शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

राज्यसभेतून गुलाम नबी 'आझाद'; आठवलेंनी वाचली कविता, मोदी- शाहंनाही हसू आवरलं नाही

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 9, 2021 13:37 IST

आपल्याला पुन्हा येथे आणण्याची काँग्रेसची इच्छा नसेल तर, आम्ही आपल्याला येथे आणायला तयार आहोत. येथे येण्यास कसल्याही प्रकारचा त्रास नाही, मीही तिकडेच होतो. मात्र, आता इकडे आलो आहे.

नवी दिल्ली -काँग्रेस खासदार गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांना आज राज्यसभेतून निरोप देण्यात आला. संसदेत निरोपाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी त्यांची जबरदस्त तारीफ केली. यावेळी ते भाऊकही झाले. यानंतर बोलण्याची वेळ आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची. त्यांनी गुलाम नबींसाठी एक कविताच वाचली. कविता वाचल्यानतंर रामदास आठवले म्हणाले, काँग्रेसने तुम्हाला पुन्हा येथे आणले नाही, तर आम्ही आपल्याला येथे आणायला तयार आहोत. यानंतर सभागृहात एकच हाशा पिकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी ((Narendra Modi)) आणि गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनादेखील हसू आवरता आले नाही. (Ghulam Nabi Azad farewell)

मीही तिकडेच होतो, पण आता इकडे आलोय -गुलाम नबी यांची तारीफ करताना रामदास आठवले म्हणाले, ‘’आपला स्वभाव अत्यंत चांगला आहे. आपण फार मोठ्या मणाचे आहात. आपण पुन्हा या सभागृहात यायला हवे. जर आपल्याला पुन्हा येथे आणण्याची काँग्रेसची इच्छा नसेल तर, आम्ही आपल्याला येथे आणायला तयार आहोत. येथे येण्यास कसल्याही प्रकारचा त्रास नाही, मीही तिकडेच होतो. मात्र, आता इकडे आलो आहे. तर तुम्हाला काय त्रास आहे. आपण पुन्हा सभागृहात यायला हवे. हीच आमची इच्छा आहे.

राज्यसभेत पंतप्रधान मोदी भावूक, इंटरनेट युझर्सच्या आल्या अशा प्रतिक्रिया

रामदास आठवलेंची कविता -राज्यसभा छोड़कर जा रहे गुलाम नबीराज्यसभा छोड़कर जा रहे गुलाम नबी...हम मिलते रहेंगे आपको कभी कभीआपका नाम है गुलाम, इसलिए मैं करता हूं आपको सलामआपका नाम है गुलाम, लेकिन आप हमेशा रहे आजादआप हम सभी को रहेंगे याद15 अगस्त को देश हुआ आजाद, लेकिन राज्यसभा से आप आज हो रहे आजादआप हमेशा रहो आजाद, हम रहेंगे आपके साथ... ये अंदर की है बातमोदी जी जम्मू कश्मीर का मजबूत करेंगे हाथ और आपका देते रहेंगे साथ...

कधीही पाकिस्तानात गेलो नाही, हे माझं भाग्य: गुलाम नबी आझाद

पंतप्रधान मोदींनी केली गुलाम नबींची तारीफ, भावूकही झाले -तत्पूर्वी, जम्मू काश्मिरातील एका दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत मोदी म्हणाले, ''ते जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. आमची चांगली जवळीक होती. एकदा गुजरातचे नागरिक जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते. तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केले. या हल्ल्यात आठ लोक मारले गेले होते. सर्वप्रथम गुलाम नबी यांचा मला फोन आला.'' एवढे बोलताच पंतप्रधान मोदी भावूक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. यावेळी सभागृहात एकच शांतता पसरली होती. यानंतर मोदींनी पाणी पिले आणि स्वतःला सावरले. यावेली त्यांनी सभागृहाची क्षमाही मागितली.

1982 साल 'ते' कधीच विसरणार नाहीत, पवारांच्या विधानावर सभागृहात हशा

काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांच्यासह 4 खासदारांचा आज संसदेतला शेवटचा दिवस आहे, त्यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुलाम नबी आझाद यांचं कौतुक केले, त्याचसोबत आझाद यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात भावूक झाल्याचं दिसून आलं. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाcongressकाँग्रेसParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभा