शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

आंध्र प्रदेशात रॅगिंगप्रकरणी ५४ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर कडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 2:21 PM

आंध्र प्रदेशच्या राजीव गांधी माहिती आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील ५४ विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी व्यवस्थापनाकडून कडक  कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे आंध्र प्रदेशच्या राजीव गांधी माहिती आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील ५४ विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी व्यवस्थापनाकडून कडक  कारवाई करण्यात आली आहे. . गेल्या महिन्यात विद्यापीठात शिकणाऱ्या काही सिनिअर विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थ्यांचं रॅगिंग केल्याचा प्रकार घडला होता.सर्व विद्यार्थ्यांवर सोमवारी विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली.

हैदराबाद, दि. 19- आंध्र प्रदेशच्या राजीव गांधी माहिती आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील ५४ विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी व्यवस्थापनाकडून कडक  कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात विद्यापीठात शिकणाऱ्या काही सिनिअर विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थ्यांचं रॅगिंग केल्याचा प्रकार घडला होता. या सर्व विद्यार्थ्यांवर सोमवारी विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

२९ ऑगस्ट रोजी विद्यापाठीतील सिनिअर विद्यार्थ्यांनी १२ ज्युनिअर विद्यार्थ्यांना एका रूममध्ये नेऊन त्यांना शिक्षा दिली होती. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. काही विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागंल. त्यानंतर पीडित विद्यार्थ्यांनी या सगळ्याविरोधात तक्रार विद्यापीठ व्यवस्थापनाकडे केली होती. या प्रकरणी विद्यापीठाच्या एका समितीकडून चौकशी झाल्यावर 54 विद्यार्थी दोषी आढळले होते. चौकशी समितीने दोषी विद्यार्थांना निलंबित करण्याची सूचना केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने सांगितलं. निलंबित करण्यात आलेले विद्यार्थी विद्यापीठात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्षात शिकत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

दोषी विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थांना वर्षभरासाठी वर्गात हजेरी लावता येणार नाही. त्याचबरोबर त्यांना वार्षिक परीक्षाही देता येणार नाही. इतर नऊ विद्यार्थांना एका वर्षासाठी महाविद्यालयातून निलंबित करण्यात आलं आहे. पण, त्यांना वार्षिक परीक्षा देता येणार आहे. तसंच इतर १३ विद्यार्थ्यांवर नोव्हेंबरपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर उरलेल्या २४ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आलं असल्याचं विद्यापीठाचे रजिस्ट्रार व्ही. व्यंकट दास यांनी सांगितलं. 

देशात २००९ मध्ये रॅगिंगविरोधी कायदा लागू करण्यात आला होता. त्याचबरोबर रॅगिंगसंबंधी कुठलीही तक्रार आणि मदतीसाठी सरकारने यंत्रणा उभारली होती. तरीही रॅगिंगचे प्रकार थांबले नाहीत.