शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

"मोदी आले, नोटबंदी केली अन् तुमच्या खिशातून पैसा काढला, अब्जोपतींना फायदा झाला"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 1:47 PM

Congress Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी हे गुजरातच्या दाहोदमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी आदिवासी सत्याग्रह रॅलीला संबोधित केलं, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - गुजरातमध्ये या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी काँग्रेस पक्षाने गुजरातमध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) हे गुजरातच्या दाहोदमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी आदिवासी सत्याग्रह रॅलीला संबोधित केलं, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत मनरेगाची खिल्ली उडवली. तसेच मी हे रद्द करू इच्छितो पण नाही करणार कारण काँग्रेसने काय केलंय हे देशाला लक्षात राहिलं पाहिजे असं म्हटलं. याला राहुल यांनी उत्तर दिलं. 

आज जर कोरोनाच्या काळात मनरेगा नसती तर देशाची परिस्थिती काय झाली असती? असा सवाल राहुल यांनी विचारला आहे. तसेच कोरोनामुळे गुजरातमध्ये तीन लाख लोकांचा मृत्यू झाला. गंगा नदी मृतदेहाने भरून गेली. तर देशात ५०-६० लाख लोकांना जीव गमवावा लागला, पण हे लोक या गोष्टींवर अजिबात बोलत नाहीत. फक्त थाली बजाओ, लाईट जलाओ असं म्हणत आहेत. नोटबंदी आणि जीएसटीवरून देखील राहुल गांधी यांनी आता पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे. 

"पंतप्रधान आले, नोटबंदी केली आणि तुमच्या खिशातून पैसा काढला. काळ्या पैशाविरोधात लढाई आहे असं सांगितलं, पूर्ण देशाला बँकेच्या लाईनमध्ये उभं केलं. पण काळ्या पैशाविरोधात काहीच नाही झालं. अब्जोपतींना फायदा झाला असं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला. ही जनसभा नाही हे आंदोलन आहे असंही म्हटलं आहे. मोदींनी देशाची दोन देशात वाटणी केली. पण काँग्रेस हे होऊ देणार नाही असं देखील राहुल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"आजच्या एका सिलिंडरची किंमत..."; दरवाढीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षच गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या भल्यासाठी काम करतो असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतींची तुलना केली आहे. "काँग्रेसच्या काळात २०१४ पर्यंत एलपीजी सिलिंडरची किंमत ८२७ रुपये अनुदानासह ४१० रुपये होती, तर २०२२ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ती ९९९ रुपयांपेक्षा जास्त आहे आणि सबसिडी देखील शून्य आहे" असं म्हटलं आहे. "आजच्या एका सिलिंडरची किंमत काँग्रेसच्या काळातील दोन सिलिंडरच्या किमतीएवढी आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबांच्या भल्यासाठी फक्त काँग्रेसच काम करते. हा आपल्या आर्थिक धोरणाचा गाभा आहे" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण