शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Afghanistan Taliban Crisis: “शेजारी राष्ट्रामधील अस्थिरता CAA ची गरज अधोरेखित करते”; केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 16:13 IST

Afghanistan Taliban Crisis: एका केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या शेजारील राष्ट्रांमधील अस्थिर स्थिती नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (CAA) गरज अधोरेखित करत असल्याचे मत व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली:तालिबाननेअफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तेथे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तालिबान सरकारला मान्यता द्यावी की नाही, यावर संमिश्र प्रतिक्रिया जगभरातून उमटताना दिसत आहे. भारतही या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. यातच आता एका केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या शेजारील राष्ट्रांमधील अस्थिर स्थिती नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (CAA) गरज अधोरेखित करत असल्याचे मत व्यक्त केले आहे. (hardeep singh puri says caa necessary over afghanistan taliban crisis)

अफगाणिस्तानमध्ये आताच्या घडीला अराजकासारखी स्थिती आहे. तालिबान अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला मान्यता मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. यातच केंद्रीयमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट करून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची गरज अधोरेखित झाल्याचे म्हटले आहे. 

Taliban ला मोठा धक्का! आर्थिक कोंडी करण्यासाठी IMF ने घेतला महत्त्वाचा निर्णय

CAA गरजेचे आहे

अफगाणिस्तानमधून मायदेशात परतलेल्या काही शिख आणि हिंदू बांधनांबाबतचे एक वृत्त शेअर करत हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे की, आपल्या शेजारी म्हणजे अफगाणिस्तानधील अस्थिर परिस्थिती आणि ताज्या घटनांचा आढावा घेतला, तर आपले शिख आणि हिंदू बांधव अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे, याची केवळ कल्पनाच केली जाऊ शकते. अशा परिस्थिती भारताने केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित होते, असे ट्विट हरदीप सिंग पुरी यांनी केले आहे. 

तालिबानने भारतातून होणारी आयात-निर्यात रोखली; अफगाणिस्तानातील सत्तांतरानंतर निर्णय

अफगाणिस्तानातील हिंदू, शीख बांधवांना आश्रय देणार

अफगाणिस्तानातील परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक मोठी बैठक झाली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारताने केवळ आपल्या नागरिकांचेच संरक्षण नव्हे, तर ज्या शीख आणि हिंदू अल्पसंख्यकांची भारतात येण्याची इच्छा आहे, त्यांचेही संरक्षण करायला हवे आणि त्यांना आश्रयही द्यायला हवा. एढेच नाही, तर आपण त्यांना शक्य ती सर्व प्रकारची मदतही करायला हवी. तसेच मदतीसाठी भारताकडे डोळे लावून बसलेल्या आपल्या अफगान भाऊ आणि बहिणींना मदद केली जाईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारतcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक