शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

हारी बाजी को जितना उन्हे आता है!!!

By balkrishna.parab | Updated: December 18, 2017 19:00 IST

22 वर्षांपासून गुजरातमधील सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधात सत्ताविरोधी वातावरण निर्माण झाले होते. त्यातच राहुल गांधींचा झंझावाती प्रचार, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी सुरू केलेला झांझावाती प्राचार यामुळे गुजरातमध्ये भाजपाचा पराभव होणार की काय असे चित्र निर्माण झाले होते. मात्र...

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमताचा आकडा गाठताना भाजपाची पुरती दमछाक झाली. पण अडखळत धडपडत का होईना भाजपाला बहुमताचा जादुई आकडा गाठून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यशस्वी ठरले. जीएसटी, नोटाबंदीमुळे असलेली नाराजी, पटेल आरक्षणाचा पेटलेला मुद्दा, शेतकऱ्यांचे प्रश्न यामुळे 22 वर्षांपासून गुजरातमधील सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधात सत्ताविरोधी वातावरण निर्माण झाले होते. त्यातच राहुल गांधींचा झंझावाती प्रचार, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी सुरू केलेला झांझावाती प्राचार यामुळे गुजरातमध्ये भाजपाचा पराभव होणार की काय असे चित्र निर्माण झाले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी बिकट परिस्थितीत मोर्चा सांभाळत भाजपाला हरलेली बाजी दिंकून दिली.  खरंतर गुजरात हा भाजपाचा बालेकिल्ला, हिंदुत्वाची प्रयोगशाळा, मोदींच्या विकासाचे मॉडेल वगैरै वगैरे असल्याने काही झालं तरी गुजराती मतदार भाजपाला साथ देणार हे निश्चित मानले जायचे. 1995 पासून झालेल्या गुजरात विधानसभांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकीत भाजपाने भक्कम बहुमत मिळवलेले. त्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत तर गुजरातमधून लोकसभेच्या 26 पैकी 26 जागा भाजपाने जिंकलेल्या. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीतही भाजपाचा विजय हा निश्चित मानला जात होता. मात्र प्रत्यक्षात दीर्घकाळापासून सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधात गुजरातमध्ये नाराजी मूळ धरत होती. पाटीदार आंदोलनातून या नाराजीला तोंड फुटले. पुढे दलित अत्याचाराच्या मुद्यावरून जिग्नेश मेवाणी आणि ओबीसींच्या प्रश्नावरून अल्पेश ठाकोर याने संघटन सुरू केले. जीएसटीच्या मुद्द्यावरून व्यापाऱ्यांच्या नाराजीला हवा मिळाली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने कधी नव्हे ती गुजरातमध्ये आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली. राहुल गांधीच्या मंदिर भेटीमुळे हिंदुत्ववाचा मुद्दा बोथट झाला. त्यांच्या सभांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळेही भाजपाच्या गोटात धाकधुक निर्माण झाली होती. प्रचाराला सुरुवात झाल्यावर तर काँग्रेसने गुजरात गमावल्यात जमा होते. परिस्थिती प्रतिकूल असताना अखेर अमित शहा आणि नरेंद्र मोदींना मोर्चा सांभाळावा लागला. काँग्रेसच्या जातीय समीकरणावर उतारा म्हणून अमित शहांनी धर्माचे कार्ड खेळण्याचा जुगार खेळला. तर मोदींनीही आपल्या प्रचारसभांमधून पाकिस्तान, गुजराती अस्मिता आदी मुद्द्यांना हवा दिली. त्यात मणिशंकर अय्यर यांचे वक्तव्य पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या भाजपासाठी टॉनिकचे काम केले. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे तर राहुल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी केलेल्या बाउन्सरच्या माऱ्यावर गुजरातमधील भाजपा इतकेच काय खुद्द अमित शहा व मोदींची जोडी पुरती शेकून निघाली होती. मात्र याचदरम्यान मणिशंकर अय्यर यांनी मोदींचा नीच असा उल्लेख करून मोदी आणि भाजपाला फुलटॉस दिला. या संधीचा लाभ उठवणार नाहीत ते मोदी आणि भाजपाई कसले. त्यांनी या वक्तव्याच्या जोरावर मतदानाच्या शेवटच्या टप्पात काँग्रेसच्या बाजूने वाहत असलेली हवा आपल्या दिशेने फिरवली. त्यात अमित शहांनी पन्ना प्रमुख ही संकल्पना राबवून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. भूतकाळात केलेल्या विकासकामांना उजाळा देत मोदींनी जनतेला भावनिक साद घातली. या सर्वांचा परिणाम म्हणून गुजरातमधील जवळपास हरलेली निवडणूक भाजपाला जिंकता आली. पण मिळालेल्या कौलामधून भाजपाला इशाराही मिळालाय. त्याची गंभीर दखल न घेतल्यास भाजपाची भविष्यातील वाटचाल अडचणीची होई शकेल.  

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपा