शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष्य यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 06:54 IST

अब की बार ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत काही राज्यांमध्ये फटका बसत आहे. काही राज्यांमध्ये जागा कमी होणार असल्याचे अहवाल आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे.

संजय शर्मा -

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, ओडिशानंतर आता दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आशा वाढल्या आहेत. महाराष्ट्रासारख्या काही राज्यांमध्ये जागांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी भाजपने आता उत्तर प्रदेशमध्ये आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.

अब की बार ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत काही राज्यांमध्ये फटका बसत आहे. काही राज्यांमध्ये जागा कमी होणार असल्याचे अहवाल आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. ३७० जागा येतील की ३०० पेक्षा कमी जागा येतील? स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असणारा जादुई आकडा २७२ पर्यंत जाईल की, २५० पर्यंतच जागा जिंकता येतील या प्रश्नांनी भाजप नेत्यांना छळले आहे.

...येथे आनंदाची बातमी- पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये किती जागा वाढणार हे निश्चित आहे. मात्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून भाजपासाठी आनंदाची बातमी आली आहे. - आंध्र प्रदेशात भाजपचा नवा सहकारी तेलुगू देसम पक्ष चांगली कामगिरी करत आहे आणि भाजपलाही त्याच्याशी युती केल्याचा फायदा होत आहे. आंध्रमध्ये भाजप दोन ते तीन जागा जिंकू शकतो, असा अंदाज आहे.

महाराष्ट्रामध्ये जागा कमी होणार? - २०१९ च्या तुलनेत यावेळी भाजपला यावेळी २०२४ मध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणा, राजस्थानमध्ये कमी जागा मिळण्याचा अंदाज आहे.- ज्या राज्यांमध्ये भाजपच्या जागा वाढू शकतात, त्यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रितआता शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी भाजपने उत्तर प्रदेशात आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. नरेंद्र मोदी स्वतः वाराणसीत तळ ठोकून उत्तर प्रदेशातील १३ लोकसभा जागांवर आपले लक्ष केंद्रित करणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या आधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उत्तर प्रदेशात पोहोचत असून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना हिमाचल प्रदेश आणि पंजाबवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत उत्तर प्रदेशातच राहणार आहेत. १ जून रोजी अंतिम फेरीच्या मतदानासाठी ३० मे रोजी निवडणूक प्रचार संपणार आहे.

तेलंगणात किती जागा वाढणार?- तेलंगणातून भाजपसाठी निवडणूक सर्वेक्षण करणारे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी दावा केला आहे की, तेलंगणात भाजपच्या जागा चारवरून वाढत आठ ते दहा होऊ शकतात.- राव हे भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. आंध्र प्रदेशात टीडीपी १५ जागा जिंकू शकते असा त्यांचा दावा आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डाAmit Shahअमित शाहBJPभाजपाElectionनिवडणूक 2024