शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Jinnah Tower: जिन्ना टॉवर वाद! वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर टॉवरला मारला तिरंगा रंग; नाव बदलण्यावर भाजप ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 13:02 IST

आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात असलेल्या एका मिनाराला पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्नांचे नाव देण्यात आले आहे. भाजपने हे नाव बदलून एपीजे एब्दुल कलामांचे नाव देण्याची मागणी केली आहे.

गुंटूर:आंध्र प्रदेशातीलगुंटूर येथील वादग्रस्त जिन्ना टॉवरला अखेर तिरंगा रंगात रंगवण्यात आले आहे. तसेच, गुरुवारी या टॉवरजवळ राष्ट्रध्वज फडकवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. गुंटूर पूर्वचे आमदार मोहम्मद मुस्तफा म्हणाले की, विविध गटांच्या विनंतीवरून टॉवरला तिरंग्याने रंगवण्याचा आणि राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पाकिस्तानचा संस्थापक मोहम्मद अली जिन्नाची आठवण करुन देणाऱ्या टॉवरचे नाव बदलण्यात यावे, असा पवित्रा भाजपने घेतला आहे.

गुंटूर शहराच्या महापौर कवेती मनोहर यांनी टॉवरच्या नावावरुन राजकारण करत असल्याचा आरोप भाजपवर केला आहे. त्या म्हणाल्या की, गेल्या काही आठवड्यांपासून भाजपचे कार्यकर्ते या टॉवरबाबत विनाकारण वाद निर्माण करत आहेत. आम्ही परिसरातील मुस्लिम ज्येष्ठांशी बोललो असून टॉवरशेजारी राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, केवळ टॉवरचा रंग बदलून आम्ही शांत होणार नाहीत, असे भाजपने स्पष्ट केले आहे.

टॉवरला एपीजे अब्दुल कलामांचे नाव द्याआंध्र प्रदेश भाजपचे प्रभारी सुनील देवधर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, जिन्ना टॉवरचे नाव बदलेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे. बुरुज तिरंग्याच्या रंगात रंगला, हे ठीक आहे पण त्याचे नावही बदलले पाहिजे. जिन्ना हे पाकिस्तानचे संस्थापक आहेत आणि ते भारताच्या दडपशाहीचे प्रतीक होते. जिन्ना आणि औरंगजेब यांच्यात काही फरक नाही. ज्याप्रमाणे औरंगजेब रोडचे नामकरण करण्यात आले, त्याचप्रमाणे या जिन्ना टॉवरचे नामकरण एपीजे अब्दुल कलाम टॉवर असे करण्यात यावे, असे ते म्हणाले.

काय आहे प्रकरण ?आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात पाकिस्तानचा संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या नावाचे एक टॉवर आहे. या टॉवरच्या नामांत्तराचा मुद्दा भाजपने उचलून धरला आहे. आंध्र प्रदेश सरकारने तात्काळ जिन्ना टॉवरचे नाव बदलून माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव त्या टॉवरला द्यावे, अशी मागणी भाजपने केली आहे. 

टॉवरचा इतिहास?असे म्हटले जाते की, स्वातंत्र्य काळापासून गुंटूर शहरात हे टॉवर उभे आहे. 1945 मध्ये फाळणीपूर्वी मोहम्मद अली जिन्ना एका सार्वजनिक सभेला संबोधित करण्यासाठी गुंटूरला आले होते. त्यावेळी काही स्थानिक मुस्लिमांनी त्यांना भेट देण्याच्या उद्देशाने या टॉवरचे नाव जिन्ना यांच्या नावावर ठेवले. या टॉवरला घुमटाच्या आकाराची रचना असलेले सहा खांब आहेत आणि स्थानिक लोक या टॉवरला सौहार्द आणि शांततेचे प्रतीक मानतात. या परिसराला सध्या जिन्ना सेंटर म्हणून ओळखले जाते. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशguntur-pcगुंटूरBJPभाजपा