शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

विजय माल्याला दिलेल्या कर्जाची माहिती सरकारलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2018 3:42 PM

बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बूडवून देशाबाहेर पळालेला विजय माल्याला किती कर्ज दिले आहे याची माहिती सरकारला नसल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

नवी दिल्ली - बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बूडवून देशाबाहेर पळालेला विजय माल्याला किती कर्ज दिले आहे याची माहिती सरकारला नसल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. माहिती आधिकार (आरटीआय)मध्ये वित्त मंत्रालयाला माल्याला दिल्या गेलेल्या कर्जाची माहिती विचारली होती. त्यामध्ये त्यांनी असे स्पष्ट केलं की, विजय माल्याला कीती कर्ज दिली याची माहिती आपल्याजवळ उपलब्ध नाही. राजीव कुमार खरे यांनी आरटीआय आवेदनामार्फत वित्त मंत्रालयाकडून विजय माल्याला देण्यात आलेल्या एकूण खर्चाची माहिती मागितली होती.  

केंद्रीय सुचना आयोगाला (सीआईसी) वित्त मंत्रालयानं सांगितले की, विजय माल्याला किती कर्ज दिले याचा रेकॉर्ड आमच्या जवळ नाही. याबाबतची माहिती संबधित बँकांना अन्यथा आरबीआयजवळ असेल असेही मंत्रालयानं सांगितले. वित्त मंत्रालयाच्या या उत्तराला सीआईसीने संशयास्पद असल्याचे म्हटले. मुख्य सुचना आयुक्त आर.के माधुर यांनी वित्त मंत्रालयालातील आधिकाऱ्यांना आरटीआय आवेदन संबंधित सरकारी कार्यालयाकडे पाठवण्याचे आदेश दिले. 

यापूर्वी सरकारनं दिली आहे माहिती - वित्त मंत्रालयाच्या आधिकाऱ्यानं आरटीआयच्या आवेदनामध्ये विजय माल्याला किती कर्ज दिले याची माहिती नसल्याचे स्पष्ट केलं असले तरी वित्त मंत्रालय माजी संसदेनं याची माहिती दिली आहे. वित्त राज्य मंत्री संतोष गंगवार यांनी 17 मार्च 2017मध्ये माल्या बद्दल उत्तर दिले. त्यांनी यात म्हटले आहे की, 2004 मध्ये विजय माल्याला कर्ज दिले होते. फेब्रुवारी 2008मध्ये ते भरण्याची मुदत होती. 2009 मध्ये 8, 040 कोटी कर्जाच एनपीए(नॉन परफॉर्मिंग एसेट) घोषित केलं होतं आशी माहिती देण्यात आली होती. विजय माल्यांची संपत्ती विकून 155 कोटींची रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती त्यावेळी गंगावार यांनी दिली होती. 

काय आहे प्रकरण -

विजय माल्याने व्यवसायाच्या नावावर भारतातील बँकांकडून 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे सर्व थकीत कर्ज तसेच ठेऊन त्याने इंग्लंडला पलायन केले होते. सद्या तो इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे.  त्यानंतर सीबीआय आणि इडीने केलेल्या कारवाईत माल्याची भारतातील कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. तसेच माल्याला फरार म्हणून घोषित करत त्यावर अजामीनपात्र अटक वॉरंट देखील जारी करण्यात आले आहे.

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्या