शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

"कलम 370 हे मी, काँग्रेस, शरद पवार किंवा ममता बॅनर्जी परत आणू शकत नाही", जाहीर सभेत गुलाम नबी आझाद यांचे वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 15:38 IST

ghulam nabi azad : येत्या 10 दिवसांत नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचेही गुलाम नबी आझाद यांनी याच सभेत सांगितले. 

जम्मू-काश्मीर : कलम 370 संदर्भात गुलाम नबी आझाद यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कलम 370 हे मी, काँग्रेस, शरद पवार किंवा ममता बॅनर्जी परत आणू शकत नाही, असे जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना गुलाम नबी आझाद म्हणाले. तसेच, येत्या 10 दिवसांत नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचेही गुलाम नबी आझाद यांनी याच सभेत सांगितले. 

दरम्यान, काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर लगेचच मी जम्मू-काश्मीरमध्ये येत आहे, असे गुलाम नबी आझाद म्हणाले होते. तसेच, केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या पुढील विधानसभा निवडणुकीत नव्या पक्षासोबत जाण्याबाबत ते बोलले होते. 26 ऑगस्ट रोजी काँग्रेस सोडण्यापूर्वी गुलाम नबी आझाद नेत्याने जवळपास 5 दशके काँग्रेसमध्ये होते. संसदेच्या दोन्ही सभागृहात सदस्य राहिले. तसेच, त्यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यासह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

गुलाम नबी आझाद यांनी शनिवारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस नेत्यांचा रिमोट कंट्रोल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या हातात असल्याचे संकेत देत यांनी गुलाम नबी आझाद यांनी आपल्यावर कोणाचेही नियंत्रण नाही, असे प्रसारमाध्यमांना सांगितले. ते म्हणाले, "मी त्यांच्यासारखा नाही, ज्यांचा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांकडे आहे. माझ्याकडे माझा रिमोट कंट्रोल आहे. मी स्वातंत्र्य आहे, ते गुलाम आहेत. मी नबी (प्रेषित) चा गुलाम आहे. ते कोणाचे तरी गुलाम आहेत. काँग्रेस किंवा इतर पक्षांचे नेते कोणाच्या नियंत्रणाखाली आहेत, हे मला उघड करायचे नाही."

गेल्या गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील भदरवाह येथे एका सभेला संबोधित करताना काँग्रेस नेत्यांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना मी फक्त रायफलने प्रत्युत्तर दिले आहे" असे गुलाम नबी आझाद यांनी म्हटले होते. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "त्यांनी माझ्यावर क्षेपणास्त्रे डागली, मी फक्त 303 रायफल्सने प्रत्युत्तर दिले आणि त्यांना नष्ट केले. मी जर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र वापरले असते तर मग काँग्रेस गायबच झाली असती" असे म्हणत हल्लाबोल केला. त्यावेळी "मी 52 वर्षांपासून पक्षाचा (काँग्रेस) सदस्य होतो आणि राजीव गांधींना माझा भाऊ आणि इंदिरा गांधींना माझी आई मानतो. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध शब्द वापरण्याची माझी इच्छा नाही" असे म्हटले होते. 

"मी अद्याप माझ्या पक्षाचे नाव निश्चित केलेले नाही"गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर जम्मूमध्ये त्यांच्या पहिल्या जाहीर सभेला गुरुवारी संबोधित केले. यावेळी गुलाम नबी आझाद यांनी घोषणा केली की ते स्वतःची राजकीय संघटना सुरू करतील, जी पूर्ण राज्याचा दर्जा मिळवण्यावर लक्ष केंद्रित करेल. मी अद्याप माझ्या पक्षाचे नाव निश्चित केलेले नाही. यासाठी मी जम्मू-काश्मीरमधील लोकांकडून सूचना घेईन. हे लोक पक्षाचे नाव आणि झेंडा ठरवतील. प्रत्येकाला समजेल असे हिंदुस्थानी नाव मी माझ्या पक्षाला देईन असंही सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेस