शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

ह्रदयद्रावक... थंडीपासून बचावासाठी केला उपाय, चिमुकलीसह कुटंबातील ३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 12:43 IST

चुरू जिल्ह्यातील रतनगढ पोलीस ठाणे हद्दीतील गौरीसर गावात ही घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे

चुरु - राजस्थानच्या चरु जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी करण्यात आलेली युक्ती जीवघेणी ठरली आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संबंधित कुटुंबाने घरात शेगडीत कोळसा टाकून शेकोटी केली होती. या शेकोटीमुळे खोलीत उब निर्माण झाली. मात्र, घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद असल्याने शेकोटीचा धूर घरातच राहिला. त्यामुळे, जीव गुदमरुन घरातील दोन महिला आणि एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. सकाळी इतर सदस्य झोपेतून उठल्यानंतर त्यांना तात्काळ सुखरुप स्थळी हलवण्यात आले. 

चुरू जिल्ह्यातील रतनगढ पोलीस ठाणे हद्दीतील गौरीसर गावात ही घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. गौरीसर निवासी अमरचंद प्रजापत यांचे कुटुंब शेतात घर करुन राहते. अमरचंद यांचे दोन्ही मुले राजकुमार आणि केदार हे कामानिमित्त गुजरातमध्येच असतात. त्यामुळे, घरी अमरचंद, त्यांची पत्नी सोना देवी, सून गायत्री, ५ वर्षांचा नातू कमल, अडीच वर्षाची नात तेजस्वीनी आणि तीन महिन्यांचा नातू खुशी हे राहत होते. दुर्दैवाने घरात पेटवलेल्या शेकोटीच्या धुरामुळे जीव गुदमरुन कुटुंबातील सोनादेवी, गायत्री आणि चिमुकल्या तेजस्वीनीचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

सोमवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर, ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी, घरातील महिलांना सका ळी आवाज दिला होता, पण कुणीही प्रत्युत्तर दिले नाही, त्यामुळे, स्थानिकांनी घराचे दरवाजे आणि खिडक्या तोडल्यानंतर संबधित घटनेचा उलगडा झाला. 

दरम्यान, जानेवारी महिना सुरु होताच कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात परिसर गारटला असून लोकांकडून थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, मफलर, उब देणारा पोशाख आणि शेकोटी करण्यात येत असल्याचेही दिसून येते. राजस्थानच्या चारु जिल्ह्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी कुटुंबाने घरात शेगडीत जाळ लावला होता. मात्र, थंडीपासून बचावाचा हा मार्ग जीवेघेणा ठरला आहे.  

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीRajasthanराजस्थानPoliceपोलिसDeathमृत्यू