शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड अन् हिमाचलमध्ये जोरदार पाऊस; कुठे काय परिस्थिती, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 10:02 IST

Rain Updates: जम्मू विभागातील कठुआ जिल्ह्यातील बिल्लावरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली: देशाच्या अनेक भागात कालही पावसाने कहर केला. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. जम्मू-काश्मीर विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये नाल्यांना उधाण आले आहे. रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेकडो गावांचा जिल्हा मुख्यालयापासून संपर्क तुटला आहे. दुसरीकडे, हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे डझनभर रस्ते बंद झाले असून शेकडो लोक अडकले आहेत.

जम्मू विभागातील कठुआ जिल्ह्यातील बिल्लावरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील ओल्या नाल्यात अचानक पाणी आल्याने पुलाचा अप्रोच रोड वाहून गेला. जनसंपर्क विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. रस्ता वाहून गेल्याने बिल्लावरचा अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. तिकडे पठाणकोटला राष्ट्रीय महामार्ग ४४ने जोडणाऱ्या सन्याल पुलाला दरड कोसळली आहे. अपघाताची शक्यता असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलावरून वाहने ये-जा करू शकत नसल्यामुळे या भागाचा पंजाबशी संपर्क तुटला आहे.

काश्मीर विभागात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. नदी-नालेही धोक्याच्या चिन्हावर वाहत आहेत. कुपवाडा येथील ढगफुटीमुळे लोलाब भागातील खुमरियाल पुलाचे नुकसान झाले. त्यामुळे परिसरातील काही भागांचा संपर्क तुटला आहे. धुक्यामुळे गुरुवारी कटरा येथे वैष्णोदेवीसाठी हेलिकॉप्टर सेवा धावू शकली नाही.

हरियाणातील नद्यांची पाणी पातळी होतेय कमी

डोंगरावर पाऊस थांबल्याने नद्यांची पाणीपातळी थांबू लागली आहे. जीटी बेल्टमधील यमुना, टांगरी आणि मार्कंडा नद्या शांत झाल्या आहेत. फतेहाबाद आणि सिरसा जिल्ह्यात घग्गर नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. असे असतानाही अनेक भागात परिस्थिती सामान्य नसल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचवेळी सिरसा जिल्ह्यातील घग्गर नदीची पाणीपातळी ५८ हजारांवरून २६ हजार क्युसेकवर घसरली आहे.

रायगड दुर्घटनेनंतर ७ हजार लोकांना छावण्यांमध्ये पाठवले-

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर, दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे १०३ गावांतील सुमारे ७००० लोकांना रायगडमधील ५१ छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. १९ जुलै रोजी झालेल्या इर्शाळवाडी दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ५७ अजूनही बेपत्ता आहेत. हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

आजही मुसळधार पावसाचा इशारा-

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाले तुंबले आहेत. बियास, सतलुत आणि रावी नद्याही आपले उग्र रूप दाखवत आहेत. शुक्रवारी राज्यातील नऊ जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने ऑरेंज जारी केला आहे. दरम्यान, भूस्खलनामुळे किन्नौर आणि स्पिती खोऱ्याचा शिमल्यापासून संपर्क तुटला आहे. दुसरीकडे, पालीगड येथे मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने अडथळा ठरलेला उत्तरकाशीतील यमुनोत्री महामार्ग आता खुला झाला आहे. गुरुवारी उत्तराखंडमधील बहुतांश भागात हवामान स्वच्छ होते. गुम्माजवळील मंडी-पठाणकोट एनएच बुधवारी रात्री तीन तास बंद राहिल्याने सकाळपर्यंत सर्व वाहने तेथे अडकून पडली होती. 

टॅग्स :Rainपाऊसdelhiदिल्लीMaharashtraमहाराष्ट्रHaryanaहरयाणा