शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

टोलमुक्तीसाठी सरकारकडून जनतेची दिशाभूल - पाटील

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

अनगर :

अनगर :
भाजपचे आघाडी सरकार राज्यात सत्तेवर येताच टोलमुक्तीबाबत सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करीत आता केवळ चारचाकी वाहनांनाच टोलमुक्ती देण्याचा प्रयत्न करीत असून, लहान-सहान चारचाकी वाहनांना या टोलमधून वगळून त्याचा अधिभार जडमाल वाहतूक करणार्‍या वाहनांवर लावण्याचा सध्या सरकार प्रयत्न करीत असून, याचा सर्वात मोठा फटका शेतीमालाची वाहतूक करणार्‍या वाहनांना म्हणजेच पर्यायाने कष्टकरी शेतकर्‍यांनाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बसणार आहे, असे प्रतिपादन माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांनी लोकनेते कारखान्यावर झालेल्या शेतकरी सहविचार चर्चेच्या बैठकीत गुरुवारी केले.
यावेळी कृषिभूषण दादा बोडके, प्रगतिशील बागायतदार डॉ. सुभाष गुजरे, मुरलीधर गुंड, अंकुश गुंड, सुनील घाटुळे, राम कदम, हरी गुंड, रामलिंग माळी, भागवत शिंदे, विठ्ठल कारंडे, किसन गुंड, सज्जन खोत, नारायण गुंड, संभाजी थिटे आदी उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले की, हे सरकार केवळ उच्चभ्रू, र्शीमंत, धनिकांच्या चारचाकी वाहनांचीच काळजी घेत असून, दुसरीकडे मात्र शेतीमालाच्या वाहतुकीवर प्रपंच असणार्‍या शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करून देशोधडीला लावण्याच्या मानसिकतेत असल्याचे म्हणाले.
यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक सज्जन पाटील, अनगरचे उपसरपंच शहाजी गुंड, बालाजी पासले, तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष हेमंत गरड, र्शीकांत गायकवाड, शशी पाटील, कुंदन धोत्रे, चंद्रकांत देवकते, शामराव पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)