शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चुक झाली तर कुणीही सुटत नाही गिरीश महाजन : ग्रामसेवकांनी ग्रामविकासात हातभार लावावा

By admin | Updated: July 4, 2016 00:46 IST

जळगाव : केंद्र शासनाने पंचायत राज व्यवस्था सक्षम करण्यासाठी निधीचे वितरण थेट ग्रामपंचायतींना सुरु केले आहे. त्यामुळे गावातील ग्रामसेवक व सरपंच हे गावाचे मालक आहे. निधी येत असताना सतर्क रहा. चुक झाली तर कुणीही सुटत नाही असा सूचक इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला.

जळगाव : केंद्र शासनाने पंचायत राज व्यवस्था सक्षम करण्यासाठी निधीचे वितरण थेट ग्रामपंचायतींना सुरु केले आहे. त्यामुळे गावातील ग्रामसेवक व सरपंच हे गावाचे मालक आहे. निधी येत असताना सतर्क रहा. चुक झाली तर कुणीही सुटत नाही असा सूचक इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला.
रविवारी जिल्हा बँक सभागृहात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचा राज्यस्तरीय मेळावा झाला. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, जि.प.अध्यक्षा प्रयाग कोळी, आमदार गुलाबराव पाटील, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय मस्कर, ग्रामसेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एकनाथराव ढाकणे, जि.प.सदस्य समाधान पवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजन पाटील, मीनल कुटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जबाबदारी वाढली पण जरा सांभाळून
केंद्र शासनाने गावाच्या विकासाठी निधी थेट ग्रामपंचायतींना दिला आहे. त्यामुळे ग्रामसेवकांची जबाबदारी वाढली आहे. मात्र आता माहितीचा अधिकार आहे. वेगळ्या मार्गाने त्याचा अवलंब होत आहे. त्यामुळे सतर्क रहा. लोकप्रतिनिधी किंवा साहेब सांगतात म्हणून कामे करू नका. कारण चुकीला आता माफी नाही असा सूचक इशारा गिरीशमहाजनयांनी दिला.
गाव परिसर आजही अस्वच्छच
ग्रामसेवक, तलाठी आणि शिक्षक यांनी ठरविले तर गावाचे भविष्य बदलवू शकतात. मात्र आजही अनेक गावांमध्ये अस्वच्छता आहे. सर्वत्र उकिरडे, अस्वच्छता आहे. गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही सर्वांचीच असल्याचे त्यांनी सांगितले.

हगणदरी मुक्त गाव प्रमाणपत्रासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरु केले आहे. त्याला यशस्वी करण्याची सर्वाची जबाबदारी आहे. आजही अनेक गावांमध्ये उकिरडे कायम आहेत. सकाळी उघड्यावर शौचालयाला बसलेले असतात. ग्रामीण भागात असे चित्र असताना कार्यकर्ते हे हगणदरी मुक्त गावाचे बीडीओ किंवा सीईओ यांनी पत्र द्यावे त्यासाठी आपल्याकडे आग्रह धरत असतात.

पाणी नाही तर शौचालय बांधायचे कसे?
गेल्या वर्षी दुष्काळीस्थिती होती. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची वाईट अवस्था होती. त्यातच नागरिकांना हगणदरी मुक्त गावासाठी शौचालय बांधण्यास सांगण्याचा प्रयत्न केला असता, पिण्यासाठी पाणी नाही तर स्वच्छतागृहासाठी पाणी कोठून आणावे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो. त्यामुळे आधी पाणी द्या नंतर हगणदरी मुक्त गाव करू असे नागरिकांकडून सांगितले जाते. हा प्रश्न म्हणजे आधी कोंबडी की अंडे असा आहे.