शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Target Killing : अर्ध्यावरती डाव मोडला! 3 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न; काश्मीरमध्ये मारलेल्या बँक मॅनेजरवर अंत्यसंस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 20:01 IST

Target Killing : सकाळी सातच्या सुमारास बेनिवाल यांच्या पत्नी पतीचा मृतदेह घेऊन भगवान गावात पोहोचल्या. मुलाचा मृतदेह पाहून वडील बेशुद्ध पडले. काही वेळातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील रहिवासी विजय बेनिवाल यांच्यावर शुक्रवारी त्यांच्या मूळ गावी भगवान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव काश्मीरहून गावात पोहोचले. बेनिवाल यांचा अंत्यसंस्कार गावातील स्मशानभूमीत करण्यात आले आणि त्यात शेकडो लोक उपस्थित होते. सकाळी सातच्या सुमारास बेनिवाल यांच्या पत्नी पतीचा मृतदेह घेऊन भगवान गावात पोहोचल्या. मुलाचा मृतदेह पाहून वडील बेशुद्ध पडले. काही वेळातच अंत्यसंस्कार करण्यात आले.तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेविजयने जुलैमध्ये गावाला आपल्या घरी येण्याचं आश्वासन दिले होते. मात्र, लग्नानंतर तो गावी परतलाच नाही. त्याला आपले कॅडर बदलायचे होते आणि त्यासाठी परीक्षाही दिली होती. बँक मॅनेजर बेनिवाल यांचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले असून ते पत्नीला घेऊन काश्मीरला गेले होते. बेनिवाल यांच्या वडिलांनी सांगितले, "माझा मुलगा परीक्षेची तयारी करत होता, जेणेकरून त्याला इतरत्र शाखा व्यवस्थापकाची नोकरी मिळावी. त्याने राजस्थानला परत यावे, अशी आमची इच्छा होती."गोळी लागल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याला वाचवता आले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्ल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक दहशतवादीबँकेत घुसून विजय बेनिवाल यांच्यावर गोळीबार करताना दिसत आहे. बेनिवाल यांची कुलगाम जिल्ह्यातील आरेह मोहनपोरा येथे असलेल्या एलकवाई देहाती बँकेत (ईडीबी) व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.विजयच्या पत्नीने 2 दिवसांपूर्वी चिंता व्यक्त केली होतीविजय कुमारच्या पत्नीने कुटुंबीयांना सांगितले की, दोन दिवसांपूर्वी तिथल्या एका शिक्षकाची हत्या झाल्यापासून विजय कुमारही चिंतेत होता आणि सांगत होता की इथली परिस्थिती बिकट होत चालली आहे. आपल्याला जाण्याची गरज आहे. त्याने कोणताही निर्णय घेण्यापूर्वीच दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीbankबँकRajasthanराजस्थानDeathमृत्यूmarriageलग्न