शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

Afghanistan Taliban Crisis: “शेजारी राष्ट्रामधील अस्थिरता CAA ची गरज अधोरेखित करते”; केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 16:13 IST

Afghanistan Taliban Crisis: एका केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या शेजारील राष्ट्रांमधील अस्थिर स्थिती नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (CAA) गरज अधोरेखित करत असल्याचे मत व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली:तालिबाननेअफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तेथे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तालिबान सरकारला मान्यता द्यावी की नाही, यावर संमिश्र प्रतिक्रिया जगभरातून उमटताना दिसत आहे. भारतही या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. यातच आता एका केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या शेजारील राष्ट्रांमधील अस्थिर स्थिती नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (CAA) गरज अधोरेखित करत असल्याचे मत व्यक्त केले आहे. (hardeep singh puri says caa necessary over afghanistan taliban crisis)

अफगाणिस्तानमध्ये आताच्या घडीला अराजकासारखी स्थिती आहे. तालिबान अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला मान्यता मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. यातच केंद्रीयमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट करून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची गरज अधोरेखित झाल्याचे म्हटले आहे. 

Taliban ला मोठा धक्का! आर्थिक कोंडी करण्यासाठी IMF ने घेतला महत्त्वाचा निर्णय

CAA गरजेचे आहे

अफगाणिस्तानमधून मायदेशात परतलेल्या काही शिख आणि हिंदू बांधनांबाबतचे एक वृत्त शेअर करत हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे की, आपल्या शेजारी म्हणजे अफगाणिस्तानधील अस्थिर परिस्थिती आणि ताज्या घटनांचा आढावा घेतला, तर आपले शिख आणि हिंदू बांधव अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे, याची केवळ कल्पनाच केली जाऊ शकते. अशा परिस्थिती भारताने केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित होते, असे ट्विट हरदीप सिंग पुरी यांनी केले आहे. 

तालिबानने भारतातून होणारी आयात-निर्यात रोखली; अफगाणिस्तानातील सत्तांतरानंतर निर्णय

अफगाणिस्तानातील हिंदू, शीख बांधवांना आश्रय देणार

अफगाणिस्तानातील परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक मोठी बैठक झाली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारताने केवळ आपल्या नागरिकांचेच संरक्षण नव्हे, तर ज्या शीख आणि हिंदू अल्पसंख्यकांची भारतात येण्याची इच्छा आहे, त्यांचेही संरक्षण करायला हवे आणि त्यांना आश्रयही द्यायला हवा. एढेच नाही, तर आपण त्यांना शक्य ती सर्व प्रकारची मदतही करायला हवी. तसेच मदतीसाठी भारताकडे डोळे लावून बसलेल्या आपल्या अफगान भाऊ आणि बहिणींना मदद केली जाईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारतcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक