शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

वेदनादायी! लग्नानंतर 17 वर्षांनी मुलं झाली पण बोट दुर्घटनेत गमावली; काळजात चर्र करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 12:46 IST

लग्नानंतर 17 वर्षांनी एका जोडप्यावा अपत्यप्राप्ती झाली होती. मात्र या बोट दुर्घटनेत अजवा रोडवर राहणाऱ्या कुटुंबातील दोन्ही मुलांचा मृत्यू झाला.

हरनी तलाव दुर्घटनेत 12 मुलांचा मृत्यू झाल्याने वडोदरात शोककळा पसरली आहे. सर्व मुलं न्यू सनराईज स्कूलमध्ये शिकत असून गुरुवारी ते पिकनिकसाठी आले होते. मुलांच्या पालकांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. याच दरम्यान एक हृदयद्रावक माहिती समोर आली आहे. लग्नानंतर 17 वर्षांनी एका जोडप्यावा अपत्यप्राप्ती झाली होती. मात्र या बोट दुर्घटनेत अजवा रोडवर राहणाऱ्या कुटुंबातील दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. मुलगा इयत्ता दुसरीत आणि बहीण तिसरीमध्ये शिकत होती. 

कुटुंबातील एका नातेवाईकाने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, तलावातून बाहेर काढल्यानंतर दोन्ही मुलांना खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु त्यांचा जीव वाचवता आला नाही. दोन्ही मुलांचा जन्म त्यांच्या आई-वडिलांच्या लग्नाला 17 वर्ष झाल्यानंतर झाला होता. पती-पत्नीने वर्षानुवर्षे विविध धार्मिक स्थळी जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांना दोन मुलं झाली होती.

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, दुर्घटना झाली त्यावेळी मुलांचे वडील युनायटेड किंग्डममध्ये होते. ते वडोदरा येथे रवाना झाले आहेत. पानीगेट मशिदीचे मुफ्ती इम्रान म्हणाले की, कुटुंबीयांनी एसएसजी रुग्णालयाच्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्या आहेत. या ठिकाणी मुलांचे शवविच्छेदन करण्यात आले. वडील परतल्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह दफन करण्यात येणार आहेत.

क्षणात होत्याचं नव्हतं झालं, मुलं रांगेत उभी होती अन् समोर मृत्यू...; हृदयद्रावक CCTV Video

सोशल मीडियावर या दुर्घटनेच्या आधीचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये न्यू सनराईज स्कूलचे विद्यार्थी बोट राईडसाठी रांगेत उभे असल्याचे दिसत आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, विद्यार्थी एका रांगेत उभं राहून बोटवर जाण्याची वाट पाहत होते. रिपोर्टनुसार, विद्यार्थी आणि शिक्षक दुपारी 4.30 च्या सुमारास पिकनिकसाठी तलावावर पोहोचले आणि एका बोटीवर गेले, जी ओव्हरलोडमुळे उलटली. हरनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, या दुर्घटनेत 14 मुलं आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. वाचवण्यात आलेल्या एका विद्यार्थ्यावर एसएसजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेSchoolशाळाStudentविद्यार्थी