शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

दररोज 50 लाख जणांना रोजगार देणार यूपी सरकार; योगींची योजना होतेय तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 7:10 PM

मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि इतर राज्यातून अद्यापही हजोर मजूर पायीच आपल्या गावाकडं जाताना दिसत आहेत. त्यात, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणऱ्या मजुरांची संख्या लक्षणीय आहे

लखनौ - लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शिथिलता दिल्यानंतर या सर्वच नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात येत आहे. त्यासाठी, रेल्वे, बस आणि खासगी वाहनांने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परराज्यातील मजूरांना स्पेशल श्रमिक ट्रेनच्या सहाय्याने राज्य सरकारने त्यांच्या राज्यात पाठविण्यात सुरुवात केली आहे. गावी पोहोचल्यानंतर आता करायचे काय, असा प्रश्न वाटेत चालतानाच या मजूरांच्या मनात भेडसावत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या मजुरांच्या प्रश्नावर उत्तर शोधले आहे.  

मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि इतर राज्यातून अद्यापही हजोर मजूर पायीच आपल्या गावाकडं जाताना दिसत आहेत. त्यात, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणऱ्या मजुरांची संख्या लक्षणीय आहे. लाखो मजूर आता आपल्या गावी पोहोचल आहेत, पोहोचत आहेत. तर, आता मुंबईत जायचं नको, असेही अनेकांनी ठरवलंय. मात्र, भविष्याचा मोठा प्रश्न या मुजरांपुढे उभा राहिला आहे. गावी जाऊन करायचं काय, पोट भरायचं कसं, हीच काळजी त्यांना भेडसावत आहे. त्यामुळेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या मजुरांच्या रोजगारासाठी एक योजना आखायला सुरुवात केली आहे. 

या महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात १ कोटी रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेशच योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. ग्रामीण भागात रोजगारनिर्मित्तीसाठी मनरेगा सर्वात प्रभावी उपक्रम असल्याचं योगींनी म्हटलं आहे. २३ कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये आपण ५० लाख रोजगार निर्मित्ती काही वेळेत करणे आवश्यक आहे. सध्या अधिकाधिक लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणे, हेच सर्वात मोठे कार्य आहे. त्यासाठी, प्रत्येक ग्रामसेवकाने मजबुतीने आणि जबाबदारीने काम करणं गरजेचं आहे. योगी आदित्यनाथ यांनी सरकारी बंगल्यावर जवळपास ३५ हजार ८१८ ग्रामसेवकांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून २२५.३९ कोटींची रक्कम जमा केले आहेत. 

राज्यात एमएसएमईद्वारे लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. यांसदर्भात योगी आदित्यानाथ यांनी व्हिडिओ कॉन्फेरेन्सिंगद्वारे अनेक उद्योजकांशी संवादही साधला. दरम्यान, मुंबई, पुणे, दिल्ली येथून मोठ्या संख्येने मजूर उत्तर प्रदेश आणि बिहार येथे जात आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट सेवा बंद असल्याने हे मजूर गावी जाण्यासाठी पायपीठ करत आहेत. यातून अपघाताच्या घटना घडताना दिसत आहेत. औरंगाबाद येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेत १५ मजूरांचा मृत्यू झाला. या घटनेनं देशातील मजूरांच्या स्थलांतराचे भीषण वास्तव जगासमोर आले आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथEmployeeकर्मचारीjobनोकरीMigrationस्थलांतरणcorona virusकोरोना वायरस बातम्या