शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 08:19 IST

रयाणामधील पराभवानंतर काँग्रेसने दिल्लीत झालेल्या बैठकीत अचानक आपली रणनीती बदलली आहे.

Haryana Assembly Election : हरयाणात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. हरयाणाच्या निवडणुकीच्या निकालात मतमोजणीत गैरप्रकार झाल्याची तक्रार काँग्रेसने केली होती. याप्रकरणी काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मतदानासाठी वापरलेले ईव्हीएम हॅक झाल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले. त्यामुळे २० जागांच्या निकालात फेरफार झाल्याचा दावा काँग्रेसने केला होता. मात्र आता हरयाणामधील पराभवानंतर काँग्रेसने अचानक आपली रणनीती बदलली आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन कोणतीही टीका करणार नसल्याचे काँग्रेसने ठरवलं आहे.

हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते ईव्हीएमवरुन निवडणूक आयोगावर आरोप करत होते. मात्र आता काँग्रेस पक्षाने रणनीती बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ईव्हीएमला लक्ष्य करण्याऐवजी पक्षाला आता अंतर्गत समस्यांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. हरयाणात विजयाच्या जवळ जावून देखील तो मिळवता न आल्याने काँग्रेस आता पक्षातील उणिवा शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. काँग्रेसने यापूर्वी ईव्हीएमवर आरोप केले होते आणि निवडणुकीचे निकाल चुकीचे असल्याचे म्हटले होते. आता काँग्रेसच्या रणनीतीकारांनी ठरवले आहे की ते पुरेशा पुराव्याशिवाय ईव्हीएमवर हल्ला करणार नाहीत.

हरयाणातील पराभवावर काँग्रेस पक्षाने गुरुवारी आढावा बैठक बोलावली होती. पक्षांतर्गत गटबाजी आणि इतर चुका दूर करण्यावर आता पक्ष भर देणार असल्याचे या बैठकीत ठरवण्यात आलं. तसेच ईव्हीएम छेडछाडीचे ठोस पुरावे मिळेपर्यंत आपण हा मुद्दा उपस्थित करणार नाहीत आणि पक्षातील अंतर्गत उणिवा ओळखून त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पक्षाच्या हायकमांडने म्हटल. गुरुवारी संध्याकाळी मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयातून यासंदर्भात एक पत्र जारी करण्यात आले आहे. पक्षाने एक तांत्रिक टीम तयार केली आहे जी ईव्हीएम आणि मतदानाबाबत उमेदवारांनी केलेल्या तक्रारींची तपासणी करेल आणि खऱ्या उणिवा शोधून काढेल, असे या पत्रात म्हटलं आहे.

फॅक्ट फाइंडिंग टीमच्या अहवालानुसारच काँग्रेस  ईव्हीएम बाबत कोणतीही प्रतिक्रिया देईल, असे या पत्रात म्हटले आहे. मतमोजणी प्रक्रिया आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या कार्यपद्धतीवर तथ्य-शोधन पथकाच्या अहवालाच्या आधारे काँग्रेस सविस्तर प्रतिक्रिया देईल, असे खरगे यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाची बाब म्हणजे हरयाणाचे माजी मुख्यमंत्री बीएस हुड्डा आणि त्यांच्या विश्वासू लोकांव्यतिरिक्त, माजी केंद्रीय मंत्री कुमारी शैलजा आणि त्यांचे सहकारी रणदीप सिंग सुरजेवाला यांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आले नव्हते. निवडणुकीदरम्यान माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आणि कुमारी सेलजा यांच्यात तणाव निर्माण झाला होता. कुमारी सेलजा यांनी बराच काळ निवडणूक प्रचारात भाग घेतला नाही. हरयाणातील पराभवानंतर या दोन्ही गटांचे लोक एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत. मात्र या बैठकीत पक्षाचे हित सर्वोपरि असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी पक्षश्रेष्ठींना आपसातील मतभेद बाजूला ठेवून पक्षासाठी काम करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे