शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

दहशतवाद्यांना मारायला गेला होता, की झाडं पाडायला? नवज्योत सिंह सिद्धूंकडून एअर स्ट्राइकवर सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 18:26 IST

भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला होता. मात्र आता या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवरून राजकारण सुरू झाले आहे.

ठळक मुद्दे भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला होताआता या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवरून राजकारण सुरूदहशतवाद्यांना मारायला गेला होता की झाडं पाडायला, अशी विचारणा नवज्योत सिंह सिद्धू यांनी केली

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला होता. मात्र आता या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवरून राजकारण सुरू झाले आहे. या कारवाईत खरंच दहशतवादी मारले गेले आहेत का? असा सवाल विरोधकांकडून करण्यात येऊ लागला आहे. आता काँग्रेसचे नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनीही एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केंद्रीय मंत्री एसएस अहलुवालिया यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला देत, दहशतवाद्यांना मारायला गेला होता की झाडं पाडायला, अशी विचारणा नवज्योत सिंह सिद्धू यांनी केली आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये 250 हून अधिक दहशतवादी मारले गेले, असा दावा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला होता. त्यानंतर यासंदर्भातील वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान एअर स्ट्राइकचा उद्देश पाकिस्तानला इशारा देण्याचा होता, मारण्याचा नाही असे वक्तव्य केंद्रीय मंत्री एस. एस. अहलुवालिया यांनी केले होते. तो धागा पकडत सिद्धू म्हणाले की, दहशतवाद्यांना मारायचे नव्हते तर कारवाईचा हेतू काय होता. दहशतवाद्यांना मारायला नाही तर काय झाडं पाडायलया गेला होता काय? ही निवडणुकीसाठीची स्टंटबाजी आहे का?'' ''300 दहशतवादी ठार झाले आहेत की नाही. सध्या सुरू असलेले लष्करावरील राजकारण बंद झाले पाहिजे.''असेही सिद्धू म्हणाले.  दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही एअर स्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या संख्येबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.   

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसBJPभाजपा