शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

राज्यसभेतून गुलाम नबी 'आझाद'; आठवलेंनी वाचली कविता, मोदी- शाहंनाही हसू आवरलं नाही

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 9, 2021 13:37 IST

आपल्याला पुन्हा येथे आणण्याची काँग्रेसची इच्छा नसेल तर, आम्ही आपल्याला येथे आणायला तयार आहोत. येथे येण्यास कसल्याही प्रकारचा त्रास नाही, मीही तिकडेच होतो. मात्र, आता इकडे आलो आहे.

नवी दिल्ली -काँग्रेस खासदार गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांना आज राज्यसभेतून निरोप देण्यात आला. संसदेत निरोपाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी त्यांची जबरदस्त तारीफ केली. यावेळी ते भाऊकही झाले. यानंतर बोलण्याची वेळ आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची. त्यांनी गुलाम नबींसाठी एक कविताच वाचली. कविता वाचल्यानतंर रामदास आठवले म्हणाले, काँग्रेसने तुम्हाला पुन्हा येथे आणले नाही, तर आम्ही आपल्याला येथे आणायला तयार आहोत. यानंतर सभागृहात एकच हाशा पिकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी ((Narendra Modi)) आणि गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनादेखील हसू आवरता आले नाही. (Ghulam Nabi Azad farewell)

मीही तिकडेच होतो, पण आता इकडे आलोय -गुलाम नबी यांची तारीफ करताना रामदास आठवले म्हणाले, ‘’आपला स्वभाव अत्यंत चांगला आहे. आपण फार मोठ्या मणाचे आहात. आपण पुन्हा या सभागृहात यायला हवे. जर आपल्याला पुन्हा येथे आणण्याची काँग्रेसची इच्छा नसेल तर, आम्ही आपल्याला येथे आणायला तयार आहोत. येथे येण्यास कसल्याही प्रकारचा त्रास नाही, मीही तिकडेच होतो. मात्र, आता इकडे आलो आहे. तर तुम्हाला काय त्रास आहे. आपण पुन्हा सभागृहात यायला हवे. हीच आमची इच्छा आहे.

राज्यसभेत पंतप्रधान मोदी भावूक, इंटरनेट युझर्सच्या आल्या अशा प्रतिक्रिया

रामदास आठवलेंची कविता -राज्यसभा छोड़कर जा रहे गुलाम नबीराज्यसभा छोड़कर जा रहे गुलाम नबी...हम मिलते रहेंगे आपको कभी कभीआपका नाम है गुलाम, इसलिए मैं करता हूं आपको सलामआपका नाम है गुलाम, लेकिन आप हमेशा रहे आजादआप हम सभी को रहेंगे याद15 अगस्त को देश हुआ आजाद, लेकिन राज्यसभा से आप आज हो रहे आजादआप हमेशा रहो आजाद, हम रहेंगे आपके साथ... ये अंदर की है बातमोदी जी जम्मू कश्मीर का मजबूत करेंगे हाथ और आपका देते रहेंगे साथ...

कधीही पाकिस्तानात गेलो नाही, हे माझं भाग्य: गुलाम नबी आझाद

पंतप्रधान मोदींनी केली गुलाम नबींची तारीफ, भावूकही झाले -तत्पूर्वी, जम्मू काश्मिरातील एका दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत मोदी म्हणाले, ''ते जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. आमची चांगली जवळीक होती. एकदा गुजरातचे नागरिक जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते. तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केले. या हल्ल्यात आठ लोक मारले गेले होते. सर्वप्रथम गुलाम नबी यांचा मला फोन आला.'' एवढे बोलताच पंतप्रधान मोदी भावूक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. यावेळी सभागृहात एकच शांतता पसरली होती. यानंतर मोदींनी पाणी पिले आणि स्वतःला सावरले. यावेली त्यांनी सभागृहाची क्षमाही मागितली.

1982 साल 'ते' कधीच विसरणार नाहीत, पवारांच्या विधानावर सभागृहात हशा

काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांच्यासह 4 खासदारांचा आज संसदेतला शेवटचा दिवस आहे, त्यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुलाम नबी आझाद यांचं कौतुक केले, त्याचसोबत आझाद यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात भावूक झाल्याचं दिसून आलं. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाcongressकाँग्रेसParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभा