शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शहीद कर्नल आशुतोष शर्मा यांना भावपूर्ण निरोप; आईसाठी लिहिलेली कविता वाचून डोळे पाणावतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 2:38 PM

'आशुतोष शर्मा अमर रहे'च्या घोषणा आसमंतात घुमल्या आणि उपस्थितांचे डोळे पाणावले, अंग शहारले.

ठळक मुद्देशहीद कर्नल आशुतोष शर्मा यांना आज लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.कर्नल आशुतोष यांना आलेलं वीरमरण ही भारतीय लष्कराची मोठी हानीच आहे. लष्कराचा युनिफॉर्म म्हणजे कर्नल आशुतोष यांचं सर्वस्व होता.

जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा इथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जिगरबाज वीर कर्नल आशुतोष शर्मा यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. जयपूरमध्ये लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी 'आशुतोष शर्मा अमर रहे'च्या घोषणा आसमंतात घुमल्या आणि उपस्थितांचे डोळे पाणावले, अंग शहारले. भारतमातेच्या या शूरवीर सुपुत्राला त्याच्या कुटुंबीयांसह सगळ्यांनी अखेरचा सलाम केला.

कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडामधील एका गावात शनिवारी एका घरात लपलेल्या काही दहशतवाद्यांनी नागरिकांना ओलीस ठेवलं होतं. ही माहिती मिळताच, लष्कराच्या एका तुकडीने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने या भागाला घेराव घातला होता आणि नागरिकांची सुखरूप सुटका केली होती. मात्र त्याचवेळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर गोळीबार केला. त्याला चोख प्रत्युत्तर देत, 15 तास चाललेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं, पण आपले पाच वीर शहीद झाले होते. कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद यांच्यासह दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीसचे उपनिरीक्षक शकील काझी यांना हौतात्म्य आलं होतं.

 

२१ राष्ट्रीय रायफल युनिटचे नेतृत्व सांभाळणाऱ्या कर्नल आशुतोष यांना आलेलं वीरमरण ही भारतीय लष्कराची मोठी हानीच आहे. त्यांना दोन वेळा शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होतं. पाच वर्षांत पहिल्यांदाच भारतीय लष्करानं एवढ्या वरिष्ठ दर्जाचा अधिकारी गमावला आहे. काश्मीरमध्ये 'टायगर' अशीच त्यांची ओळख होती. 

मातृभूमीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या, तिच्या रक्षणासाठी शत्रूशी दोन होत करणाऱ्या कर्नल आशुतोष यांच्या मनाचा हळवा कोपरा आणि त्यात आईला असलेलं विशेष स्थान एका कवितेतून सहज लक्षात येतं. 28 एप्रिलला आशुतोष यांनी आपल्या आईसाठी लिहिलेली एक कविता वीरपत्नी पल्लवी यांनी माध्यमांना दिली आहे.  

वो अक्सर घर को सम्भालती, संवारती रहती हैमेरी मां मेरे घर आने की राह निहारती रहती हैलौट कर आऊंगा मैं भी पंछी की तरह मैं भी एक दिनवो बस इसी उम्मीद में दिन गुजारती रहती हैउससे मिले हुए हो गया पूरा एक साल लेकिनउसकी बातों में मेरे सरहद पर होने का गुरूर दिखता है।

या कवितेच्या प्रत्येक पंक्तीतून आईवरची माया, ममता, आस्था सहज जाणवते.

लष्कराचा युनिफॉर्म म्हणजे कर्नल आशुतोष यांचं सर्वस्व होता. त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल आम्हाला अभिमान आहे, अशा भावना वीरपत्नी पल्लवी यांनी व्यक्त केल्या. 

एन्काऊंटरवेळी कर्नलच्या फोनवर दहशतवाद्यांनी म्हटलं अस्सलाम वालेकुम; अन्...हे बलिदान विसरता कामा नये; हंदवाडा चकमकीत शहीद जवानांना Virat Kohliसह क्रीडा विश्वातून मानवंदनाकर्तव्यनिष्ठेला सलाम..."मला १५०० जवानांची काळजी घ्यायचीय, कुटुंब तू सांभाळ!""त्यांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा, त्यांच्यासाठीही बँड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा"'ती' सरप्राईज भेट अखेरची ठरली; शहीद कर्नल शर्मांच्या भावानं सांगितली आठवण

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवाद