शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

दहशतवाद्यांना मारायला गेला होता, की झाडं पाडायला? नवज्योत सिंह सिद्धूंकडून एअर स्ट्राइकवर सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 18:26 IST

भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला होता. मात्र आता या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवरून राजकारण सुरू झाले आहे.

ठळक मुद्दे भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला होताआता या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवरून राजकारण सुरूदहशतवाद्यांना मारायला गेला होता की झाडं पाडायला, अशी विचारणा नवज्योत सिंह सिद्धू यांनी केली

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला होता. मात्र आता या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवरून राजकारण सुरू झाले आहे. या कारवाईत खरंच दहशतवादी मारले गेले आहेत का? असा सवाल विरोधकांकडून करण्यात येऊ लागला आहे. आता काँग्रेसचे नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनीही एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केंद्रीय मंत्री एसएस अहलुवालिया यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला देत, दहशतवाद्यांना मारायला गेला होता की झाडं पाडायला, अशी विचारणा नवज्योत सिंह सिद्धू यांनी केली आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये 250 हून अधिक दहशतवादी मारले गेले, असा दावा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला होता. त्यानंतर यासंदर्भातील वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान एअर स्ट्राइकचा उद्देश पाकिस्तानला इशारा देण्याचा होता, मारण्याचा नाही असे वक्तव्य केंद्रीय मंत्री एस. एस. अहलुवालिया यांनी केले होते. तो धागा पकडत सिद्धू म्हणाले की, दहशतवाद्यांना मारायचे नव्हते तर कारवाईचा हेतू काय होता. दहशतवाद्यांना मारायला नाही तर काय झाडं पाडायलया गेला होता काय? ही निवडणुकीसाठीची स्टंटबाजी आहे का?'' ''300 दहशतवादी ठार झाले आहेत की नाही. सध्या सुरू असलेले लष्करावरील राजकारण बंद झाले पाहिजे.''असेही सिद्धू म्हणाले.  दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही एअर स्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या संख्येबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.   

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसBJPभाजपा