शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

राज्यसभा निवडणुकीपूर्वी गुजरात काँग्रेसला झटका; काही आमदार संपर्काच्या बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 3:02 PM

काँग्रेस 7 आमदारांशी अद्याप संपर्क साधू शकलेली नाही. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं गुजरातमध्ये सावध पावलं उचलण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देगुजरातमधल्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे दोन आमदार गायब झाले आहेत. आमदार जे. वी. काकडिया आणि सोमाभाई पटेल हे आमदार काँग्रेसच्या संपर्कात नाहीत. खरं तर ते आमदार भाजपाला समर्थन देणार असल्याची चर्चा आहे. तसेच काँग्रेसचा आणखी एक आमदार मंगल गावित यांच्याशीही संपर्क साधू शकलेले नाही.

नवी दिल्लीः गुजरातमधल्याराज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे दोन आमदार गायब झाले आहेत. आमदार जे. वी. काकडिया आणि सोमाभाई पटेल हे आमदार काँग्रेसच्या संपर्कात नाहीत. खरं तर ते आमदार भाजपाला समर्थन देणार असल्याची चर्चा आहे. तसेच काँग्रेसचा आणखी एक आमदार मंगल गावित यांच्याशीही संपर्क साधू शकलेले नाही. ते आमदार राजीनामेसुद्धा देऊ शकतात, अशीही अटकळ बांधली जात आहे. काँग्रेसकडे 73 आमदार आहे. काँग्रेस 7 आमदारांशी अद्याप संपर्क साधू शकलेली नाही. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं गुजरातमध्ये सावध पावलं उचलण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे. शनिवारी काँग्रेसनं आपले 14 आमदार जयपूरमध्ये हलवले होते. गुजरातमधले हे आमदार जयपूरच्या पाच सितारा हॉटेल शिव विलासमध्ये थांबले आहेत. या सर्व आमदारांना राजस्थान सरकारमधले महेश जोशी आणि महेंद्र चौधरी बस घेऊन शिव विलास हॉटेलमध्ये घेऊन गेले. गुजरातमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी 26 मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजपाच्या आणखी तीन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. अभय भारद्वाज आणि रमिला बेन बाराबरोबर तिसऱ्या उमेदवाराच्या स्वरूपात नरहरी अमीननं नामांकन अर्ज दाखल केलं आहे. काँग्रेसकडून शक्ती सिंह गोहिल आणि भरत सिंह सोलंकी यांनी नामांकन अर्ज भरलं आहे. भाजपा आणि काँग्रेस दोघांनीही आपापल्या विजयाचा दावा केला आहे. मध्य प्रदेशातील राजकीय उलथापलाथीनंतर या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांकडून भाजपाच्या उमेदवाराला क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. यामुळे सावधगिरी म्हणून काँग्रेसने आपल्या आमदारांना जयपूरला हलवले आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे आमदार हिंमत सिंह पटेल यांनी, 'आमच्या पक्षात सर्वकाही ठीक आहे. प्रत्येक पक्षाची रणनीती असते. त्यामुळे हा एक रणनीतीचा भाग आहे, असे म्हटले आहे. महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरू असतानाही काँग्रेसने आपल्या आमदारांना जयपूरमधेच ठेवले होते. गुजरातमधील चार राज्‍यसभा जागांसाठी 26 मार्चला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने अभय भारद्वाज, रमीराबेल बारा आणि नरहरी अमीन यांना रिंगणात उतरवले आहे. अमीन यांनी २०१२ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला होता. यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांकडून त्यांना क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाGujaratगुजरातcongressकाँग्रेस