शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"माझा पगार काढून घ्यायचा, दारू पिऊन मला मारायचा"; अतुल सुभाषवर पत्नीने केले होते गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 11:17 IST

बंगळुरुतील अभियंता अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात पत्नीने केलेले आरोपांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Atul Subhash Wife Nikita Singhania : बंगळुरूतील अभियंते अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया आणि सासरच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी अतुल सुभाष यांनी २४ पानांचे पत्र आणि सुमारे दीड तासाचा व्हिडिओ बनवला होता. ज्यामध्ये त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींना आत्महत्येसाठी जबाबदार धरलं होतं. तसेच अतुल यांनी जौनपूरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांवरही गंभीर आरोप केले होते. अतुल सुभाष यांच्यावर त्यांच्या पत्नीने नऊ गुन्हे दाखल केले होते. मात्र आता अतुलच्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे समोर आलं आहे.

मुळचे उत्तर प्रदेशातील असलेल्या अतुल सुभाष यांनी सोमवारी बंगळुरूच्या मुन्नेकोलाल येथे राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यानंतर अतुल यांचा भाऊ विकास कुमार यांनी पत्नी निकिता सिंघानिया, तिची आई निशा, भाऊ अनुराग आणि काका सुशील यांच्याविरोधात बंगळुरूच्या मराठाहळ्ळी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. बुधवारी बंगळुरू पोलिसांचे पथक या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेशला गेलं आहे.

मात्र अतुल सुभाष यांच्या आत्महत्येबाबत बेंगळुरू पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, असे उत्तर प्रदेशच्या जौनपूर पोलिसांनी म्हटलं आहे. सुभाषची पत्नी निकिता सिंघानिया जौनपूरची रहिवासी आहे. तिने हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली २०२२ मध्ये अतुल, त्याचा भाऊ आणि पालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. जौनपूर पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, २४ एप्रिल २०२२ रोजी निकिताने स्थानिक पोलीस ठाण्यात सुभाषविरोधात गुन्हा दाखल केला होता. महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका यांनी या प्रकरणाचा तपास करत ३० ऑगस्ट २०२२ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

निकिताचे नातेवाईक सुरेंद्र सिंघानिया यांनी सांगितले की, "निकिता आणि अतुल यांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि लग्नानंतर दोघेही बंगळुरूमध्ये काम करत होते आणि तिथेच राहत होते. त्यांना एक मुलगाही झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून निकिताला अतुलकडून घटस्फोट घ्यायचा होता आणि त्यासाठी जौनपूर न्यायालयात तिने तीन-चार खटले दाखल केले होते. सध्या निकिता तिच्या मुलासोबत दिल्लीत राहते आणि तिथे काम करते."

अतुलविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांमध्ये निकिताची बाजू मांडणारे वकील दिनेश मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले की,"निकिताने अतुलविरुद्ध अनेक खटले दाखल केले आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचा खटला कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणी निकिताने स्वत:च्या आणि मुलाच्या पालनपोषणासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने अतुलला पत्नीच्या पालनपोषणासाठी दरमहा ४० हजार रुपये देण्याचे निर्देश देण्याचा आदेश दिला होता. जुलै महिन्यापासून आपण अतुलशी भेटलो किंवा बोललो नाही. अतुल नैराश्यात आहे किंवा मानसिक तणावाचा बळी आहे, असे कधीच वाटले नाही."

निकिताने दोन वर्षापूर्वी जौनपूरमध्ये हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचा आरोप करत तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये तिचा पती, सासू, सासरे आणि भावजय यांना आरोपी करण्यात आले होते. निकिताने दावा केला की, "माझा नवरा दारू पिऊन मला मारहाण करायचा. तो मला धमकावायचा आणि माझा संपूर्ण पगार माझ्या खात्यातून स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करायचा. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळामुळे माझ्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली आणि १७ ऑगस्ट २०१९ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता."

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDomestic Violenceघरगुती हिंसा