शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

"कलम 370 हे मी, काँग्रेस, शरद पवार किंवा ममता बॅनर्जी परत आणू शकत नाही", जाहीर सभेत गुलाम नबी आझाद यांचे वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 15:38 IST

ghulam nabi azad : येत्या 10 दिवसांत नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचेही गुलाम नबी आझाद यांनी याच सभेत सांगितले. 

जम्मू-काश्मीर : कलम 370 संदर्भात गुलाम नबी आझाद यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कलम 370 हे मी, काँग्रेस, शरद पवार किंवा ममता बॅनर्जी परत आणू शकत नाही, असे जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना गुलाम नबी आझाद म्हणाले. तसेच, येत्या 10 दिवसांत नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचेही गुलाम नबी आझाद यांनी याच सभेत सांगितले. 

दरम्यान, काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर लगेचच मी जम्मू-काश्मीरमध्ये येत आहे, असे गुलाम नबी आझाद म्हणाले होते. तसेच, केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या पुढील विधानसभा निवडणुकीत नव्या पक्षासोबत जाण्याबाबत ते बोलले होते. 26 ऑगस्ट रोजी काँग्रेस सोडण्यापूर्वी गुलाम नबी आझाद नेत्याने जवळपास 5 दशके काँग्रेसमध्ये होते. संसदेच्या दोन्ही सभागृहात सदस्य राहिले. तसेच, त्यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यासह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

गुलाम नबी आझाद यांनी शनिवारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस नेत्यांचा रिमोट कंट्रोल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या हातात असल्याचे संकेत देत यांनी गुलाम नबी आझाद यांनी आपल्यावर कोणाचेही नियंत्रण नाही, असे प्रसारमाध्यमांना सांगितले. ते म्हणाले, "मी त्यांच्यासारखा नाही, ज्यांचा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांकडे आहे. माझ्याकडे माझा रिमोट कंट्रोल आहे. मी स्वातंत्र्य आहे, ते गुलाम आहेत. मी नबी (प्रेषित) चा गुलाम आहे. ते कोणाचे तरी गुलाम आहेत. काँग्रेस किंवा इतर पक्षांचे नेते कोणाच्या नियंत्रणाखाली आहेत, हे मला उघड करायचे नाही."

गेल्या गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील भदरवाह येथे एका सभेला संबोधित करताना काँग्रेस नेत्यांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना मी फक्त रायफलने प्रत्युत्तर दिले आहे" असे गुलाम नबी आझाद यांनी म्हटले होते. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "त्यांनी माझ्यावर क्षेपणास्त्रे डागली, मी फक्त 303 रायफल्सने प्रत्युत्तर दिले आणि त्यांना नष्ट केले. मी जर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र वापरले असते तर मग काँग्रेस गायबच झाली असती" असे म्हणत हल्लाबोल केला. त्यावेळी "मी 52 वर्षांपासून पक्षाचा (काँग्रेस) सदस्य होतो आणि राजीव गांधींना माझा भाऊ आणि इंदिरा गांधींना माझी आई मानतो. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध शब्द वापरण्याची माझी इच्छा नाही" असे म्हटले होते. 

"मी अद्याप माझ्या पक्षाचे नाव निश्चित केलेले नाही"गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर जम्मूमध्ये त्यांच्या पहिल्या जाहीर सभेला गुरुवारी संबोधित केले. यावेळी गुलाम नबी आझाद यांनी घोषणा केली की ते स्वतःची राजकीय संघटना सुरू करतील, जी पूर्ण राज्याचा दर्जा मिळवण्यावर लक्ष केंद्रित करेल. मी अद्याप माझ्या पक्षाचे नाव निश्चित केलेले नाही. यासाठी मी जम्मू-काश्मीरमधील लोकांकडून सूचना घेईन. हे लोक पक्षाचे नाव आणि झेंडा ठरवतील. प्रत्येकाला समजेल असे हिंदुस्थानी नाव मी माझ्या पक्षाला देईन असंही सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेस