शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

Global Warming : भारताला जीवघेण्या उष्णतेच्या लाटेचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 13:28 IST

जागतिक तापमानवाढ ही संपूर्ण जगासमोरील गंभीर समस्या बनली आहे. येत्या काळात या समस्येचा मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे.

मुंबई  - जागतिक तापमानवाढ ही संपूर्ण जगासमोरील गंभीर समस्या बनली आहे. येत्या काळात या समस्येचा मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता असून, एका अहवालातील माहितीनुसार जर जगाच्या तापमानात दोन डिग्री सेल्शियसने वाढ झाली तर भारताला उष्ण हवेच्या लाटेचा धोका उद्भवू शकतो. 2015 साली भारताला अशाच उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला होता. ज्यामध्ये सुमारे 2500 लोक मृत्युमुखी पडले होते. या उष्णतेच्या लाटेचा पाकिस्तानातील कराची आणि भारतातील कोलकाता या भारतीय उपखंडामधील शहरांना भारतीय सर्वाधिक फटका बसेल. या दोन्ही शहरात 2015 सारखी स्थिती उद्भवू शकेल, अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. जगातील वातावरणात होत असलेल्या बदलांच्या संदर्भात आयपीसीसीचा अहवाल सोमवारी सादर होणार आहे. या अहवालामध्ये जागतिक तापमान वाढीच्या भारताला असलेल्या गंभीर धोक्यासंदर्भात इशारा देण्यात आला आहे. तसेच युनायटेड किंग्डममधील कार्बनब्रिफ या हवामानासंदर्भात माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने भारतातील मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या चार मोठ्या शहरांसंदर्भात धोक्याचा इशारा दिला आहे. या चारही शहरांमधील सरासरी तापमान गेल्या 147 वर्षांमध्ये 1 डिग्रीने वाढल्याचे या संकेतस्थळाने म्हटले आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात वातावरणातील बदलांसंदर्भात पोलंडमध्ये होणाऱ्या बैठकीत या अहवालामधील काही निष्कर्षांवर चर्चा होणार आहे. तसेच वातावरणातील बदल रोखण्यासाठी सरकारांकडून पॅरिस कराराची समीक्षाही करण्यात येईल. जगातील सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांपैकी एक असल्याने भारतही या बैठकीत महत्त्वाच्या भूमिकेत असेल.  तापमान वाढीबाबत धोक्याचा इशारा देताना या अहवालात  2030 पर्यंत जगाचे सरासरी तापमान 1.5 डिग्रीच्या स्तरावर पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात आले आहे. जर याच गतीने तापमान वाढत राहिले तर 2030 ते 2052 या दरम्यान जागतिक तापमान 15. डिग्री सेल्सीयसने वाढू शकते, असे या अहवालाता म्हटले आहे. 

टॅग्स :weatherहवामानHeat Strokeउष्माघातIndiaभारत