शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

Happy Republic Day 2020 ! प्रजासत्ताक दिनाबाबतच्या १० इंटरेस्टींग गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 10:06 IST

२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचा नेहमीप्रमाणे सगळीकडे जल्लोष बघायला मिळत आहे. रस्त्या रस्त्यावर तिरंगा बघायला मिळत आहे.

२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचा नेहमीप्रमाणे सगळीकडे जल्लोष बघायला मिळत आहे. रस्त्या रस्त्यावर तिरंगा बघायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाचंभारतासाठी फार मोठं महत्त्व आहे. कारण याच दिवशी खऱ्या अर्थाने भारत लोकांचं राज्य झाला होता. भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. चला जाणून घेऊ आणखीही काही खास गोष्टी...

१) जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.  

२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे कायमस्वरूपी संविधान तयार करण्यासाठी एक समिती नेमली गेली. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला. संविधानाचा मसुदा सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर करण्यात आला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष, ११ महिने आणि १८ दिवस चर्चा केल्यानंतर समितीने हा मसुदा अंतिम केला.

३) १९५० मध्ये याच दिवशी १० वाजून १८ मिनिटांनी भारतीय संविधान लागू करण्यात आले होते. आणि त्यानंतर सहा मिनिटांनी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. 

४) प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रपती राजपथावर राष्ट्रध्वजाचं ध्वजोरोहण करतात. तर पंतप्रधान अमर जवान ज्योतीवर देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीव गमावलेल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतात. 

५) १९५० ते १९५४ पर्यंत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणाऱ्या परेडसाठी कोणतीही निश्चित जागा नव्हती. कधी इर्विन स्टेडियम, किंग्सवे, लाल किल्ला तर कधी रामलीला मैदानावर प्रजासत्ताक दिवस साजरा केला जात होता. नंतर १९५५ मध्ये राजपथ परेडसाठी निश्चित करण्यात आले. 

६) परेडदरम्यान राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी दिली जाते. ही सलामी भारतीय सेनेच्या ७ तोफांनी दिली जाते. या तोफा १९४१ मध्ये तयार करण्यात आल्या होत्या. राष्ट्रगीत सुरु होताच पहिली सलामी आणि नंतर ५२ सेकंदानंतर शेवटची सलामी दिली जाते. 

७) दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एखाद्या देशाच्या मुख्य व्यक्तीला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं जातं. पहिल्या प्रजासत्ताक दिनाला मुख्य अतिथी म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो हे आले होते. 

८) दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या शेवटी Abide With Me हे ख्रिश्चन गाणं वाजवलं जातं. असे म्हणतात की, हे गाणं महात्मा गांधी यांना फार पसंत होतं. 

९) प्रजासत्ताक दिनाच्या समारोह फार वक्तशीरपणे साजरा केला जातो. प्रत्येक सेकंदाचा हिशेब ठेवला जातो. म्हणजे कार्यक्रम जर एक मिनिट उशीराने सुरू झाला असेल तर १ मिनिट उशीरानेच संपतो. 

१०) भारतीय संविधान हे पूर्णपणे हाताने लिहिले गेले होते. जे हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहे. हाताने लिहिलेल्या भारतीय संविधानाच्या कॉपी संसद भवनाच्या लायब्ररीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.  

 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनIndiaभारतdelhiदिल्ली