शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 16:09 IST

Haryana Election 2024 : भाजपने सलग दिसऱ्यांना हरयाणा विधानसभा निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे.

Haryana Election 2024 : आज हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने सत्ता काबीज केली आहे. तर, हरयाणात भाजपचा सलग तिसऱ्यांदा विजय झाला आहे. या हॅट्रीकसह नायब सिंह सैनी दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. हरयाणात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे अनेकजण सांगत होते. त्यामुळे, आजचा हा निकाल अनेकांना धक्कादायक वाटत असेल, पण असे नाही. भाजपचे राजकारण आणि रणनीती बारकाईने जाणून घेतल्यास हरयाणाचा निकाल तुम्हाला धक्कादायक वाटणार नाही.

लोकसभा निवडणुकीतील कामगिरीनंतर आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसने हरयाणा विधानसभा निवडणुकीत शेतकरी, सैनिक आणि पैलवानांचा मुद्दा बराच उचलून धरला होता. विशेषत: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसने भाजपवर चौफेर टीका केली होती. हरियाणात काँग्रेसचे सरकार आल्यास शंभू सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांना आपल्या माडण्यांसाठी दिल्लीला जाणाऱ्या हरियाणाच्या सीमा खुल्या केल्या जातील, असेही काँग्रेसकडून सांगण्यात आले. विशेषत: जाट समाजाला भाजपपासून दूर करण्यासाठी बरीच रणनीती आखण्यात आली.

हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...

एकंदरीत, हरयाणातील शेतकरी भाजपवर नाराज आहेत, ते भाजपला आता धडा शिकवतील, असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आता ज्या पद्धतीने निकाल येत आहेत, त्यावरुन असे दिसते की, शेतकरी भाजपवर नाराज नसून, खुश आहेत. आता प्रश्न पडतो की, मतदानापूर्वी भाजपच्या विरोधात फिरणारे वारे अचानक भाजपच्या दिशेने कसेकाय फिरू लागले? भाजपने नेमकी कोणती रणनीती अवलंबली, ज्यामुळे पक्षाचा एकहाती विजय झाला.

शेतकरी खरच नाराज होते का?हरयाणा निवडणुकीतील दुसरा सर्वात मोठा मुद्दा 'जवानांचा' होता. काँग्रेसने अग्निवीर योजनेचा संबंथ हरयाणाशी जोडला. याचे कारण म्हणजे, लष्करातील सुमारे 10 टक्के सैनिक हरयाणातील आहेत. हरयाणाची लोकसंख्या 3 कोटींच्या आसपास आहे. एवढेच नाही तर शेतकरी आणि सैनिकांचा प्रश्न हरयाणातील प्रत्येक घराशी संबंधित आहे. केंद्र सरकारची 'अग्नवीर योजना' ही सैनिकांचा सर्वात मोठा विश्वासघात असल्याचे काँग्रेसने म्हटले. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने देशभरात हेच मुद्दे मांडले होते. हरयाणात भाजप-काँग्रेसने लोकसभेच्या 5-5 जागा जिंकल्या होत्या.  तर, हरियाणाच्या 'जाट'बहुल भागात भाजपला ज्या प्रकारे यश मिळतंय, ते पाहता शेतकरी आणि सैनिकांचा मुद्दाच कुठे आहे? असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. या निकालावरुन हेही स्पष्ट होईल की, 'अग्नीवीर योजने'बाबत विरोधक जो नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होते, त्याचा स्थानिक पातळीवर काहीही परिणाम झालेला नाही. 

भाजपची रणनीती कामी आलीदुसरीकडे, भाजपच्या विजयाचे श्रेय त्यांच्या रणनीतीलाही जाते. हरयाणा निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या रणनीतीत थोडासा बदल करुन किसान सन्मान निधीची रक्कम 6 रुपयांवरून 10 रुपये करण्याची घोषणा केली. तसेच, अग्निवीरबाबत भाजपने हरियाणातील प्रत्येक अग्निवीराला कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कायमस्वरूपी नोकरी मिळते, मग भाजपवर नाराजी कशाला, असा संदेश जनतेत गेला. यामुळेच भाजपला जनतेचा पाठिंबा मिळाला. आता भाजप त्याचे भांडवल देशातील इतर राज्यांमध्येही करेल, असे म्हणता येईल. यासोबतच अग्निवीर योजनेची मान्यताही वाढली असून, ज्या मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत, त्या मागण्यांचाही विचार करावा लागणार आहे.

हरियाणात हॅटट्रिक...भाजपसाठी बूस्टर डोसलोकसभा निवडणुकीनंतर हरियाणा निवडणूक ही भाजपसाठी लिटमस टेस्ट होती. या चाचणीत भाजपला जोरदार यश मिळाले असून, आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुका होणार आहेत. तिथे हरियाणा निवडणुकीचा स्पष्ट संदेश जाईल की, शेतकरी आणि सैनिक भाजपसोबत आहेत. हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करत आहे, भाजपसाठी मोठा दिलासा आहे.

 

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी