शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये काँग्रेससमोर पक्षातील गळती थांबविण्याचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 09:21 IST

गुजरात काँग्रेसला आणखी तीन आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिल्यामुळे शुक्रवारी मोठा फटका बसला आहे. गुरूवारपासून सुरू झालेलं हे राजीनामा सत्र पाहता आजपर्यत एकुण 6 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

ठळक मुद्देगुजरात काँग्रेसला आणखी तीन आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिल्यामुळे शुक्रवारी मोठा फटका बसला आहे.गुरूवारपासून सुरू झालेलं हे राजीनामा सत्र पाहता आजपर्यत एकुण 6 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षामध्ये सुरू झालेल्या या गळतीमुळे गुजरात काँग्रेस पक्षाकडून आता पक्षात एकजूट आणण्यासाठी कवायत केली जाते आहे. विशेष म्हणजे येत्या एक-दोन दिवसात आणखीनही आमदार राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तविली जाते आहे.

अहमदाबाद, दि. 29- गुजरात काँग्रेसला आणखी तीन आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिल्यामुळे शुक्रवारी मोठा फटका बसला आहे. गुरूवारपासून सुरू झालेलं हे राजीनामा सत्र पाहता आजपर्यत एकुण 6 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षामध्ये सुरू झालेल्या या गळतीमुळे गुजरात काँग्रेस पक्षाकडून आता पक्षात एकजूट आणण्यासाठी कवायत केली जाते आहे. विशेष म्हणजे येत्या एक-दोन दिवसात आणखीनही आमदार राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तविली जाते आहे. पक्षातील या सगळ्या घडामोडींमुळे काँग्रेसने शुक्रवारी भाजपवर पैसा आणि सत्तेच्या बळावर काँग्रेसमध्ये फूट पाडल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे सध्या पक्षात असलेल्या आमदारांनाही तंबी दिली. जर पक्ष सोडून गेलात तर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, अशा शब्दात काँग्रेसने आमदारांना खडसावलं. शुक्रवारी बालासिनोर मतदारसंघाचे आमदार मानसिंह चौहान यांनी राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष रमणलाल व्होरा यांना सकाळी दिला. वन्सदा येथील आमदार छन्नाभाई चौधरी यांनी अध्यक्षांकडे त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री राजीनामा सुपुर्द केला. तर काँग्रेसचे आमदार राघव पटेल यांनी लवकरच इतर पाच आमदारांसह राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. प्रतिष्ठेचा मुद्दा8 ऑगस्ट रोजी होणारी निवडणूक हा काँग्रेससमोरील सगळ्यात मोठ्या चिंतेचा विषय आहे. ८ ऑगस्ट रोजी राज्यात राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होते आहे. यामध्ये एक जागा काँग्रेसकडे आहे तर इतर दोन जागा भाजपकडे आहेत. भाजपकडून पैशांचा वापर करून तिसरी जागा हडप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातो आहे. भाजपकडून त्या तिसऱ्या जागेसाठी बलवंत सिंह राजपूत यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसने राज्यसभेसाठी अहमद पटेल यांना उमेदवारी दिली आहे. गुजरातमधील नव्या समीकरणानुसार अहमद पटेल यांची जागा फसेल अशी चिन्ह दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसकडे सध्या 57 आमदार आहेत. त्यापैकी 6 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आमदारांची संख्या आता 51 झाली आहे. काँग्रेसला राज्यसभेतील जागा जिंकण्यासाठी एकुण 47 आमदारांची गरज आहे. पण पक्षामध्ये सुरू झालेल्या आमदारांच्या गळतीमुळे काँग्रेसच्या पारड्यातील आमदारांची संख्या कमी होत असून जागा जिंकण कठीण होत असल्याचं बोललं जातं आहे. अहमद पटेल यांची जागा जिंकणं हा काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. काँग्रेस पक्षातील सगळे महत्त्वाचे निर्णय हे अहमद पटेल यांच्याच सल्ल्याने घेतले गेल्याचं बोललं जातं.त्यामुळे अहमद पटेल यांना राज्यसभेतील जागा मिळवण्यासाठी काँग्रेसकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.  गळती थांबविण्याचा प्रयत्न गुजरातमधील काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पार्टीला अधिक फटका बसू नये व फुटीची शक्यता ओळखून काँग्रेसनं आपल्या 44 आमदारांना विमानाने बंगळुरू येथे पाठवल्याचे वृत्त समोर आले आहे. या 40 आमदारांना राज्यसभेची निवडणूक होईपर्यंत बंगळुरूमधील एका रिसोर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसमध्ये फोडाफोडीचं राजकारण करण्याचा भाजपाचा डाव यशस्वी होऊ नये, यासाठी आमदारांना बंगळुरूमध्ये पाठवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.