शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

प्रेमासाठी काय पण! तीन सख्ख्या बहिणींचा एकाच तरुणावर जडला जीव; मुलासाठी घरदार सोडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 12:12 IST

Crime News : तीन सख्ख्या बहिणींचं गावातील एकाच तरुणावर प्रेम जडलं. पण त्यांचं हे प्रेम फार काळ लपून राहिलं नाही. 

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. तीन सख्ख्या बहिणींचा एकाच तरुणावर जीव जडल्याची अजब घटना आता समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबीयांनी विरोध केल्यावर मुलासाठी या तिघींनी घरदार सोडलं आहे. उत्तर प्रदेशातील रामपूरमध्येही ही घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन सख्ख्या बहिणींचं गावातील एकाच तरुणावर प्रेम जडलं. पण त्यांचं हे प्रेम फार काळ लपून राहिलं नाही. 

चौघांच्या या हटके प्रेमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना जेव्हा याबाबत कळलं तेव्हा त्यांनी याला कडाडून विरोध झाला. त्यावेळी या मुली मुलासोबत घर सोडून पळून गेल्या आहेत. बेपत्ता झालेल्या मुलींचा सध्या नातेवाईक शोध घेत आहेत. अजीमनगर पोलिस ठाण्याच्या परिसरातील एका गावात या घटनेने खळबळ उडाली आहे. जवळपास एक आठवड्यापूर्वी एका गावातील तीन सख्ख्या बहिणी घरात कुणालाही काहीही न सांगता निघून गेल्या. अचानक तिन्ही मुली बेपत्ता झाल्याने कुटुंबीय आणि नातेवाईक घाबरले. सुरुवातीला कोणालाही याबाबत काहीही न सांगता आधी आपल्या परिने मुलींचा शोध सुरू केला. 

तिन्ही बहिणी एकासोबत पळून गेल्याने गावकरीही चकीत

नातेवाईकांकडे मुलींचा शोध घेतला. ओळखीच्या व्यक्तींकडे तपास केला, पण मुलींचा कुठेच पत्ता लागला नाही. याच दरम्यान गावात ही बातमी पसरली. बेपत्ता असलेल्या तिन्ही बहिणी या एका तरुणासोबत पळून गेल्याचं म्हटलं जात आहे. यातील एक बहिणी ही अल्पवयीन आहे. तिन्ही बहिणी एकासोबत पळून गेल्याने गावकरीही चकीत झाले आहेत. दुसरीकडे त्यांचे कुटुंबीय अजूनही त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांना अद्याप या घटनेची माहिती देण्यात आलेली नाही. तीन बहिणी बेपत्ता झाल्याची कुठलीही तक्रार कुटुंबीयांकडून अद्याप आलेली नाही. पण त्यांनी तक्रार दाखल केल्यास पोलीस त्यांना नक्कीच मदत करतील, असं अजीमनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी रविंद्र कुमार यांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

...अन् प्रेमाचा झाला दुर्दैवी अंत! लग्न न झाल्याने प्रेमीयुगुलाची आत्महत्या; एकाच झाडाला घेतला गळफास

राजस्थानच्या डूंगरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रेमीयुगुलाने लग्न करणं शक्य नसल्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून जीवन संपवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ज्याच्यावर प्रेम करतो, त्याच्यासोबत लग्न होण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे प्रियकर आणि प्रेयसी यांनी एकत्र गळफास घेतल्याची घटना घडली आहे. दोघांनी एकाच ओढणीने कंबरेला बांधून आणि नंतर झाडाला गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. एकमेकांसोबत लग्न होऊ न शकल्याने या दोघांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस