शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

haryana election 2019 : ना विरोधक, ना आव्हान; हरयाणात भाजपाला मोकळं मैदान?

By बाळकृष्ण परब | Updated: October 17, 2019 14:37 IST

सध्या महाराष्ट्रासोबत अजून एका राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. मात्र महाराष्ट्राच्या तुलनेत फार लहान असल्याने तिथल्या राजकीय लढाईची चर्चा फारशी होताना दिसत नाही आहे.

- बाळकृष्ण परब सध्या महाराष्ट्रासोबत अजून एका राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. मात्र महाराष्ट्राच्या तुलनेत फार लहान असल्याने तिथल्या राजकीय लढाईची चर्चा फारशी होताना दिसत नाही आहे. त्या राज्याचे नाव आहे हरयाणा. उत्तर भारतात दिल्ली उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांच्या मध्ये असलेल्या हरयाणामध्ये सत्ताधारी भाजपा, प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस तसेच इंडियन नॅशनल लोकदल आणि जननायक जनता पार्टी यांच्यामध्ये मुख्य लढत आहे. या पक्षांशिवाय बसपा, शिरोमणी अकाली दल आणि अन्य पक्ष रिंगणात आहे. मात्र येथील सध्याच्या एकंदरीत राजकीय परिस्थितीचं वर्णन ना विरोधक ना आव्हान सत्ताधारी भाजपाला मोकळं मैदान, असंच करावं लागणार आहे. भाजपा हा उत्तर भारतीय पक्ष असला तरी भाजपाला 2014 पर्यंत हरयाणामध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नव्हती. नाही म्हणायला इंडियन नॅशनल लोकदलसोबत आघाडीत असताना भाजपाला हरयाणात सत्तेचा स्वाद मिळाला होता. मात्र इंडियन नॅशनल लोकदलशी असलेली युती तुटल्यानंतर राज्यात भाजपाची अवस्था बिकट झाली होती. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोदीलाटेचा पुरेपूर लाभ घेत हरयाणामध्ये पूर्ण बहुमत मिळवून  स्वबळावर सत्ता सत्ता स्थापन केली होती. तेव्हापासून गेल्या पाच वर्षांत भाजपाने राज्यातील आपले स्थान सातत्याने बळकट केले आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने राज्यातील दहा पैकी दहा जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने  75+ जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे.   

मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली हरयाणात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारने फार काही आश्वासक काम केलेले आहे, अशातला भाग नाही. महिला सुरक्षा, शेती यासारख्या क्षेत्रातील समस्या जैसे थेच आहेत. त्यात स्वत: मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि त्यांच्या सरकारमधील अनिल विज यांच्यासारखे मंत्री त्यांच्या कामांपेक्षा वादग्रस्त वक्तव्यांसाठीच चर्चेत राहिले. मात्र विरोधी पक्षांमध्ये असलेल्या विस्कळीतपणामुळे भाजपाविरोधात वातावरणनिर्मिती होऊ शकली नाही. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी ''निकम्मी सरकार, विपक्ष बेकार'' अशा शब्दात हरयाणातील राजकीय परिस्थितीचे वर्णन केले होते.
हरयाणातील विरोधी पक्षांकडे पाहिल्यास सर्वच पक्षांमध्ये एकप्रकारचा विस्कळीतपणा दिसून येत आहे. राज्यात मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस अंतर्गत हेव्यादाव्यांनी पूर्णपणे पोखरून गेला आहे. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसची राज्यातील संघटना पूर्णपणे मोडकळीस आली आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री भुपेंद्र सिंह हुड्डा यांनी काही महिन्यांपूर्वी बंड केले होते. मात्र हे बंड थोपवण्यात पक्षश्रेष्ठींना यश आल्याने राज्यात काँग्रेसला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पण या सर्व गोंधळात काँग्रेस संघटनात्मकदृष्ट्या खूप कमकुवत झाली आहे. 
राज्यातील अन्य एक विरोधी पक्ष असलेल्या इंडियन नॅशनल लोकदल पक्षाची अवस्थाही अशीच झालेली आहे. पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. तर चौटाला कुटुंबातील वादामुळे पक्षाचे दोन तुकडे पडले आहेत. त्यातून दुष्यंत चौटाला यांनी जननायक जनता पार्टी हा नवा पक्ष स्थापन केला आहे. हरयाणातील जाटबहूल भागात या दोन्ही पक्षांची ताकद आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या लढाईत जाट मतांची विभागणी होईल हे निश्चित आहे. साहजिकच त्याचा लाभ भाजपाला होणार आहे. 
त्यामुळे राज्यातील एकंदरीत चित्र पाहता येथे भाजपाचे पारडे खूप जड आहे. एकीकडे केंद्रातील नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे नेतृत्व, राज्यात स्थिरस्थावर झालेले मनोहरलाल खट्टर आणि इतर स्थानिक नेते यामुळे संघटनात्मकदृष्टा भाजपा मजबूत स्थितीत आहे. त्यातच विरोधात तीन वेगवेगळे पक्ष लढत असल्याने विरोधी पक्षांचे होणारे मतविभाजनही भाजपाच्या पथ्थ्यावर पडणार आहे. एकूणच सध्याच्या परिस्थितीत हरयाणामध्ये भाजपाला रोखणे विरोधी पक्षांसाठी अवघड जाणार असल्याचेच चिन्ह दिसत आहे. मात्र सर्व परिस्थिती अनुकूल असताना भाजपाचे मिशन 75+ यशस्वी होते का नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :haryana election 2019हरियाणा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसIndian National Lok Dalइंडियन नॅशनल लोकदलHaryanaहरयाणा