शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

स्मशानभूमीच्या शेडचे छप्पर कोसळून 24 जणांचा मृत्यू, NDRF ने सांगितलं दुर्घटनेमागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 16:23 IST

Ghaziabad Graveyard Roof : पाऊस पडत असल्याने लोकांनी स्मशानातील शेडचा आधार घेतला होता. मात्र त्याचदरम्यान या शेडचे छप्पर अचानक कोसळले आणि त्याखाली अनेकजण दबले गेले.

गाझियाबाद - उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका स्मशानभूमीमधील शेडचे छप्पर कोसळून झालेल्या अपघातात तब्बल 24 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी दोन सदस्यांची चौकशी समिती गठीत केली गेली आहे. गाझियाबाद ग्रामीणचे पोलीस अधिक्षकांनी याबाबत माहिती दिली आहे.

गाझियाबादमधील मुरादनगर परिसरात ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुरादनगर येथील स्मशानभूमीत काही जण एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारांसाठी आले होते. पाऊस पडत असल्याने लोकांनी स्मशानातील शेडचा आधार घेतला होता. मात्र त्याचदरम्यान या शेडचे छप्पर अचानक कोसळले आणि त्याखाली अनेकजण दबले गेले. 17 ते 18 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे स्मशानभूमीच्या शेडचे छप्पर हे काही महिन्यांपूर्वीच नव्याने बांधण्यात आलं होतं. NDRF टीने याबाबत माहिती देताना धक्कादायक खुलासा केला आहे. स्मशानभूमीच्या शेडचे छप्पर कोसळण्यामागचं कारण सांगितलं आहे. 

चार महिन्यांपूर्वीच नवीन छप्पर बांधण्यात आलं होतं. छत बांधण्यासाठी वापरण्यात आलेलं सामान हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उखलारसी गावातील एका व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी आणण्यात आला होता. या मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असताना उपस्थित लोकांनी छताखाली आश्रय घेतला होता. त्याचवेळी स्मशानमधील शेडचे छप्पर कोसळून सुमारे 20 ते 25 जण त्याखाली अडकले. यामधील 8 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमींनी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांची संख्या आता 24 वर पोहोचली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच उत्तर प्रदेश सरकारकडून या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबास दोन लाख रुपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे. गाझियाबादला मेरठशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर संतप्त झालेल्या मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह ठेवून रास्ता रोको केला आहे. यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. पोलीस प्रशासन नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूPoliceपोलिस