामुळे या भागाचा पंजाबशी संपर्क तुटला आहे.

काश्मीर विभागात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. नदी-नालेही धोक्याच्या चिन्हावर वाहत आहेत. कुपवाडा येथील ढगफुटीमुळे लोलाब भागातील खुमरियाल पुलाचे नुकसान झाले. त्यामुळे परिसरातील काही भागांचा संपर्क तुटला आहे. धुक्यामुळे गुरुवारी कटरा येथे वैष्णोदेवीसाठी हेलिकॉप्टर सेवा धावू शकली नाही.

हरियाणातील नद्यांची पाणी पातळी होतेय कमी

डोंगरावर पाऊस थांबल्याने नद्यांची पाणीपातळी थांबू लागली आहे. जीटी बेल्टमधील यमुना, टांगरी आणि मार्कंडा नद्या शांत झाल्या आहेत. फतेहाबाद आणि सिरसा जिल्ह्यात घग्गर नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. असे असतानाही अनेक भागात परिस्थिती सामान्य नसल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचवेळी सिरसा जिल्ह्यातील घग्गर नदीची पाणीपातळी ५८ हजारांवरून २६ हजार क्युसेकवर घसरली आहे.

रायगड दुर्घटनेनंतर ७ हजार लोकांना छावण्यांमध्ये पाठवले-

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर, दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे १०३ गावांतील सुमारे ७००० लोकांना रायगडमधील ५१ छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. १९ जुलै रोजी झालेल्या इर्शाळवाडी दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ५७ अजूनही बेपत्ता आहेत. हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

आजही मुसळधार पावसाचा इशारा-

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाले तुंबले आहेत. बियास, सतलुत आणि रावी नद्याही आपले उग्र रूप दाखवत आहेत. शुक्रवारी राज्यातील नऊ जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने ऑरेंज जारी केला आहे. दरम्यान, भूस्खलनामुळे किन्नौर आणि स्पिती खोऱ्याचा शिमल्यापासून संपर्क तुटला आहे. दुसरीकडे, पालीगड येथे मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने अडथळा ठरलेला उत्तरकाशीतील यमुनोत्री महामार्ग आता खुला झाला आहे. गुरुवारी उत्तराखंडमधील बहुतांश भागात हवामान स्वच्छ होते. गुम्माजवळील मंडी-पठाणकोट एनएच बुधवारी रात्री तीन तास बंद राहिल्याने सकाळपर्यंत सर्व वाहने तेथे अडकून पडली होती. 

टॅग्स :Rainपाऊसdelhiदिल्लीMaharashtraमहाराष्ट्रHaryanaहरयाणा