शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

प्रेमासाठी काय पण! तीन सख्ख्या बहिणींचा एकाच तरुणावर जडला जीव; मुलासाठी घरदार सोडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 12:12 IST

Crime News : तीन सख्ख्या बहिणींचं गावातील एकाच तरुणावर प्रेम जडलं. पण त्यांचं हे प्रेम फार काळ लपून राहिलं नाही. 

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. तीन सख्ख्या बहिणींचा एकाच तरुणावर जीव जडल्याची अजब घटना आता समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबीयांनी विरोध केल्यावर मुलासाठी या तिघींनी घरदार सोडलं आहे. उत्तर प्रदेशातील रामपूरमध्येही ही घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन सख्ख्या बहिणींचं गावातील एकाच तरुणावर प्रेम जडलं. पण त्यांचं हे प्रेम फार काळ लपून राहिलं नाही. 

चौघांच्या या हटके प्रेमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना जेव्हा याबाबत कळलं तेव्हा त्यांनी याला कडाडून विरोध झाला. त्यावेळी या मुली मुलासोबत घर सोडून पळून गेल्या आहेत. बेपत्ता झालेल्या मुलींचा सध्या नातेवाईक शोध घेत आहेत. अजीमनगर पोलिस ठाण्याच्या परिसरातील एका गावात या घटनेने खळबळ उडाली आहे. जवळपास एक आठवड्यापूर्वी एका गावातील तीन सख्ख्या बहिणी घरात कुणालाही काहीही न सांगता निघून गेल्या. अचानक तिन्ही मुली बेपत्ता झाल्याने कुटुंबीय आणि नातेवाईक घाबरले. सुरुवातीला कोणालाही याबाबत काहीही न सांगता आधी आपल्या परिने मुलींचा शोध सुरू केला. 

तिन्ही बहिणी एकासोबत पळून गेल्याने गावकरीही चकीत

नातेवाईकांकडे मुलींचा शोध घेतला. ओळखीच्या व्यक्तींकडे तपास केला, पण मुलींचा कुठेच पत्ता लागला नाही. याच दरम्यान गावात ही बातमी पसरली. बेपत्ता असलेल्या तिन्ही बहिणी या एका तरुणासोबत पळून गेल्याचं म्हटलं जात आहे. यातील एक बहिणी ही अल्पवयीन आहे. तिन्ही बहिणी एकासोबत पळून गेल्याने गावकरीही चकीत झाले आहेत. दुसरीकडे त्यांचे कुटुंबीय अजूनही त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांना अद्याप या घटनेची माहिती देण्यात आलेली नाही. तीन बहिणी बेपत्ता झाल्याची कुठलीही तक्रार कुटुंबीयांकडून अद्याप आलेली नाही. पण त्यांनी तक्रार दाखल केल्यास पोलीस त्यांना नक्कीच मदत करतील, असं अजीमनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी रविंद्र कुमार यांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

...अन् प्रेमाचा झाला दुर्दैवी अंत! लग्न न झाल्याने प्रेमीयुगुलाची आत्महत्या; एकाच झाडाला घेतला गळफास

राजस्थानच्या डूंगरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रेमीयुगुलाने लग्न करणं शक्य नसल्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून जीवन संपवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ज्याच्यावर प्रेम करतो, त्याच्यासोबत लग्न होण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे प्रियकर आणि प्रेयसी यांनी एकत्र गळफास घेतल्याची घटना घडली आहे. दोघांनी एकाच ओढणीने कंबरेला बांधून आणि नंतर झाडाला गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. एकमेकांसोबत लग्न होऊ न शकल्याने या दोघांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस