शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

Happy Birthday Narendra Modi : 'नरेंद्र मोदींना हवा होता संन्यास, नको होतं राजकारण', पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 4:04 PM

सन 1966 साली बेलूर मठाचे स्वामी आत्मास्थानंद राजकोट येथील आश्रमात आले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरीत होते.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींची साधना आणि तपश्चर्येबद्दल आपण अनेकदा ऐकले आहे. तसेच एका सामान्य कुटुंबातील मुलगा ते देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याची मजल नरेंद्र मोदींनी मारली. आज मोदींचा थाट-माट आणि राजकारणातील त्यांची धमक आपणास पाहायला मिळत आहे. मात्र, मोदी या राजकारणापासून दूर राहू इच्छित होते. राजकारणात येण्याची त्यांची मूळीच इच्छा नव्हती. ते संन्यासी बनू इच्छित होते. पण, एका गुरुचे त्यांच्या जीवनात आगमन झाले आणि मोदींचा जीवनप्रवास बदलला.

सन 1966 साली बेलूर मठाचे स्वामी आत्मास्थानंद राजकोट येथील आश्रमात आले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरीत होते. त्यामुळे मोदी स्वामी आत्मास्थानंद यांना भेटण्यासाठी राजकोट आश्रमात पोहोचले. त्यापूर्वी मोदी हे अध्यात्म शिकत होते. त्यामुळे मोदींनी स्वामींसोबत राहून अध्यात्म शिकण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, स्वामींनी मोदींना इच्छा धुडकावत तूम्ही संन्यास घेण्यासाठी जन्मले नाहीत. तसेच, राजकोट आश्रम सन्यासी बनण्याची दीक्षा देत नसल्याचेही स्वामींनी म्हटले. जर, तुम्हाला संन्यास घ्यायचा असेल तर तुम्हाला बेलूर मठात जावे लागले, त्यासाठी स्वामींनी बेलूर मठाचे अधिपती माधवानंद यांना याबाबत चिठ्ठी लिहिली. त्यानंतर, मोदींनी स्वामी माधवानंद यांची भेट घेतली. मात्र, स्वामी माधवानंद यांनीही मोदींची इच्छा धुडकावत, तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आहात, संन्यास घेण्यासाठी नाही, असे सांगितले. त्यामुळे आपले गुरू स्वामी आत्मास्थानंद यांच्यासोबत मोदी पुन्हा राजकोट आश्रमात परतले. त्यानंतर, मोदींनी आरएसएसचे सदस्यत्व स्विकारले आणि काही दिवसांतच ते राजकारणात सक्रीय झाले. गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही मोदींनी स्वामी आत्मास्थानंद यांचे दर्शन घेतले. तसेच पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतरही मोदींच्या पॉकेटमध्ये एक फूल होते. जे फूल स्वामी आत्मास्थानंद यांनी मोदींनी आशिर्वाद म्हणून दिले होते. दरम्यान, स्वामी आत्मास्थानंद यांनीच मोदींना राजकारणात सक्रीय होण्यास सूचवले होते, असेही सांगण्यात येते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणChief Ministerमुख्यमंत्री