शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 12:47 IST

GST Reforms: केंद्र सरकारने GST बाबत अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. हे सर्व बदल २२ सप्टेंबरपासून देशभरात लागू केले जातील.

GST Reforms: केंद्र सरकारने GST बाबत अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. हे सर्व बदल २२ सप्टेंबरपासून देशभरात लागू केले जातील. सरकारने जीएसटीबाबत आणलेल्या नियमांमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन बदलांनुसार, १२% आणि २८% चा स्लॅब रद्द करण्यात आला असून, फक्त ५% आणि १८% चा स्लॅब ठेवण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या GST परिषदेच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. दरम्यान, यावरुन आता काँग्रेसने भाजपवर टीका सुरू केली आहे. GST सुधारणांची मागणी काँग्रेसने सर्वात आधी केल्याचा दावा मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दावा केला आहे, काँग्रेस गेल्या एक दशकापासून GST सुधारणांची मागणी करत आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, "मोदी सरकारने “एक राष्ट्र, एक कर” बदलून “एक राष्ट्र, ९ कर” केले. ज्यामध्ये ०%, ५%, १२%, १८%, २८% कर स्लॅब आणि ०.२५%, १.५%, ३% आणि ६% विशेष दर समाविष्ट होते."

"काँग्रेस पक्षाने २०१९ आणि २०२४ च्या जाहीरनाम्यात सोपी आणि तर्कसंगत कर प्रणालीसह जीएसटी २.० ची मागणी केली होती. आम्ही जीएसटीच्या जटिलतेला सुलभ करण्याची मागणी देखील केली होती, ज्यामुळे एमएसएमई आणि लघु व्यवसायांवर वाईट परिणाम झाला. २८ फेब्रुवारी २००५ रोजी काँग्रेस-यूपीए सरकारने लोकसभेत औपचारिकपणे जीएसटीची घोषणा केली होती. २०११ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी जीएसटी विधेयक आणले, भाजपने त्याचा विरोध केला होता."

"मोदीजी मुख्यमंत्री असताना त्यांनी जीएसटीला जोरदार विरोध केला. आज, हेच भाजप सरकार सामान्य लोकांकडून कर वसूल करून एक उत्तम काम केल्यासारखे विक्रमी जीएसटी संकलन साजरे करते. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर कर लावण्यात आला आहे. या मोदी सरकारने कृषी क्षेत्रातील किमान ३६ वस्तूंवर जीएसटी लादला. मोदी सरकारने दूध-दही, पीठ-धान्य, अगदी मुलांच्या पेन्सिल-पुस्तके, ऑक्सिजन, विमा आणि रुग्णालयाचा खर्च यासारख्या दैनंदिन वस्तूंवरही जीएसटी कर लादला."

"म्हणूनच आम्ही भाजपच्या या जीएसटीला "गब्बर सिंग टॅक्स" असे नाव दिले. एकूण जीएसटीच्या दोन तृतीयांश, म्हणजेच ६४% गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या खिशातून येतो, तर अब्जाधीशांकडून फक्त ३% जीएसटी वसूल केला जातो. कॉर्पोरेट कराचा दरही ३०% वरून २२% पर्यंत कमी करण्यात आला आहे. गेल्या ५ वर्षात, आयकर संकलन २४०% ने वाढले, तर  जीएसटी संकलन १७७% ने वाढले. ही चांगली गोष्ट आहे की, मोदी सरकार ८ वर्षांनंतर जीएसटीच्या गाढ झोपेतून जागे झाले आहे आणि सुधारणा केल्या."

"आता सर्व राज्यांना २०२४-२५ हे आधार वर्ष मानून ५ वर्षांच्या कालावधीसाठी भरपाई देण्यात यावी. दरांमध्ये कपात केल्याने त्यांच्या महसुलावर विपरीत परिणाम होणार आहे. जीएसटीचे गुंतागुंतीचे अनुपालन देखील दूर करावे लागेल, तरच एमएसएमई आणि लघु उद्योगांना खऱ्या अर्थाने फायदा होईल," अशी प्रतिक्रिया खरगे यांनी आपल्या पोस्टमधून दिली आहे.

राहुल गांधींचे जुने ट्विट रिशेअर

केंद्र सरकारने जीएसमध्ये केलेल्या सुधारणानंतर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत हँडलवरुन राहुल गांधींचे जुने ट्विट रिशेअर केले जात आहेत. यामध्ये त्यांनी ८ वर्षांपूर्वी १८% कराची मागणी केलेली होती. तसेच, भाजपने आणलेल्या GST ला 'गब्बर सिंह टॅक्स' म्हटले होते. आता हे जुने जुने ट्विट शेअर करत भाजपला आठ वर्षांनंतर त्यांची चूक कळली, अशी टीका केली आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेGSTजीएसटीNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन