शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

नवरदेवाच्या FB पोस्टनं सगळेच हादरले; कोणी माझी मदत करेल का? करतोय विनवणी, १८ जूनला लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 08:49 IST

उत्तर प्रदेशच्या बुंदेलखेड भागात आजही जातीभेद मोठ्या प्रमाणात दिसून येतो. दबंगगिरीमुळे पोलीस, प्रशासनही हतबल झाल्याचं दिसून येते

ठळक मुद्दे२२ वर्षीय नवरदेव अलखराम हा त्याच्या आईला आणि नातेवाईकांच्या गळ्यात पडून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देतोयघोड्यावर बसून वरात काढण्याच्या अलखरामच्या स्वप्नांचा चुराडा होणार आहे. त्यामुळे अलखराम निराश आहे.भाजपा आमदार ब्रिजभूषण राजपूत यांनी या नवरदेवाशी फोनवरून संवाद साधत लग्नात काहीही विपरित घडणार नाही याचं आश्वासन दिलं आहे.

उत्तर प्रदेशमधील बुंदेलखेडच्या महोबा जिल्ह्यातील एका गावात दलित नवरदेवाला घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी नाही. याच छळाला कंटाळून एका नवऱ्याने ज्याचं लग्न १८ जून रोजी होणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून लोकांकडे मदतीची याचना केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलंय की, १८ जूनला माझं लग्न आहे आणि घोड्यावर बसून मला वरात काढायची इच्छा आहे. कोणी माझी मदत करू शकेल का? असं त्याने विचारलं आहे.

नवरदेवाच्या या सोशल मीडिया पोस्टनं प्रशासन खडबडून जागं झालं आहे. स्वातंत्र्य भारतात आजही दलित नवरदेवाला घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी का नाही? असा संतप्त प्रश्न लोकं विचारू लागली आहे. ही सोशल मीडिया पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. २२ वर्षीय नवरदेव अलखराम हा त्याच्या आईला आणि नातेवाईकांच्या गळ्यात पडून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देतोय. अलखरामचं लग्न १८ जून रोजी होणार आहे.

अलखराम ज्या गावात राहतो त्याठिकाणी दलितांना घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी नाही. गावातील दबंग आणि उच्चवर्णीय लोक दलितांना घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी देत नाहीत. त्यामुळे घोड्यावर बसून वरात काढण्याच्या अलखरामच्या स्वप्नांचा चुराडा होणार आहे. त्यामुळे अलखराम निराश आहे. अलखरामच्या वडिलांनी महोबकंठच्या पोलीस ठाण्यात पत्र लिहून विनंतीही केली आहे.

महोबा जिल्ह्यातील महोबकंठ येथे माधवगंज नावाचं २ हजार लोकसंख्येचं गाव आहे. या गावात स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही दलित समाजातील नवरदेवाला घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी नाही. आतापर्यंत कोणत्याही दलित कुटुंबाने याचा विरोध केला नाही कारण गावातील काही दबंग लोकांची दहशत या लोकांच्या मनात कायम आहे. गावातील संकुचित विचारधारेचे लोक आजही दलित नवरदेवाला घोड्यावर बसून वरात काढण्याची परवानगी देत नाहीत. या गावातील वृद्ध लोक सांगतात कोणत्याही दलिताला घोड्यावर बसून वरात काढता येत नाही.

उत्तर प्रदेशच्या बुंदेलखेड भागात आजही जातीभेद मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या परिसरातील गावात स्वातंत्र्यानंतरही कोणत्याही दलित नवरदेवाला घोड्यावर वरात काढणं दूरच पण कार, बाईकवरूनही नवरदेव गावातून निघू शकत नाही. दबंगगिरीमुळे पोलीस, प्रशासनही हतबल झाल्याचं दिसून येते. आता अलखरामच्या सोशल मीडिया पोस्टनं जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं आहे. परंतु काहीच करता येत नाही. मात्र भीम आर्मीनं यात उडी घेतली आहे. अलखरामची वरात घोड्यावरून काढण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. तर भाजपा आमदार ब्रिजभूषण राजपूत यांनी या नवरदेवाशी फोनवरून संवाद साधत लग्नात काहीही विपरित घडणार नाही याचं आश्वासन दिलं आहे.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश