शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

कायदेशीर लढाईसाठी टाटा सन्सकडून हरीश साळवे, अभिषेक मनू सिंघवीची टीम ?

By admin | Published: October 25, 2016 10:44 AM

सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी हटवल्यानंतर टाटा सन्सने प्रसिद्ध वकील हरीश साळवे आणि अभिषेक मनू सिंघवी यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २५ - टाटा उद्योगसमूहाच्या चेअरमनपदावरुन सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी हटवल्यानंतर टाटा सन्सने प्रसिद्ध वकील हरीश साळवे आणि अभिषेक मनू सिंघवी यांची नियुक्ती करण्याचे संकेत दिले आहेत. या निर्णयानंतर कायदेशीर अडचण उदभवू शकते याची टाटा सन्सला पूर्ण कल्पना असल्याने त्यांना हरीश साळवे आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्याशी सल्लामसलत केली आहे अशी माहिती इकोनॉमिक्स टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिली. 
 
मिस्त्रींना चेअरमनपदावरुन हटवण्यापूर्वी वकिलांचा कायदेशीर सल्ला घेतला होता असे सूत्रांनी इकोनॉमिक्स टाइम्सला सांगितले. या निर्णयाचे काय परिणाम होऊ शकतात यासंबंधी टाटा समूहाने सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आर.व्ही.रवींद्रन आणि वरिष्ठ वकिल पी. चिंदबरम यांच्याशी चर्चा केली होती. अशा प्रकरणांमध्ये निर्णय घेण्याआधी मोठया कंपन्या नेहमी वकिलांचा सल्ला घेतात. 
 
साळवे आणि सिंघवी यांच्याशिवाय टाटा सन्सची अन्य वकिलांबरोबरही चर्चा सुरु आहे. समूहाच्या संचालक मंडळाकडे चेअरमनला पदावरुन बर्खास्त करण्याचा अधिकार असतो असे कॉर्पोरेट वकिलांनी सांगितले. सायरस मिस्त्री यांचे वडिल शापूरजी-पालनजी यांचा टाटा सन्समध्ये सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत. शेअरहोल्डर या नात्याने केलेली शिफारसही सायरस मिस्त्री यांच्या निवडीमध्ये महत्वपूर्ण ठरली होती. शापूरजी-पालनजी समूहाने तडकाफडकी सायरस मिस्त्री यांना पदावरुन हटवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.