शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

चुक झाली तर कुणीही सुटत नाही गिरीश महाजन : ग्रामसेवकांनी ग्रामविकासात हातभार लावावा

By admin | Updated: July 4, 2016 00:46 IST

जळगाव : केंद्र शासनाने पंचायत राज व्यवस्था सक्षम करण्यासाठी निधीचे वितरण थेट ग्रामपंचायतींना सुरु केले आहे. त्यामुळे गावातील ग्रामसेवक व सरपंच हे गावाचे मालक आहे. निधी येत असताना सतर्क रहा. चुक झाली तर कुणीही सुटत नाही असा सूचक इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला.

जळगाव : केंद्र शासनाने पंचायत राज व्यवस्था सक्षम करण्यासाठी निधीचे वितरण थेट ग्रामपंचायतींना सुरु केले आहे. त्यामुळे गावातील ग्रामसेवक व सरपंच हे गावाचे मालक आहे. निधी येत असताना सतर्क रहा. चुक झाली तर कुणीही सुटत नाही असा सूचक इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला.
रविवारी जिल्हा बँक सभागृहात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचा राज्यस्तरीय मेळावा झाला. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, जि.प.अध्यक्षा प्रयाग कोळी, आमदार गुलाबराव पाटील, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय मस्कर, ग्रामसेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एकनाथराव ढाकणे, जि.प.सदस्य समाधान पवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजन पाटील, मीनल कुटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जबाबदारी वाढली पण जरा सांभाळून
केंद्र शासनाने गावाच्या विकासाठी निधी थेट ग्रामपंचायतींना दिला आहे. त्यामुळे ग्रामसेवकांची जबाबदारी वाढली आहे. मात्र आता माहितीचा अधिकार आहे. वेगळ्या मार्गाने त्याचा अवलंब होत आहे. त्यामुळे सतर्क रहा. लोकप्रतिनिधी किंवा साहेब सांगतात म्हणून कामे करू नका. कारण चुकीला आता माफी नाही असा सूचक इशारा गिरीशमहाजनयांनी दिला.
गाव परिसर आजही अस्वच्छच
ग्रामसेवक, तलाठी आणि शिक्षक यांनी ठरविले तर गावाचे भविष्य बदलवू शकतात. मात्र आजही अनेक गावांमध्ये अस्वच्छता आहे. सर्वत्र उकिरडे, अस्वच्छता आहे. गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही सर्वांचीच असल्याचे त्यांनी सांगितले.

हगणदरी मुक्त गाव प्रमाणपत्रासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरु केले आहे. त्याला यशस्वी करण्याची सर्वाची जबाबदारी आहे. आजही अनेक गावांमध्ये उकिरडे कायम आहेत. सकाळी उघड्यावर शौचालयाला बसलेले असतात. ग्रामीण भागात असे चित्र असताना कार्यकर्ते हे हगणदरी मुक्त गावाचे बीडीओ किंवा सीईओ यांनी पत्र द्यावे त्यासाठी आपल्याकडे आग्रह धरत असतात.

पाणी नाही तर शौचालय बांधायचे कसे?
गेल्या वर्षी दुष्काळीस्थिती होती. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची वाईट अवस्था होती. त्यातच नागरिकांना हगणदरी मुक्त गावासाठी शौचालय बांधण्यास सांगण्याचा प्रयत्न केला असता, पिण्यासाठी पाणी नाही तर स्वच्छतागृहासाठी पाणी कोठून आणावे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो. त्यामुळे आधी पाणी द्या नंतर हगणदरी मुक्त गाव करू असे नागरिकांकडून सांगितले जाते. हा प्रश्न म्हणजे आधी कोंबडी की अंडे असा आहे.