शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

राष्ट्रहित सांभाळून काश्मीरमध्ये हळूहळू परिस्थिती सुरळीत करा - सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 06:22 IST

काश्मीरमधील जनजीवन सुरळीत करण्यासाठी देशहिताला बाधा येणार नाही, अशा प्रकारे पावले उचलावीत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला दिले.

नवी दिल्ली : अनुच्छेद ३७० अन्वये दिलेला दर्जा रद्द केल्यानंतर अतिरेकी शक्तींना वाव मिळू नये, यासाठी निर्बंध लागू केल्याने ४३ दिवस विस्कळित झालेले काश्मीरमधील जनजीवन सुरळीत करण्यासाठी देशहिताला बाधा येणार नाही, अशा प्रकारे पावले उचलावीत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला दिले.‘काश्मीर टाइम्स’च्या संपादिका अनुराधा भसिन व काँग्रेस कार्यकर्ते यांच्या याचिकांवर हे निर्देश देताना सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे व न्या. एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, परिस्थिती सुरळीत करण्यासाठी शाळा, इस्पितळे व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहील, यासाठी पावले उचलली जावीत. सरकारने लादलेल्या निर्बंधांमुळे काश्मीरच्या जनतेचे मूलभूत हक्क हिरावून घेतले जात आहेत व त्यांना दैनंदिन जीवन जगणेही मुश्कील झाले आहे, असा याचिकाकर्त्यांचा दावा होता. मात्र, अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल व सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तथ्ये व आकडेवारी सादर करत त्याचे खंडन केले. सर्व निर्बंध उठविले जावेत व स्थानबद्ध केलेल्या तेथील राजकीय नेत्यांना मुक्त केले जावे, या याचिकाकर्त्यांच्या मुख्य मागणीवर न्यायालयाने तूर्तास आदेश दिला नाही.याआधी तीनदा श्रीनगर विमानतळावरूनच परत पाठविण्यात आलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांना श्रीनगर, अनंतनाग बारामुल्ला व श्रीनगर या काश्मीरच्या चार जिल्ह्यांना भेट देऊन सद्यस्थितीबाबत सामान्यांशी संवाद साधण्यास खंडपीठाने अनुमतीदिली. या भेटीत ते आपले कुटुंबीयव नातेवाईकांनाही भेटू शकतील.मात्र तेथे राजकीय स्वरूपाचे काम करणार नाही, अशी हमी आझाद यांनी दिली.न्यायालायच्या आदेशानुसार उपचारांसाठी दिल्लीत आणले गेलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काश्मीरमधील नेते मोहम्मद युसूफ तारिगामी आता पूर्ण बरे झाले असल्याने ते घरी परत जाऊ शकतात, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. ‘एम्स’मधून सुट्टी मिळाल्यानंतरही त्यांना येथील ‘काश्मीर भवन’मध्येच ठेवण्यात आले होते.निर्बंधांमुळे काश्मिरमधील नागरिकांना सरकारी अत्याचारांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणेही अशक्य झाले आहे, अशी तक्रार एकाने केल्यानंतर खंडपीठाने तेथील उच्च न्यायालयाकडून अहवाल मागविला. गरज पडल्यास आपण स्वत: मुख्य न्यायाधीश न्या. गीता मित्तल यांच्याशी बोलू, असेही न्या. गोगोई म्हणाले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर