शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

GHMC Election: काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव, 146 पैकी जिंकता आल्या फक्त 2 जागा; भाजपची मात्र 'बल्ले-बल्ले'!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 05, 2020 9:22 AM

भाजपसोबत अधिकांश निवडणुकीत काँग्रेसला सातत्याने पराभवाचे तोंडच पाहावे लागत आहे. तेच ग्रेटर हैदराबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीतही झाले.

ठळक मुद्देभाजपसोबत अधिकांश निवडणुकीत काँग्रेसला सातत्याने पराभवाचे तोंडच पाहावे लागत आहे. काँग्रेसने या महापालिकेच्या 150 जागांपैकी तब्बल 146 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते.या निवडणुकीत भाजपने 149 उमेदवार रिंगणात उतरवले होते

हैदराबाद - बहुचर्चित ग्रेटर हैदराबाद महानगर पालिकेचे (GHMC) निवडणूक निकाल आले आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत 48 जागांवर विजय मिळवला आहे. येथे भाजप दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला. तर काँग्रेस आणि तेलुगू देशम पक्ष चारीमुंड्या चित झाले. काँग्रेस आणि तेलुगू देशम पक्षाने या निवडणुकीत 100 हून अधिक जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, केवळ दोनच उमेदवार निवडून आले. हे दोनही उमेदवार काँग्रेसचे आहेत.

भाजपसोबत अधिकांश निवडणुकीत काँग्रेसला सातत्याने पराभवाचे तोंडच पाहावे लागत आहे. तेच ग्रेटर हैदराबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीतही झाले. काँग्रेसने या महापालिकेच्या 150 जागांपैकी तब्बल 146 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र यांपैकी केवळ दोनच निवडून आले. काँग्रेसपेक्षाही तेलुगू देशम पक्षाची स्थिती वाईट राहीली. कारण त्यांनी तब्बल 106 जागांवर उमेदवार दिले होते. मात्र त्यांचा एकही उमेदवार नवडणून येऊ शकला नाही. 

या निवडणुकीत भाजपने 149 उमेदवार रिंगणात उतरवले होते आणि त्यासाठी पक्षाने केंद्रातील नेते येथे प्रचारासाठी पाठवले. याचा परिणामही या निवडणुकीत दिसून आला. यामुळे भाजपच्या खात्यात 48 जागा आल्या. तर या निवडणुकीत एआयएमआयएम तिसऱ्या स्थानी राहिला.

येथे 2016 च्या निवडणुकीत केवळ 3 जागा जिंकणाऱ्या भाजपने 12 पट अधिक चांगली कामगीरी करत 48 जागा जिंकल्या. 2016 च्या निवडमुकीत भाजपने टीडीपीसोबत युती केली होती. तर 2009 च्या निवडणुकीत भाजपला 6 जागांवर विजय मिळाला होता.

असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIMने 51 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यांपैकी त्यांचे 44 उमेदवार निवडून आले. तेलंगणातील सत्ताधारी पक्ष असलेल्या टीआरएसला 56 जागांवर विजय मिळाला. केसीआर यांच्या पक्षाने सर्वच्या सर्व 150 जागांवर उमेदवार उभे केले होते. तत्पूर्वी, 2016 मध्ये झालेल्या ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत टीआरएसने 150 पैकी 99 जागा जिंकल्या होत्या. तर AIMIMने 44 जागाच जिंकल्या होत्यात. काँग्रेसंला तेव्हाही दोनच जागा मिळाल्या होत्या. 

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूकBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAmit Shahअमित शहाSonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी