शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Gujarat Election 2022: अमित शहांचे ‘मिशन गुजरात’, बंडखोरी रोखण्याची मोहीम; ४० नाराजांना समजावण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 09:17 IST

Gujarat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलेल्या भाजप नेत्यांच्या असंतोषानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समजावण्याची कोणतीही कसर सोडलेली नाही.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलेल्या भाजप नेत्यांच्या असंतोषानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समजावण्याची कोणतीही कसर सोडलेली नाही.

पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी दाखल करण्याची अखेरची तारीख १७ नोव्हेंबर व दुसऱ्या टप्प्यासाठी अर्जाची अखेरची तारीख २१ नोव्हेंबर आहे. यासाठी अमित शहा आभासी पद्धतीने तेथे काम करीत आहेत. भाजप मुख्यालयातून मिळालेल्या संकेतांनुसार, अमित शहा यांनी बंडखोरांना व्यक्तीश: फोन करून कारणांची विचारणा केली आहे. अशा प्रकारचा असंतोष १५ वर्षांत यापूर्वी कधीही पाहण्यात आलेला नव्हता. 

असंतुष्टांनी माघार घ्यावी, यासाठी अमित शहा यांनी १२ पथके तयार केली असून, त्यांनी असंतुष्टांना प्रेमाने व सद्भावनेने समजावून सांगावे, असे निर्देश दिलेले आहेत. असंतुष्ट हे भाजप परिवारातलेच असल्यामुळे त्यांच्याबाबत सहानुभूतीने वागावे, असा सल्लाही शहा यांनी दिला आहे.

नेमके काय होणार?राज्यात २७ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मात्र, अशा प्रकाराची नाराजी कधीच दिसली नव्हती. परंतु पक्ष सोडलेले अनेक ज्येष्ठ नेते मानण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीत. माजी आमदार आणि भाजपचे आदिवासी नेते हर्षद वसावा यांनी भाजप सोडून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. ते गुजरात भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष आहेत व राजपिपला जागेचे त्यांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केलेले आहे.सौराष्ट्रमध्ये माजी आमदार अरविंद लडानी यांना केशोड येथून उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. शहा यांचे बंडखोरांशी बोलणे झाले आहे व असंतुष्टांनी पक्षाच्या कामात परतण्याचे मान्य केले आहे. राज्यात भाजपचा विक्रमी विजय होईल व आपचे कोणतेही आव्हान नाही, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.

आपच्या उमेदवाराने मागितले पोलिस संरक्षणसुरत (पूर्व) मतदासंघातील आम आदमी पार्टीचे (आप) उमेदवार कांचन जरीवाला यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर गुरुवारी पोलिस संरक्षणाची मागणी केली. दरम्यान, भाजपने अपहरण करून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले, असा घणाघाती आरोप आम आदमी पार्टीने (आप) केला. तथापि, जरीवाला यांनी आपण स्वेच्छेने उमेदवारी मागे घेतल्याचे सांगत भाजपने दबाव आणल्याचा इन्कार केला. उलट पक्ष कार्यकर्त्यांनी पैशांची मागणी सुरू केल्याने पूर्ण करू शकत नसल्याने आपण उमेदवारी मागे घेतली, असा दावा जरीवाला यांनी केला.

...तर त्याला घरी जाऊन गोळी घालेनnनिवडणुकीच्या रणधुमाळीची रंगत वाढत चालली आहे. टीका, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी यामुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. वेगवेगळे पक्ष, उमेदवार मतदार व कार्यकर्त्यांना वेगवेगळी आश्वासने देत आहेत. मात्र, काही आश्वासने ऐकल्यानंतर डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ येते. असेच एक आश्वासन सलग सहावेळा निवडून येऊनही भाजपने तिकीट नाकारलेले बाहुबली उमेदवार मधु श्रीवास्तव यांनी दिले. जर तुम्हांला कोणी हात लावला तर मी त्याच्या घरी जाऊन त्याला गोळी घालेन, असे ते म्हणाले. जर कोणी तुमची कॉलर धरली तर मी त्याच्या घरी जाऊन त्याला गोळी नाही घातली तर माझे नाव मधुभाई नाही, असे श्रीवास्तव म्हणाले. nमेळाव्यादरम्यान मिशीवर ताव देत त्यांनी गोळीची भाषा केली. त्यांच्या या प्रचार मेळाव्याचा व्हिडीओ समोर आला आहे. विशेष म्हणजे श्रीवास्तव यांच्या या विधानावर त्यांचे कार्यकर्ते टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद देत असल्याचे यात दिसून येते. श्रीवास्तव वाघेडिया मतदारसंघातून सातव्या वेळी भवितव्य आजमावत आहेत. ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शंकरसिंह वाघेला यांना मुख्यमंत्री बनवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022