शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 16:09 IST

Haryana Election 2024 : भाजपने सलग दिसऱ्यांना हरयाणा विधानसभा निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे.

Haryana Election 2024 : आज हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने सत्ता काबीज केली आहे. तर, हरयाणात भाजपचा सलग तिसऱ्यांदा विजय झाला आहे. या हॅट्रीकसह नायब सिंह सैनी दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. हरयाणात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे अनेकजण सांगत होते. त्यामुळे, आजचा हा निकाल अनेकांना धक्कादायक वाटत असेल, पण असे नाही. भाजपचे राजकारण आणि रणनीती बारकाईने जाणून घेतल्यास हरयाणाचा निकाल तुम्हाला धक्कादायक वाटणार नाही.

लोकसभा निवडणुकीतील कामगिरीनंतर आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसने हरयाणा विधानसभा निवडणुकीत शेतकरी, सैनिक आणि पैलवानांचा मुद्दा बराच उचलून धरला होता. विशेषत: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसने भाजपवर चौफेर टीका केली होती. हरियाणात काँग्रेसचे सरकार आल्यास शंभू सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांना आपल्या माडण्यांसाठी दिल्लीला जाणाऱ्या हरियाणाच्या सीमा खुल्या केल्या जातील, असेही काँग्रेसकडून सांगण्यात आले. विशेषत: जाट समाजाला भाजपपासून दूर करण्यासाठी बरीच रणनीती आखण्यात आली.

हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...

एकंदरीत, हरयाणातील शेतकरी भाजपवर नाराज आहेत, ते भाजपला आता धडा शिकवतील, असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आता ज्या पद्धतीने निकाल येत आहेत, त्यावरुन असे दिसते की, शेतकरी भाजपवर नाराज नसून, खुश आहेत. आता प्रश्न पडतो की, मतदानापूर्वी भाजपच्या विरोधात फिरणारे वारे अचानक भाजपच्या दिशेने कसेकाय फिरू लागले? भाजपने नेमकी कोणती रणनीती अवलंबली, ज्यामुळे पक्षाचा एकहाती विजय झाला.

शेतकरी खरच नाराज होते का?हरयाणा निवडणुकीतील दुसरा सर्वात मोठा मुद्दा 'जवानांचा' होता. काँग्रेसने अग्निवीर योजनेचा संबंथ हरयाणाशी जोडला. याचे कारण म्हणजे, लष्करातील सुमारे 10 टक्के सैनिक हरयाणातील आहेत. हरयाणाची लोकसंख्या 3 कोटींच्या आसपास आहे. एवढेच नाही तर शेतकरी आणि सैनिकांचा प्रश्न हरयाणातील प्रत्येक घराशी संबंधित आहे. केंद्र सरकारची 'अग्नवीर योजना' ही सैनिकांचा सर्वात मोठा विश्वासघात असल्याचे काँग्रेसने म्हटले. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने देशभरात हेच मुद्दे मांडले होते. हरयाणात भाजप-काँग्रेसने लोकसभेच्या 5-5 जागा जिंकल्या होत्या.  तर, हरियाणाच्या 'जाट'बहुल भागात भाजपला ज्या प्रकारे यश मिळतंय, ते पाहता शेतकरी आणि सैनिकांचा मुद्दाच कुठे आहे? असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. या निकालावरुन हेही स्पष्ट होईल की, 'अग्नीवीर योजने'बाबत विरोधक जो नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होते, त्याचा स्थानिक पातळीवर काहीही परिणाम झालेला नाही. 

भाजपची रणनीती कामी आलीदुसरीकडे, भाजपच्या विजयाचे श्रेय त्यांच्या रणनीतीलाही जाते. हरयाणा निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या रणनीतीत थोडासा बदल करुन किसान सन्मान निधीची रक्कम 6 रुपयांवरून 10 रुपये करण्याची घोषणा केली. तसेच, अग्निवीरबाबत भाजपने हरियाणातील प्रत्येक अग्निवीराला कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कायमस्वरूपी नोकरी मिळते, मग भाजपवर नाराजी कशाला, असा संदेश जनतेत गेला. यामुळेच भाजपला जनतेचा पाठिंबा मिळाला. आता भाजप त्याचे भांडवल देशातील इतर राज्यांमध्येही करेल, असे म्हणता येईल. यासोबतच अग्निवीर योजनेची मान्यताही वाढली असून, ज्या मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत, त्या मागण्यांचाही विचार करावा लागणार आहे.

हरियाणात हॅटट्रिक...भाजपसाठी बूस्टर डोसलोकसभा निवडणुकीनंतर हरियाणा निवडणूक ही भाजपसाठी लिटमस टेस्ट होती. या चाचणीत भाजपला जोरदार यश मिळाले असून, आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुका होणार आहेत. तिथे हरियाणा निवडणुकीचा स्पष्ट संदेश जाईल की, शेतकरी आणि सैनिक भाजपसोबत आहेत. हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करत आहे, भाजपसाठी मोठा दिलासा आहे.

 

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी