शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 12:47 IST

GST Reforms: केंद्र सरकारने GST बाबत अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. हे सर्व बदल २२ सप्टेंबरपासून देशभरात लागू केले जातील.

GST Reforms: केंद्र सरकारने GST बाबत अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. हे सर्व बदल २२ सप्टेंबरपासून देशभरात लागू केले जातील. सरकारने जीएसटीबाबत आणलेल्या नियमांमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन बदलांनुसार, १२% आणि २८% चा स्लॅब रद्द करण्यात आला असून, फक्त ५% आणि १८% चा स्लॅब ठेवण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या GST परिषदेच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. दरम्यान, यावरुन आता काँग्रेसने भाजपवर टीका सुरू केली आहे. GST सुधारणांची मागणी काँग्रेसने सर्वात आधी केल्याचा दावा मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दावा केला आहे, काँग्रेस गेल्या एक दशकापासून GST सुधारणांची मागणी करत आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, "मोदी सरकारने “एक राष्ट्र, एक कर” बदलून “एक राष्ट्र, ९ कर” केले. ज्यामध्ये ०%, ५%, १२%, १८%, २८% कर स्लॅब आणि ०.२५%, १.५%, ३% आणि ६% विशेष दर समाविष्ट होते."

"काँग्रेस पक्षाने २०१९ आणि २०२४ च्या जाहीरनाम्यात सोपी आणि तर्कसंगत कर प्रणालीसह जीएसटी २.० ची मागणी केली होती. आम्ही जीएसटीच्या जटिलतेला सुलभ करण्याची मागणी देखील केली होती, ज्यामुळे एमएसएमई आणि लघु व्यवसायांवर वाईट परिणाम झाला. २८ फेब्रुवारी २००५ रोजी काँग्रेस-यूपीए सरकारने लोकसभेत औपचारिकपणे जीएसटीची घोषणा केली होती. २०११ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी जीएसटी विधेयक आणले, भाजपने त्याचा विरोध केला होता."

"मोदीजी मुख्यमंत्री असताना त्यांनी जीएसटीला जोरदार विरोध केला. आज, हेच भाजप सरकार सामान्य लोकांकडून कर वसूल करून एक उत्तम काम केल्यासारखे विक्रमी जीएसटी संकलन साजरे करते. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर कर लावण्यात आला आहे. या मोदी सरकारने कृषी क्षेत्रातील किमान ३६ वस्तूंवर जीएसटी लादला. मोदी सरकारने दूध-दही, पीठ-धान्य, अगदी मुलांच्या पेन्सिल-पुस्तके, ऑक्सिजन, विमा आणि रुग्णालयाचा खर्च यासारख्या दैनंदिन वस्तूंवरही जीएसटी कर लादला."

"म्हणूनच आम्ही भाजपच्या या जीएसटीला "गब्बर सिंग टॅक्स" असे नाव दिले. एकूण जीएसटीच्या दोन तृतीयांश, म्हणजेच ६४% गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या खिशातून येतो, तर अब्जाधीशांकडून फक्त ३% जीएसटी वसूल केला जातो. कॉर्पोरेट कराचा दरही ३०% वरून २२% पर्यंत कमी करण्यात आला आहे. गेल्या ५ वर्षात, आयकर संकलन २४०% ने वाढले, तर  जीएसटी संकलन १७७% ने वाढले. ही चांगली गोष्ट आहे की, मोदी सरकार ८ वर्षांनंतर जीएसटीच्या गाढ झोपेतून जागे झाले आहे आणि सुधारणा केल्या."

"आता सर्व राज्यांना २०२४-२५ हे आधार वर्ष मानून ५ वर्षांच्या कालावधीसाठी भरपाई देण्यात यावी. दरांमध्ये कपात केल्याने त्यांच्या महसुलावर विपरीत परिणाम होणार आहे. जीएसटीचे गुंतागुंतीचे अनुपालन देखील दूर करावे लागेल, तरच एमएसएमई आणि लघु उद्योगांना खऱ्या अर्थाने फायदा होईल," अशी प्रतिक्रिया खरगे यांनी आपल्या पोस्टमधून दिली आहे.

राहुल गांधींचे जुने ट्विट रिशेअर

केंद्र सरकारने जीएसमध्ये केलेल्या सुधारणानंतर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत हँडलवरुन राहुल गांधींचे जुने ट्विट रिशेअर केले जात आहेत. यामध्ये त्यांनी ८ वर्षांपूर्वी १८% कराची मागणी केलेली होती. तसेच, भाजपने आणलेल्या GST ला 'गब्बर सिंह टॅक्स' म्हटले होते. आता हे जुने जुने ट्विट शेअर करत भाजपला आठ वर्षांनंतर त्यांची चूक कळली, अशी टीका केली आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेGSTजीएसटीNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन