शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 06:32 IST

Rahul Gandhi vs Narendra Modi: पाच वर्षांपासून उपस्थित करत असलेल्या अंबानी-अदानी या मुद्यावर काँग्रेसच्या शहजाद्याने बोलायचे बंद केले आहे. यामागचे कारण काँग्रेसने जनतेला सांगितले पाहिजे. शहजाद्याने हा मुद्दा उपस्थित न करण्यासाठी काही ‘डील’ केले नाही ना? असे मोदी म्हणाले होते.

- हरिश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कहैदराबाद : पाच वर्षांपासून उपस्थित करत असलेल्या अंबानी-अदानी या मुद्यावर काँग्रेसच्या शहजाद्याने बोलायचे बंद केले आहे. यामागचे कारण काँग्रेसने जनतेला सांगितले पाहिजे. शहजाद्याने हा मुद्दा उपस्थित न करण्यासाठी काही ‘डील’ केले नाही ना? असा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विचारला. तेलंगणा येथील वेमुलावाडा येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते म्हणाले की, अदानी-अंबानी यांच्याविरोधात करण्यात येणारा प्रचार काँग्रेसकडे नोटांनी भरलेला टेम्पो पोहोचल्यामुळे त्या पक्षाने बंद केला की काय? निवडणुका जाहीर झाल्यापासून अंबानी-अदानी यांच्यावर टीका करणे काँग्रेसने थांबवले आहे. अदानी-अंबानींकडून नेमके काय मिळाले हे काँग्रेसच्या शहजाद्याने तेलंगणाच्या भूमीवरून जाहीर करावे, असे आव्हानही पंतप्रधानांनी  दिले. याला राहुल गांधी यांनी चोख प्रत्यूत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेस पक्षाने अदानी-अंबानी यांच्यावर टीका केली होती आणि आता एका रात्रीत ही टीका थांबली. याचा अर्थ काँग्रेस पक्षाला बहुतेक काही टेम्पो भरून ‘चोरी का माल’ मिळाला आहे. काले धन की कितनी बाेरीया भरकर रुपये मारे है असा सवालही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केला.

‘काँग्रेस, बीआरएसचे घराणेशाहीला प्राधान्य’पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, काँग्रेस, भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हे दोन पक्ष घराणेशाहीला महत्त्व देतात. हे दोन पक्ष भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून परस्परांवर टीका करतात. पण दोन्ही पक्षच भ्रष्टाचारी आहेत.

‘काँग्रेस, इंडिया आघाडीचा तिसरा फ्यूजही उडाला’nलोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यानंतर झालेल्या या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तिसऱ्या टप्प्यातील मतदानाने काँग्रेस व इंडिया आघाडीचा तिसरा फ्यूजही उडाला आहे. nआता या निवडणुकांचे चार टप्पे शिल्लक असून, त्यामध्ये जनतेचे आशीर्वाद भाजपप्रणित एनडीए आघाडीला मिळणार आहेत. आमचा विजय निश्चित आहे.

आम्हाला पैसे दिले का, सीबीआय, ईडी चौकशी करानवी दिल्ली : अदानी, अंबानी यांनी काँग्रेसला टेम्पो भरून पैसे पाठविले असावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे असेल तर त्यांनी सीबीआय, ईडीमार्फत चौकशी करावी, असे आव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी दिले. राहुल गांधी म्हणाले, उद्योगपती पैसे पाठवितात या वैयक्तिक अनुभवावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केले असावे. मोदी यांनी या दोन उद्योगपतींना जे पैसे दिले आहेत, ती रक्कम आम्ही जनतेला योजनांच्या माध्यमातून परत देणार आहोत. भाजपच्या भ्रष्टाचाराच्या टेम्पोचे चालक व सहाय्यक कोण आहेत याची देशाला माहिती आहे. यावेळी प्रथमच तुम्ही जाहीरपणे दोघांबद्दल बोलला. हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? असा सवालही राहुल यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४