शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
4
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
5
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

केरळमध्ये महापूर पण उर्वरित दक्षिण भारत दुष्काळाच्या छायेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 4:23 PM

केरळमध्ये पुरस्थिती आली असताना दुसरीकडे उर्वरित दक्षिण भारत मात्र दुष्काळाच्या छायेत आहे.

तिरुवनंतपुरम - केरळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे गेल्या शंभर वर्षातील सर्वात भीषण महापुराचा सामना केरळला करावा लागला आहे.  केरळमध्ये पुरस्थिती आली असताना दुसरीकडे उर्वरित दक्षिण भारत मात्र दुष्काळाच्या छायेत आहे. केरळ आणि आंध्र प्रदेशचा काही भाग वगळता उर्वरित दक्षिण भारताला दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगाणा आणि रायलसीमा या भागातील 95 जिल्ह्यांपैकी  47 जिल्ह्यात यावेळी सरासरीच्या सुमारे 20 टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला आहे. तर पाच जिल्ह्यांमध्ये 60 टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे. या संपूर्ण भागात मिळून सरासरीपेक्षा  42 टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला आहे. हे प्रमाण पश्चिम राजस्थानपेक्षाही कमी आहे.  तामिळनाडूतील 32 पैकी 22 जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर कर्नाटकच्या अंतर्गत भागातही 21 टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला आहे. याउलट केरळच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. कर्नाटकमध्ये पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक दिसत असले तरी राज्यातील निम्म्या जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडला आहे. कर्नाटकमधील कोडगूसह 15 जिल्ह्यात अधिक पाऊस पडला आहे. तर 15 जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे.  तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मात्र पर्जन्यमान चांगले झाले आहे. तेलंगाणातील 31 पैकी केवळ 6 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर आंध्र प्रदेशच्या किनारी जिह्ल्यांमध्येही सरासरीपेक्षा 21 टक्के अधिक पाऊस झाला आहे. केरळमध्ये सरासरी पेक्षा 40 टक्के अधिक पाऊस झाला आहे. तर मध्य भारतात गुजरात वगळता अन्यत्र सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस झाला आहे. संपूर्ण देशात मिळून सरासरीपेक्षा 7 टक्के कमी पाऊस पडला आहे.  

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018RainपाऊसKeralaकेरळfloodपूरdroughtदुष्काळ