शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

...तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 9:04 AM

4 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

लखनऊ: उत्तर प्रदेश सरकार पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे. कामात बेजबाबदारपणा दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास सरकारी सेवेत असलेल्या 16 लाखांपैकी 4 लाख कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागू शकते. दैनंदित कामात बेजबाबदार असलेल्या, कामात सकारात्मक नसलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. यासाठी सर्व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा एक अहवाल तयार करण्यात येईल, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं दिली. यासाठी 31 जुलैपर्यंतची कामगिरी विचारात घेण्यात येणार आहे. याबद्दलचा अहवाल त्यांच्या वरिष्ठांना सोपवण्यात येईल. 'वयाची पन्नाशी उलटलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा अहवाल 31 जुलै 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 31 मार्च 2018 पर्यंत वयाची पन्नाशी पूर्ण केलेल्यांच्या कामगिरीचा यासाठी विचार करण्यात येईल,' अशी माहिती अतिरिक्त सचिव मुकुल सिंह यांनी सांगितलं. नियमांनुसार कोणताही कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेऊ शकतो, असंही सरकारनं सांगितलं आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. असे निर्णय फक्त कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी घेतले जातात, असं उत्तर प्रदेश सचिवालय कर्मचारी संघाचे अध्यक्ष यादवेंद्र मिश्रा यांनी म्हटलं. 'अशा प्रकारची कारवाई सहन केली जाणार नाही. याबद्दल आज बैठक घेऊन पुढील रणनिती निश्चित केली जाईल. राज्य सरकारनं या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास आमची संघटना संपावर जाईल,' असा इशारादेखील त्यांनी दिला.  

टॅग्स :GovernmentसरकारUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ