शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

'नरेंद्र मोदींच्या विरोधात उठणारा हात कापला जाईल', भाजपा नेत्याची खुलेआम धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 10:39 IST

'नरेंद्र मोदी प्रचंड अडचणींचा सामना करत पंतप्रधानपदी पोहोचले आहेत. देशाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला आहे. आपल्या सर्वांसाठी ही गर्वाची गोष्ट आहे. जर कोणी त्यांच्या विरोधात हात उचलला तर तो आधी तोडण्यात येईल, आणि नंतर कापला जाईल', असं नित्यानंद राय बोलले आहेत. 

ठळक मुद्देभाजपा प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी मोदींच्या विरोधात बोलणा-यांना धमकी'मोदींच्या विरोधात हात उचलला तर एकतर तो तोडला जाईल किंवा कापला जाईल'आपला इशारा कोणतीही व्यक्ती किंवा विरोधी पक्षाकडे नसल्याचं स्पष्टीकरण

पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिशेने उठणारा हात कापला जाईल अशी खुलेआम धमकी बिहार भाजपा प्रदेशाध्यक्षाने दिली आहे. पाटणा येथे एका रॅलीत बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी मोदींच्या विरोधात बोलणा-यांना सक्त ताकीदच दिली आहे. मोदींच्या विरोधात हात उचलला तर एकतर तो तोडला जाईल किंवा कापला जाईल अशी धमकी नित्यानंद राय यांनी दिली आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

'नरेंद्र मोदी प्रचंड अडचणींचा सामना करत पंतप्रधानपदी पोहोचले आहेत. देशाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला आहे. आपल्या सर्वांसाठी ही गर्वाची गोष्ट आहे. जर कोणी त्यांच्या विरोधात हात उचलला तर तो आधी तोडण्यात येईल, आणि नंतर कापला जाईल', असं नित्यानंद राय बोलले आहेत. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासाचा उल्लेख करताना नित्यानंद राय यांनी सांगितलं की, 'नरेंद्र मोदींनी परिस्थितीवर मात करत पंतप्रधानपद मिळवलं आहे. गरिबीतून मोदी इथपर्यंत पोहोचल्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात त्यांचाप्रती आदर असला पाहिजे'. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'त्यांच्याविरोधात उठणारं बोट, उठणारे हात...आपण सर्वांनी मिळून...एक तर तोडले पाहिजेत, किंवा गरज पडल्यास कापले पाहिजेत'.

यावेळी उपमुख्यमंत्री सुशील मोदीदेखील मंचावर उपस्थित होते. सभा संपल्यानंतर जेव्हा नित्यानंद राय यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सारवासारव करत सांगितलं की, 'मी बोटं तोडण्याचं आणि हात कापण्याचं उदाहरण दिलं होतं. मला सांगायचं होतं की, देशाच्या अभिमान आणि सुरक्षेविरोधात काम करणा-या लोकांना आपण नियंत्रणात ठेवलं पाहिजे'. आपला इशारा कोणतीही व्यक्ती किंवा विरोधी पक्षाकडे नव्हता असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे. 

 

डिसेंबर 2016 मध्ये नित्यानंद राय यांनी बिहारचं प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आलं होतं. त्यांच्या मदतीने बिहारमध्ये आपला दबदबा कायम ठेवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत त्यांना उजियारपूरमधून उमेदवारीही देण्यात आली होती. राज्यात सुशील मोदी, नंदकिशोर आणि प्रेमकुमार यांच्यासोबत एक वरिष्ठ नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा