केंद्रीय कृषिमंत्री शनिवारी जिल्हा दौर्यावर गारपीटग्रस्त भागाची पाहणी : अधिकार्यांची धावपळ
By Admin | Updated: March 21, 2015 00:11 IST2015-03-20T22:40:02+5:302015-03-21T00:11:28+5:30
नाशिक : गेल्या दोन आठवड्यांपासून सातत्याने होणारी गारपीट व अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग हे शनिवारी नाशिक जिल्ाच्या दौर्यावर येत असून, निफाड तालुक्यातील काही गावांना ते भेटी देणार असल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

केंद्रीय कृषिमंत्री शनिवारी जिल्हा दौर्यावर गारपीटग्रस्त भागाची पाहणी : अधिकार्यांची धावपळ
नाशिक : गेल्या दोन आठवड्यांपासून सातत्याने होणारी गारपीट व अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग हे शनिवारी नाशिक जिल्ाच्या दौर्यावर येत असून, निफाड तालुक्यातील काही गावांना ते भेटी देणार असल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
गारपिटीने द्राक्ष, कांदा, गहू पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी सातत्याने केली जात असून, संसदेच्या अधिवेशनातही केंद्र सरकारचे याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यावर केंद्र सरकारच्या एका समितीने दोन दिवसांपूर्वीच निफाड तालुक्याचा दौरा केला आहे. शेतकर्यांना नुकसानीच्या मोबदल्यात आर्थिक मदत व कर्जमाफी देण्याच्या दृष्टीने कृषिमंत्र्यांच्या दौर्याला महत्त्व प्राप्त झाले असून, शनिवारी दिल्लीहून खास विमानाने ते सकाळी ओझर विमानतळावर येतील व तेथून निफाड तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन अधिकार्यांकडून माहिती जाणून घेणार आहेत. दुपारी अडीच वाजता ते दौरा आटोपून मुंबईकडे रवाना होतील.