शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

जल वाहतूक ठरतेय जीवघेणी! बोट दुर्घटनेत तब्बल 10 हजार 580 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 13:39 IST

भारतात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देभारतात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत वाढ झाली आहे. 2001 ते 2015 पर्यंत राज्यात बोट उलटण्याच्या 8 हजार 772 घटना घडल्या आहेत. 10 हजार 580 लोकांचा मृत्यू झाला आहे.

विजयवाडा - आंध्र प्रदेशमध्ये गोदीवरी नदीत प्रवासी बोट उलटल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी ही दुर्घटना घडली. बुडालेल्या बोटीतील 40 प्रवासी अद्याप बेपत्ता असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसदारांना 10 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.  

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान बोट उलटल्याने 11 जणांचा मृत्यू झाला. तर महाराष्ट्रातील सांगली जिल्हातील पलूस तालुक्यातील ब्राम्हनाळ येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत एकुण 17 जणांचा मृत्यू झाला होता. भारतात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत वाढ झाली आहे. National Crime Records Bureau (NCRB) ने याबाबत माहिती दिली आहे. 

2001 ते 2015 पर्यंत राज्यात बोट उलटण्याच्या 8 हजार 772 घटना घडल्या आहेत. यामध्ये 10 हजार 580 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड या राज्यात सर्वात जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. बोट दुर्घटनेत उत्तर प्रदेशात 1753, मध्य प्रदेश 1665, बिहार 1216, छत्तीसगड 864, तामिळनाडू 630, कर्नाटक 447, ओडीसा 386, केरळ 360 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असणे, लाईफ जॅकेट नसणे, विनापरवाना बोट चालवणे या गोष्टींमुळे बोट दुर्घटना घडत असल्याचं समोर येत आहे. आंध्र प्रदेशमधील बोट दुर्घटनेबाबत आंध्र प्रदेश आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीमध्ये असलेल्या 61 प्रवाशांपैकी 50 जण पर्यटक होते. तर अन्य 11 जण हे बोटीवरील कर्मचारी होते. गोदावरी नदीजवळील पपीकोंडालू हिलचा नजारा पाहण्यासाठी ही मंडळी सहलीसाठी गेली होती. बोट बुडाल्यानंतर त्यातील काही प्रवाशांनी पोहून किनारा गाठला. यामध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :Deathमृत्यूIndiaभारत