शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

Target Killing : अर्ध्यावरती डाव मोडला! 3 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न; काश्मीरमध्ये मारलेल्या बँक मॅनेजरवर अंत्यसंस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 20:01 IST

Target Killing : सकाळी सातच्या सुमारास बेनिवाल यांच्या पत्नी पतीचा मृतदेह घेऊन भगवान गावात पोहोचल्या. मुलाचा मृतदेह पाहून वडील बेशुद्ध पडले. काही वेळातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील रहिवासी विजय बेनिवाल यांच्यावर शुक्रवारी त्यांच्या मूळ गावी भगवान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव काश्मीरहून गावात पोहोचले. बेनिवाल यांचा अंत्यसंस्कार गावातील स्मशानभूमीत करण्यात आले आणि त्यात शेकडो लोक उपस्थित होते. सकाळी सातच्या सुमारास बेनिवाल यांच्या पत्नी पतीचा मृतदेह घेऊन भगवान गावात पोहोचल्या. मुलाचा मृतदेह पाहून वडील बेशुद्ध पडले. काही वेळातच अंत्यसंस्कार करण्यात आले.तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेविजयने जुलैमध्ये गावाला आपल्या घरी येण्याचं आश्वासन दिले होते. मात्र, लग्नानंतर तो गावी परतलाच नाही. त्याला आपले कॅडर बदलायचे होते आणि त्यासाठी परीक्षाही दिली होती. बँक मॅनेजर बेनिवाल यांचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले असून ते पत्नीला घेऊन काश्मीरला गेले होते. बेनिवाल यांच्या वडिलांनी सांगितले, "माझा मुलगा परीक्षेची तयारी करत होता, जेणेकरून त्याला इतरत्र शाखा व्यवस्थापकाची नोकरी मिळावी. त्याने राजस्थानला परत यावे, अशी आमची इच्छा होती."गोळी लागल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याला वाचवता आले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्ल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक दहशतवादीबँकेत घुसून विजय बेनिवाल यांच्यावर गोळीबार करताना दिसत आहे. बेनिवाल यांची कुलगाम जिल्ह्यातील आरेह मोहनपोरा येथे असलेल्या एलकवाई देहाती बँकेत (ईडीबी) व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.विजयच्या पत्नीने 2 दिवसांपूर्वी चिंता व्यक्त केली होतीविजय कुमारच्या पत्नीने कुटुंबीयांना सांगितले की, दोन दिवसांपूर्वी तिथल्या एका शिक्षकाची हत्या झाल्यापासून विजय कुमारही चिंतेत होता आणि सांगत होता की इथली परिस्थिती बिकट होत चालली आहे. आपल्याला जाण्याची गरज आहे. त्याने कोणताही निर्णय घेण्यापूर्वीच दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीbankबँकRajasthanराजस्थानDeathमृत्यूmarriageलग्न