शहरं
Join us  
Trending Stories
1
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
4
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
5
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
6
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
7
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
8
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
9
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
10
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
11
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
12
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
13
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
14
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
15
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
16
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
17
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
18
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
19
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
20
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
Daily Top 2Weekly Top 5

भीषण, भयंकर, भयावह! मृतांचा आकडा इतका की स्मशानातही वेटिंग, कब्रस्तानातही मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 11:05 IST

भीषण पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा मोठा असल्याने शहरातल्या स्मशानांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अंत्यसंस्कारांसाठी खूप वाट पाहण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे.

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता अचानक कोसळला. त्या पुलावरील सुमारे ५०० हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १७७ जणांना वाचवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मोरबी पूल दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसांनी ते मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवले. 

भीषण पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा मोठा असल्याने शहरातल्या स्मशानांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अंत्यसंस्कारांसाठी खूप वाट पाहण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे. शहरातील चार कब्रस्तान आणि सातही स्मशानांत असंच चित्र पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापडलेल्या मृतदेहांचं शवविच्छेदन करून ते कुटुंबीयांकडे सोपवले. त्यानंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी गर्दी झाली होती. शहरातल्या 4 कब्रस्तानमध्ये कबर खोदण्यासाठी वेळ लागत आहे. 

“काही लोक मुद्दाम पूल हलवत होते...”; दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबाने सांगितलं नेमकं काय घडलं?

7 स्मशानांमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती होती. काही ठिकाणी चिता रचण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही. शहरातल्या 4 कब्रस्तानात कबरी खोदण्यासाठी 150 जण आहेत. कबरी खोदण्याचं काम दिवसरात्र सुरूच होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. या दुर्घटनेत कोणी आपला मुलगा गमावला, कोणी भाऊ, तर कोणी आई-बाबा... अनेकांच्या डोळ्यादेखत त्यांचं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं आहे. एका लहान मुलाचा बूट हा नदी किनारी पडलेला सापडला तर गर्भवती महिलेचा मृतदेह पाहून देखील अनेकांच्या अंगावर काटा आला. अशीच एक मन सुन्न करणारी घटना आता समोर आली आहे. 

हृदयद्रावक! कोणी भाऊ गमावला तर कोणी आई-बाबा; घरातून 8 जण निघाले पण 'ती' एकटीच परतली

जमीला या महिलेने देखील या पूल दुर्घटनेत आपली जवळची माणसं गमावली आहेत. जमीला आपल्या कुटुंबातील आठ जणांसोबत पूल पाहण्यासाठी गेली होती. पण पूल कोसळला आणि सर्वच संपलं. तिच्या कुटुंबातील सात जण तिने गमावली असून ती एकटीच वाचली आहे. जमीलाने दिलेल्या माहितीनुसार, "माझी नणंद दिवाळीच्या सुट्टीसाठी येथे आली होती. नणंद आणि तिची दोन मुलं. तसेच माझे पती आणि मुलांसह बाहेर गेली होती. माझे पती आम्हाला पूल पाहायला घेऊन गेले होते. पण या दुर्घटनेत मी सात जण गमावले आणि एकटीच परत आली आहे." अशीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोरबी येथे राहणारे हार्दिक फलदू हे आपली पत्नी आणि चार वर्षांचा मुलगा जियांश याला घेऊन पूल पाहण्यासाठी गेले होते. पूल कोसळल्याने हार्दिक आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तर जियांशला वाचवण्यात यश आलं. पण आता त्याच्या डोक्यावरचं आईवडिलांचं छत्र मात्र कायमचं गेलं आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Morbi Bridge Collapseमोरबी पूलDeathमृत्यू