शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

जल वाहतूक ठरतेय जीवघेणी! बोट दुर्घटनेत तब्बल 10 हजार 580 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 13:39 IST

भारतात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देभारतात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत वाढ झाली आहे. 2001 ते 2015 पर्यंत राज्यात बोट उलटण्याच्या 8 हजार 772 घटना घडल्या आहेत. 10 हजार 580 लोकांचा मृत्यू झाला आहे.

विजयवाडा - आंध्र प्रदेशमध्ये गोदीवरी नदीत प्रवासी बोट उलटल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी ही दुर्घटना घडली. बुडालेल्या बोटीतील 40 प्रवासी अद्याप बेपत्ता असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसदारांना 10 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.  

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान बोट उलटल्याने 11 जणांचा मृत्यू झाला. तर महाराष्ट्रातील सांगली जिल्हातील पलूस तालुक्यातील ब्राम्हनाळ येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत एकुण 17 जणांचा मृत्यू झाला होता. भारतात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत वाढ झाली आहे. National Crime Records Bureau (NCRB) ने याबाबत माहिती दिली आहे. 

2001 ते 2015 पर्यंत राज्यात बोट उलटण्याच्या 8 हजार 772 घटना घडल्या आहेत. यामध्ये 10 हजार 580 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड या राज्यात सर्वात जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. बोट दुर्घटनेत उत्तर प्रदेशात 1753, मध्य प्रदेश 1665, बिहार 1216, छत्तीसगड 864, तामिळनाडू 630, कर्नाटक 447, ओडीसा 386, केरळ 360 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असणे, लाईफ जॅकेट नसणे, विनापरवाना बोट चालवणे या गोष्टींमुळे बोट दुर्घटना घडत असल्याचं समोर येत आहे. आंध्र प्रदेशमधील बोट दुर्घटनेबाबत आंध्र प्रदेश आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीमध्ये असलेल्या 61 प्रवाशांपैकी 50 जण पर्यटक होते. तर अन्य 11 जण हे बोटीवरील कर्मचारी होते. गोदावरी नदीजवळील पपीकोंडालू हिलचा नजारा पाहण्यासाठी ही मंडळी सहलीसाठी गेली होती. बोट बुडाल्यानंतर त्यातील काही प्रवाशांनी पोहून किनारा गाठला. यामध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :Deathमृत्यूIndiaभारत